शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
2
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
3
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
4
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
5
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
6
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
7
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
8
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
9
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
10
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
11
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
12
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
13
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
14
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
15
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
16
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
17
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
18
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त औंढा नागनाथ: तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना ...

रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त

औंढा नागनाथ: तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सा. बां. विभागाने याची दखल घेऊन रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.

डासांचे प्रमाण वाढले

शिरडशहापूर: औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथील काही वॉर्डातील नाल्या साफ केल्या नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. तसेच नालीमध्ये कचरा साचत असल्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे. ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन नाल्या साफ कराव्यात, अशी मागणी होत आहे.

प्रखर ऊन झाले असह्य

करंजी: मागील पंधरा दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे बाहेर पडणेही मुश्कील होऊन बसले आहे. प्रखर उन्हाने ताप येणे, डोके दुखणे आदी आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. एप्रिल महिन्यात ही स्थिती तर मे महिन्यात काय हाल होतील हे सांगणे कठीण आहे.