शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा दुकानांसाठी दिवसाआडचेच वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:28 IST

हिंगोली : जिल्ह्यात १६ ते ३० मेपर्यंत एक दिवसाआड जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकानांसाठी पूर्वी निश्चित केल्याप्रमाणेच वेळापत्रक कायम ...

हिंगोली : जिल्ह्यात १६ ते ३० मेपर्यंत एक दिवसाआड जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकानांसाठी पूर्वी निश्चित केल्याप्रमाणेच वेळापत्रक कायम ठेवत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शुक्रवारी नवे आदेश काढले आहेत.

१६, १८, २०, २२, २४, २६, २८ व ३० मे या दिवशी किराणा, भाजीपाला, फळे, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारचे अन्न जसे चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी आणि मासे, पाळीव प्राणी खाद्यविक्रेते, पावसाळी हंगाम पूर्व साहित्य विक्रेते यांना सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने उघडता येणार आहेत. दूधविक्रेत्यांना सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकान उघडण्यास परवानगी असेल. ई कॉमर्स, कुरिअर सेवा या दैनंदिन चालू राहतील. बाजार समिती, कृषीसंबंधित दुकाने पूर्वीप्रमाणेच सकाळी ९ ते ६ वेळेत दैनंदिन सुरू राहतील. अत्यावश्यकव्यतिरिक्त जिल्ह्यातील उर्वरित दुकाने व आस्थापना एक दिवसाआड मुभा दिल्याप्रमाणे १६, १८, २०, २२, २४, २६, २८ व ३० रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत केवळ घरपोच सेवा देऊ शकतील. यासाठी त्यांनी तहसीलदारांमार्फत पास उपलब्ध करून घ्यावेत. खानावळ, रेस्टॉरंट यांना केवळ घरपोच सुविधा देण्यासाठी ६ ते १५ मेपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत परवानगी राहील.

कार्यालयीन उपस्थिती पूर्वीप्रमाणेच १५ टक्के अथवा किमान ५ कर्मचारी; तर गरजेनुसार १०० टक्के ठेवता येईल. लग्नासाठी केवळ कोर्ट मॅरेजला परवानगी आहे. खासगी प्रवासी वाहतूक केवळ ई-पास असल्यास ५० टक्क्यांच्या मर्यादेत, तेही अत्यावश्यक कारणासाठी परवानगी राहील. तर खासगी बसेस वाहतूक मनाई केली. आगारातून ही बस सोडता येणार नाही. इतर आगारांच्या बसेस थेट स्थानकात थांबतील. मालवाहतुकीच्या वाहनांना बाहेर राज्यातून माल येत असेल; तर ४८ तास अगोदरची आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा निगेटिव्ह अहवाल सोबत असणे आवश्यक आहे. ते सात दिवसांसाठी वैध मानण्यात येईल.

नोंदणीकृत उद्योग चालू ठेवता येतील. त्यासाठी तहसीलकडून ओळखपत्र घ्यावे लागेल. मात्र राज्य शासनाच्या आदेशानुसार संवेदनशील राज्यातून येणाऱ्या नागरिक अथवा कामगारांसाठी निश्चित केलेले निर्बंध इतर राज्यांतून हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी लागू राहतील. इतर राज्यांतून येणाऱ्या नागरिकांनी ४८ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे; तर ती नसल्यास विलगीकरणात पाठविण्यात येणार आहे.

या आदेशानुसार १५ मे रोजी सकाळी ७ ते दिनांक १ जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत आदेश पाळणे बंधनकारक आहे. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. यात दिरंगाई केल्यास अथवा आदेश न पाळल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

निबंधकांना शिथिलता कायम

वरीलप्रमाणे इतर आस्थापनांना सूट दिल्याच्या दिवशी हिंगोलीसह जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये कार्यालयीन वेळेनुसार चालू राहणार आहेत. यात दस्तनोंदणी व इतर आनुषंगिक व्यवहार करता येणार आहेत.

बँकांत शेतकऱ्यांनाही एक दिवस

बँका आता रोज सुरू राहणार आहेत. मात्र बाजारपेठेला सूट दिल्याच्या दिवशी म्हणजे १६, १८ मे अशा सम तारखेच्या दिवशी व्यापारी व सर्वसामान्यांना सकाळी १० ते ४ या वेळेत ३० तारखेपर्यंत व्यवहारासाठी मुभा दिली आहे. १७, १९, २१, २३, २५, २७, २९ व ३१ मे रोजी शेतकऱ्यांच्या पीककर्जासाठी आवश्यक असणाऱ्या कामांसाठी बँका सुरू राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे एक दिवस मिळाला असल्याने आता बँकांना गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. बँकेतील बीसी व सीएसपीला पूर्णवेळ काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.