शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डांबरीकरण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST

रोपट्यांना पाणी देण्याची गरज हिंगोली: शहरातील प्रमु्ख मार्गावर नगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. लावलेली रोपटे सध्या चांगल्या स्थितीत ...

रोपट्यांना पाणी देण्याची गरज

हिंगोली: शहरातील प्रमु्ख मार्गावर नगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. लावलेली रोपटे सध्या चांगल्या स्थितीत असून रोपट्यांचे झाडात रूपांतर होत आहे. मात्र, काही भागांतील रोपट्यांना सध्या पाणी देण्याची गरज असून, पाणी दिल्यास ही रोपटे जगण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन रोपट्यांना नियमित पाणी देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

कळमनुरी : तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ आहे. त्यामुळे या भागात वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या तालुक्यातील बहुतांश पाणीसाठे आटत आहेत. ओढ्यातील पाणीही आटले असून, वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. याकडे लक्ष देऊन डोंगराळ भागात पाणसाठे उभारावेत, अशी मागणी होत आहे.

साइडपट्ट्या भरण्याची मागणी

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील जरोडा ते साळवा पाटीदरम्यानच्या हिंगोली ते नांदेड मार्गाच्या दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे वाहने खाली उतरल्यास पुन्हा डांबरी रस्त्यावर घेताना वाहने उलटण्याचे प्रकार घडत आहेत. अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देऊन दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्या भरण्यात याव्यात, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.

बस स्थानकात दारुड्यांचा वावर वाढला

हिंगोली: शहरातील बस स्थानकातून परभणी, नांदेड, अकोला, रिसोड आदी मार्गावरून आलेल्या बसेस थांबतात. हिंगोली मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बसेसची ये-जा असते. मात्र, काही दिवसांपासून येथील बस स्थानकात दारुड्यांचा वावर वाढला आहे. याचा प्रवाशांना त्रास होत आहे. याकडे लक्ष देऊन दारुड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

हातपंप दुरुस्तीची मागणी

कळमनुरी : तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. त्यात महावितरण कंपनीने वीज बिल थकल्याने वीज पुरवठा खंडित करण्याचे सत्र हाती घेतले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे ग्रामस्थ हातपंपाचे पाणी वापरत आहेत. मात्र, अनेक हातपंपांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देऊन हातपंपांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.