शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:27 IST

नाल्याचे पाणी रस्त्यावर हिंगोली : शहरातील गंगानगर, शिवाजीनगर, इंदिरानगर आदी भागांतील रस्त्यांवर नाल्याचे पाणी येत आहे. यामुळे डासांचे प्रमाण ...

नाल्याचे पाणी रस्त्यावर

हिंगोली : शहरातील गंगानगर, शिवाजीनगर, इंदिरानगर आदी भागांतील रस्त्यांवर नाल्याचे पाणी येत आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून पादचाऱ्यांना त्रास होत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने वेळीच याची दखल घेऊन रस्त्यावरील पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गतिरोधकाची मागणी

डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा रस्ता राज्य रस्ता असून वाहने वेगाने चालविली जात आहेत. यामुळे छोटे-मोठे अपघातही घडून येत आहेत. अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे गतिरोधक बसवावे, अशी मागणी डिग्रस कऱ्हाळे येथील नागरिकांनी केली आहे.

‘स्वच्छतागृह दुरुस्त करावे’

हिंगोली : शहरातील बसस्थानकामधील स्वच्छतागृहाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. वेळोवेळी एसटी महामंडळाच्या संबंधित विभागाला सांगूनही कोणीही लक्ष देण्यास तयार होत नाही. दुसरीकडे बसस्थानकातील गिट्टी उघडी पडली असल्यामुळे धुळीचे प्रमाणही वाढले आहे. वाढत्या धुळीमुळे प्रवाशांना श्वसनाचे आजार जडत आहेत. महामंडळाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

‘वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करावा’

हिंगोली : अन्न आणि पाण्याच्या शोधात वानरांनी शहर गाठले असून अंगणात तसेच छतावर ठेवलेल्या वस्तूंची नासाडी वानरे करीत आहेत. वानरांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास काही वानरे अंगावर धावून येत आहेत. शहरातील शिवाजीनगर, शास्त्रीनगर, तोफखाना, कापड गल्ली, मंगळवारा, गंगानगर आदी ठिकाणी वानरांचा संचार पाहायला मिळत आहे. वन विभागाने याची दखल घेऊन वानरांना जंगलात नेऊन सोडावे.

वळण रस्ते बनले धोकादायक

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील वळण रस्त्यावर मागील काही दिवसांपासून खड्डेच खड्डे झाले आहेत. वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वळण रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाला कळविले. परंतु, अजून तरी कोणीही लक्ष दिले नाही. खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडत आहेत.

स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी

कळमनुरी : शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. साचलेल्या कचऱ्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. एसटी महामंडळाने याची दखल घेऊन बसस्थानक व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.