शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:27 IST

नाल्याचे पाणी रस्त्यावर हिंगोली : शहरातील गंगानगर, शिवाजीनगर, इंदिरानगर आदी भागांतील रस्त्यांवर नाल्याचे पाणी येत आहे. यामुळे डासांचे प्रमाण ...

नाल्याचे पाणी रस्त्यावर

हिंगोली : शहरातील गंगानगर, शिवाजीनगर, इंदिरानगर आदी भागांतील रस्त्यांवर नाल्याचे पाणी येत आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून पादचाऱ्यांना त्रास होत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने वेळीच याची दखल घेऊन रस्त्यावरील पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गतिरोधकाची मागणी

डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा रस्ता राज्य रस्ता असून वाहने वेगाने चालविली जात आहेत. यामुळे छोटे-मोठे अपघातही घडून येत आहेत. अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे गतिरोधक बसवावे, अशी मागणी डिग्रस कऱ्हाळे येथील नागरिकांनी केली आहे.

‘स्वच्छतागृह दुरुस्त करावे’

हिंगोली : शहरातील बसस्थानकामधील स्वच्छतागृहाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. वेळोवेळी एसटी महामंडळाच्या संबंधित विभागाला सांगूनही कोणीही लक्ष देण्यास तयार होत नाही. दुसरीकडे बसस्थानकातील गिट्टी उघडी पडली असल्यामुळे धुळीचे प्रमाणही वाढले आहे. वाढत्या धुळीमुळे प्रवाशांना श्वसनाचे आजार जडत आहेत. महामंडळाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

‘वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करावा’

हिंगोली : अन्न आणि पाण्याच्या शोधात वानरांनी शहर गाठले असून अंगणात तसेच छतावर ठेवलेल्या वस्तूंची नासाडी वानरे करीत आहेत. वानरांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास काही वानरे अंगावर धावून येत आहेत. शहरातील शिवाजीनगर, शास्त्रीनगर, तोफखाना, कापड गल्ली, मंगळवारा, गंगानगर आदी ठिकाणी वानरांचा संचार पाहायला मिळत आहे. वन विभागाने याची दखल घेऊन वानरांना जंगलात नेऊन सोडावे.

वळण रस्ते बनले धोकादायक

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील वळण रस्त्यावर मागील काही दिवसांपासून खड्डेच खड्डे झाले आहेत. वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वळण रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाला कळविले. परंतु, अजून तरी कोणीही लक्ष दिले नाही. खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडत आहेत.

स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी

कळमनुरी : शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. साचलेल्या कचऱ्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. एसटी महामंडळाने याची दखल घेऊन बसस्थानक व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.