शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

डांबरीकरण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST

रोपट्यांना पाणी देण्याची गरज हिंगोली: शहरातील प्रमु्ख मार्गावर नगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. लावलेली रोपटे सध्या चांगल्या स्थितीत ...

रोपट्यांना पाणी देण्याची गरज

हिंगोली: शहरातील प्रमु्ख मार्गावर नगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. लावलेली रोपटे सध्या चांगल्या स्थितीत असून रोपट्यांचे झाडात रूपांतर होत आहे. मात्र, काही भागांतील रोपट्यांना सध्या पाणी देण्याची गरज असून, पाणी दिल्यास ही रोपटे जगण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन रोपट्यांना नियमित पाणी देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

कळमनुरी : तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ आहे. त्यामुळे या भागात वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या तालुक्यातील बहुतांश पाणीसाठे आटत आहेत. ओढ्यातील पाणीही आटले असून, वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. याकडे लक्ष देऊन डोंगराळ भागात पाणसाठे उभारावेत, अशी मागणी होत आहे.

साइडपट्ट्या भरण्याची मागणी

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील जरोडा ते साळवा पाटीदरम्यानच्या हिंगोली ते नांदेड मार्गाच्या दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे वाहने खाली उतरल्यास पुन्हा डांबरी रस्त्यावर घेताना वाहने उलटण्याचे प्रकार घडत आहेत. अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देऊन दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्या भरण्यात याव्यात, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.

बस स्थानकात दारुड्यांचा वावर वाढला

हिंगोली: शहरातील बस स्थानकातून परभणी, नांदेड, अकोला, रिसोड आदी मार्गावरून आलेल्या बसेस थांबतात. हिंगोली मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बसेसची ये-जा असते. मात्र, काही दिवसांपासून येथील बस स्थानकात दारुड्यांचा वावर वाढला आहे. याचा प्रवाशांना त्रास होत आहे. याकडे लक्ष देऊन दारुड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

हातपंप दुरुस्तीची मागणी

कळमनुरी : तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. त्यात महावितरण कंपनीने वीज बिल थकल्याने वीज पुरवठा खंडित करण्याचे सत्र हाती घेतले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे ग्रामस्थ हातपंपाचे पाणी वापरत आहेत. मात्र, अनेक हातपंपांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देऊन हातपंपांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.