शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:27 IST

नाल्याचे पाणी रस्त्यावर हिंगोली : शहरातील गंगानगर, शिवाजीनगर, इंदिरानगर आदी भागांतील रस्त्यांवर नाल्याचे पाणी येत आहे. यामुळे डासांचे प्रमाण ...

नाल्याचे पाणी रस्त्यावर

हिंगोली : शहरातील गंगानगर, शिवाजीनगर, इंदिरानगर आदी भागांतील रस्त्यांवर नाल्याचे पाणी येत आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून पादचाऱ्यांना त्रास होत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने वेळीच याची दखल घेऊन रस्त्यावरील पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गतिरोधकाची मागणी

डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा रस्ता राज्य रस्ता असून वाहने वेगाने चालविली जात आहेत. यामुळे छोटे-मोठे अपघातही घडून येत आहेत. अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे गतिरोधक बसवावे, अशी मागणी डिग्रस कऱ्हाळे येथील नागरिकांनी केली आहे.

‘स्वच्छतागृह दुरुस्त करावे’

हिंगोली : शहरातील बसस्थानकामधील स्वच्छतागृहाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. वेळोवेळी एसटी महामंडळाच्या संबंधित विभागाला सांगूनही कोणीही लक्ष देण्यास तयार होत नाही. दुसरीकडे बसस्थानकातील गिट्टी उघडी पडली असल्यामुळे धुळीचे प्रमाणही वाढले आहे. वाढत्या धुळीमुळे प्रवाशांना श्वसनाचे आजार जडत आहेत. महामंडळाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

‘वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करावा’

हिंगोली : अन्न आणि पाण्याच्या शोधात वानरांनी शहर गाठले असून अंगणात तसेच छतावर ठेवलेल्या वस्तूंची नासाडी वानरे करीत आहेत. वानरांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास काही वानरे अंगावर धावून येत आहेत. शहरातील शिवाजीनगर, शास्त्रीनगर, तोफखाना, कापड गल्ली, मंगळवारा, गंगानगर आदी ठिकाणी वानरांचा संचार पाहायला मिळत आहे. वन विभागाने याची दखल घेऊन वानरांना जंगलात नेऊन सोडावे.

वळण रस्ते बनले धोकादायक

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील वळण रस्त्यावर मागील काही दिवसांपासून खड्डेच खड्डे झाले आहेत. वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वळण रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाला कळविले. परंतु, अजून तरी कोणीही लक्ष दिले नाही. खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडत आहेत.

स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी

कळमनुरी : शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. साचलेल्या कचऱ्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. एसटी महामंडळाने याची दखल घेऊन बसस्थानक व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.