शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
2
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
3
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
4
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
5
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
6
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
7
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
8
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
9
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
10
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
11
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
12
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
13
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
14
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
15
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
16
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
17
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
18
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
19
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
20
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:27 IST

नाल्याचे पाणी रस्त्यावर हिंगोली : शहरातील गंगानगर, शिवाजीनगर, इंदिरानगर आदी भागांतील रस्त्यांवर नाल्याचे पाणी येत आहे. यामुळे डासांचे प्रमाण ...

नाल्याचे पाणी रस्त्यावर

हिंगोली : शहरातील गंगानगर, शिवाजीनगर, इंदिरानगर आदी भागांतील रस्त्यांवर नाल्याचे पाणी येत आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून पादचाऱ्यांना त्रास होत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने वेळीच याची दखल घेऊन रस्त्यावरील पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गतिरोधकाची मागणी

डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा रस्ता राज्य रस्ता असून वाहने वेगाने चालविली जात आहेत. यामुळे छोटे-मोठे अपघातही घडून येत आहेत. अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे गतिरोधक बसवावे, अशी मागणी डिग्रस कऱ्हाळे येथील नागरिकांनी केली आहे.

‘स्वच्छतागृह दुरुस्त करावे’

हिंगोली : शहरातील बसस्थानकामधील स्वच्छतागृहाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. वेळोवेळी एसटी महामंडळाच्या संबंधित विभागाला सांगूनही कोणीही लक्ष देण्यास तयार होत नाही. दुसरीकडे बसस्थानकातील गिट्टी उघडी पडली असल्यामुळे धुळीचे प्रमाणही वाढले आहे. वाढत्या धुळीमुळे प्रवाशांना श्वसनाचे आजार जडत आहेत. महामंडळाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

‘वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करावा’

हिंगोली : अन्न आणि पाण्याच्या शोधात वानरांनी शहर गाठले असून अंगणात तसेच छतावर ठेवलेल्या वस्तूंची नासाडी वानरे करीत आहेत. वानरांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास काही वानरे अंगावर धावून येत आहेत. शहरातील शिवाजीनगर, शास्त्रीनगर, तोफखाना, कापड गल्ली, मंगळवारा, गंगानगर आदी ठिकाणी वानरांचा संचार पाहायला मिळत आहे. वन विभागाने याची दखल घेऊन वानरांना जंगलात नेऊन सोडावे.

वळण रस्ते बनले धोकादायक

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील वळण रस्त्यावर मागील काही दिवसांपासून खड्डेच खड्डे झाले आहेत. वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वळण रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाला कळविले. परंतु, अजून तरी कोणीही लक्ष दिले नाही. खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडत आहेत.

स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी

कळमनुरी : शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. साचलेल्या कचऱ्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. एसटी महामंडळाने याची दखल घेऊन बसस्थानक व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.