शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याच्या रकमेतून होतेय कर्जकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:23 IST

हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागील खरीप हंगाम ऐनवेळी अतिवृष्टीने हिरावून नेला. त्यापूर्वीच्या वर्षीही असाच प्रकार घडला होता. आता पीकविम्याच्या ...

हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागील खरीप हंगाम ऐनवेळी अतिवृष्टीने हिरावून नेला. त्यापूर्वीच्या वर्षीही असाच प्रकार घडला होता. आता पीकविम्याच्या मंजूर रकमेतूनही इतर कर्ज कापून घेतले जात असल्याने या हंगामाची पेरणी करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. अशी कपात करू नये, अशी मागणी जि.प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी केली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील जवळपास १.२१ लाख शेतकरी खातेदारांना यंदा पीकविमा मंजूर झाला आहे. पीकविम्याची रक्कम अजूनही पूर्णपणे खात्यावर पडली नाही. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ६५ कोटी रुपये जमा झाले आहेत. टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जात आहे. यासाठी विमा कंपनीकडून अधिकचे मनुष्यबळ लावून ७ जूनपूर्वी सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न आहे. मात्र तत्पूर्वीच ज्यांची रक्कम जमा झाली त्यावर बँका थेट डल्ला मारत आहेत. ती रक्कम इतर कर्जाच्या नावाखाली जमा करून घेत आहेत. शेतकरी बँकेत पैसे काढायला गेल्यावर ही कारणमीमांसा सांगितली जात आहे. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येणार आहे. कारण नवीन कर्ज देण्यासाठीही बँकांची भूमिका उदासीन आहे. शेतकऱ्यांचा राष्ट्रीयीकृत बँकांनी तर पुरता छळ चालविला आहे. या बँकांवर कुणाचेही नियंत्रण न राहिल्याने त्यांचे फावतच आहे.

याबाबत डॉ. पाचपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बँकांनी इतर कर्जात पीकविम्याची रक्कम वळती करू नये, अशी मागणी केली आहे.