शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पीकविम्याच्या रकमेतून होतेय कर्जकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:23 IST

हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागील खरीप हंगाम ऐनवेळी अतिवृष्टीने हिरावून नेला. त्यापूर्वीच्या वर्षीही असाच प्रकार घडला होता. आता पीकविम्याच्या ...

हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागील खरीप हंगाम ऐनवेळी अतिवृष्टीने हिरावून नेला. त्यापूर्वीच्या वर्षीही असाच प्रकार घडला होता. आता पीकविम्याच्या मंजूर रकमेतूनही इतर कर्ज कापून घेतले जात असल्याने या हंगामाची पेरणी करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. अशी कपात करू नये, अशी मागणी जि.प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी केली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील जवळपास १.२१ लाख शेतकरी खातेदारांना यंदा पीकविमा मंजूर झाला आहे. पीकविम्याची रक्कम अजूनही पूर्णपणे खात्यावर पडली नाही. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ६५ कोटी रुपये जमा झाले आहेत. टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जात आहे. यासाठी विमा कंपनीकडून अधिकचे मनुष्यबळ लावून ७ जूनपूर्वी सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न आहे. मात्र तत्पूर्वीच ज्यांची रक्कम जमा झाली त्यावर बँका थेट डल्ला मारत आहेत. ती रक्कम इतर कर्जाच्या नावाखाली जमा करून घेत आहेत. शेतकरी बँकेत पैसे काढायला गेल्यावर ही कारणमीमांसा सांगितली जात आहे. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येणार आहे. कारण नवीन कर्ज देण्यासाठीही बँकांची भूमिका उदासीन आहे. शेतकऱ्यांचा राष्ट्रीयीकृत बँकांनी तर पुरता छळ चालविला आहे. या बँकांवर कुणाचेही नियंत्रण न राहिल्याने त्यांचे फावतच आहे.

याबाबत डॉ. पाचपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बँकांनी इतर कर्जात पीकविम्याची रक्कम वळती करू नये, अशी मागणी केली आहे.