शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

नळांना पाणी वेळेवर सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:37 IST

वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करावा डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस येथे मागील काही दिवसांपासून वानरांनी धुमाकूळ घालणे सुरु ...

वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करावा

डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस येथे मागील काही दिवसांपासून वानरांनी धुमाकूळ घालणे सुरु केले आहे. घरांच्या छतावरून उड्या मारत वानर अंगणातील वस्तुंची नासाडी करीत आहेत. यामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. वानरांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येत आहेत. वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वाहक - चालक अजूनही मास्कविनाच

हिंगोली : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सर्वांनाच मास्क घालणे बंधनकारक केले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. एवढे असतानाही चालक व वाहक मात्र विनामास्क बस चालवत आहेत. खरे पाहिले तर चालक व वाहकांनी मास्क घालणे गरजेचे आहे. एस. टी. महामंडळाच्या वरिष्ठांनी या बाबीची दखल घेणे गरजेचे आहे.

रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालक त्रस्त

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शहर व परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे वाहनचाकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

हिंगोली : शहरातील कमलानगर, शाहूनगर, इंदिरा नगर, शिवाजीनगर, मंगळवारा आदी भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. याचबरोबर वीज खंडित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होत आहे. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन शहरातील वीजपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.

बसेस बाहेर निघण्यास ऑटोंचा अडथळा

हिंगोली : मागील काही दिवसांपासून बसस्थानकाच्या गेटवर ऑटो उभे केले जात आहेत. यामुळे बस बाहेर काढताना चालकांना कसरत करावी लागत आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगण्यात आले. परंतु, अद्याप या प्रकाराकडे कोणाचेही लक्ष गेलेले दिसत नाही. वरिष्ठांनी लक्ष देऊन गेटवर होणारी गर्दी कमी करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

वातावरणात बदल: आजारांना निमंत्रण

हिंगोली : गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सकाळी थंडी, तर दुपारी उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. वातावरण बदलामुळे ताप, खोकला, डोके दुखणे, अंग दुखणे आदी आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.