शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

'त्या' जागेच्या ठरविलेल्या किमतीस स्थगिती देवून ईडीमार्फत चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:19 IST

हिंगाेली: येथील जवाहर रोडवरील सर्व्हे क्र. ९३, ९४ मधील कोट्यवधी रूपये किमतीची जमीन शासन नियमांना बगल देत व्यावसायीकांना कवडीमोल ...

हिंगाेली: येथील जवाहर रोडवरील सर्व्हे क्र. ९३, ९४ मधील कोट्यवधी रूपये किमतीची जमीन शासन नियमांना बगल देत व्यावसायीकांना कवडीमोल दराने देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने ठरविले आहे. यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होणार असल्याचा आरोप करीत समितीने ठरविलेल्या किमतीस स्थगिती देवून नियमांप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंचचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

हिंगोली शहरातील जवाहर रोडवरील सर्व्हे क्र. ९३, ९४ मधील जमीन पश्चिम पाकिस्तान येथून शरणार्थी म्हणून हिंगोलीत वास्तव्यास आलेले ब्रिजलाल टेहलाराम खुराणा व इतरांना व्यवसाय चालविण्यासाठी देण्यात आली होती. ही शासकीय जमीन (अतिक्रमण) नियमीत करण्याबाबत ब्रिजलाल टेहलाराम खुराणा व इतरांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश निशीता महात्रे व न्यायाधीश बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने अंतीम आदेश ११.२.२००९ पारीत करीत शासन नियमांप्रमाणे अतिक्रमीत जागा नियमीत करण्याचे आदेश हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. तसेच अतिक्रमीत जागा नियमित करण्याची कारवाई शासन निर्णय १७ एप्रिल १९७४ च्या नियमांप्रमाणे करावी, असे आदेशात म्हटले होते. नियमांनुसार या जागेची शासकीय बाजारी किंमत ५८,००० रूपये प्रति चौरस मीटर असतांना जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने नियमांना बगल देत या जागेची किमत २५ रूपये प्रति चौरस मीटर प्रमाणे ११ जागांची एकूण किमत ९ हजार ९५२ रूपये ५० पैसे ठरिवली आहे. यातून शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २३ ऑक्टोबर २०२० रोजीच्या ठरविलेल्या किमतीस तत्काळ स्थगिती देवून उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शासन निर्णय १७ एप्रिल १९७४ च्या नियमाप्रमाणे व कायद्यातील तरतूदीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, तसेच याप्रकरणी प्रवर्तन निर्देशालय (ईडी) मार्फत चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात शेख नईम यांनी केली.