शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

डांबरीकरण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST

रोपट्यांना पाणी देण्याची गरज हिंगोली: शहरातील प्रमु्ख मार्गावर नगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. लावलेली रोपटे सध्या चांगल्या स्थितीत ...

रोपट्यांना पाणी देण्याची गरज

हिंगोली: शहरातील प्रमु्ख मार्गावर नगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. लावलेली रोपटे सध्या चांगल्या स्थितीत असून रोपट्यांचे झाडात रूपांतर होत आहे. मात्र, काही भागांतील रोपट्यांना सध्या पाणी देण्याची गरज असून, पाणी दिल्यास ही रोपटे जगण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन रोपट्यांना नियमित पाणी देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

कळमनुरी : तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ आहे. त्यामुळे या भागात वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या तालुक्यातील बहुतांश पाणीसाठे आटत आहेत. ओढ्यातील पाणीही आटले असून, वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. याकडे लक्ष देऊन डोंगराळ भागात पाणसाठे उभारावेत, अशी मागणी होत आहे.

साइडपट्ट्या भरण्याची मागणी

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील जरोडा ते साळवा पाटीदरम्यानच्या हिंगोली ते नांदेड मार्गाच्या दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे वाहने खाली उतरल्यास पुन्हा डांबरी रस्त्यावर घेताना वाहने उलटण्याचे प्रकार घडत आहेत. अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देऊन दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्या भरण्यात याव्यात, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.

बस स्थानकात दारुड्यांचा वावर वाढला

हिंगोली: शहरातील बस स्थानकातून परभणी, नांदेड, अकोला, रिसोड आदी मार्गावरून आलेल्या बसेस थांबतात. हिंगोली मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बसेसची ये-जा असते. मात्र, काही दिवसांपासून येथील बस स्थानकात दारुड्यांचा वावर वाढला आहे. याचा प्रवाशांना त्रास होत आहे. याकडे लक्ष देऊन दारुड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

हातपंप दुरुस्तीची मागणी

कळमनुरी : तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. त्यात महावितरण कंपनीने वीज बिल थकल्याने वीज पुरवठा खंडित करण्याचे सत्र हाती घेतले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे ग्रामस्थ हातपंपाचे पाणी वापरत आहेत. मात्र, अनेक हातपंपांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देऊन हातपंपांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.