शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

३ दिवसांत आगाराचे १० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:46 IST

कोरेगाव भीमा येथील घटनेमुळे मागील ३ दिवसांपासून येथील एस.टी. आगारातून बसेस सोडल्या नाहीत. त्यामुळे तीन दिवसांत आगाराचे १० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आगारप्रमुख एस.ए. आझादे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : कोरेगाव भीमा येथील घटनेमुळे मागील ३ दिवसांपासून येथील एस.टी. आगारातून बसेस सोडल्या नाहीत. त्यामुळे तीन दिवसांत आगाराचे १० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आगारप्रमुख एस.ए. आझादे यांनी दिली.येथील आगारातून २ जानेवारी रोजी फक्त ७ फेºयाच सोडण्यात आल्या. ३ जानेवारी रोजी आगारातून एकही बस सोडली नाही तर ४ रोजी फक्त ९ बस फेºया सोडल्या. या आगारात ३९ बसेस आहेत. दररोज १८४ बसफेºया होतात. आगाराचे दररोजचे उत्पन्न साडेतीन ते चार लाख रुपये येते. बसेस तीन दिवसांपासून बंद असल्याचे आगाराचे १० लाखांचे नुकसान झाले. माजलगाव येथील एका एस.टी. बसची तीन दिवसांपूर्वी तोडफोड केली. एस.टी. बसेस बंद असल्यामुळे बसस्थानकावरची गर्दीही ओसरली आहे. अवैध वाहतुकीच्या वाहनाने प्रवासी प्रवास करत आहेत. ४ जानेवारी रोजी नांदेडसाठी तीन, परभणीसाठी ४ व पुसद मार्गावर बसेस सोडल्या. बसेस केव्हा सुरू होतील, अशी विचारणा प्रवासी करत आहेत. ५ जानेवारीपासून पूर्ववत सर्व बसफेºया सोडण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख आझादे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या बंदमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे अनेकांनी तर बाहेर निघणेच टाळले होते. तर काही खाजगी वाहनांकडे धाव घेत होते.तारांबळ : अनेकांनी टाळले बाहेर पडणेकोरेगाव भीमाच्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्टÑात बंद पाळला आहे. त्याच पार्श्वभूमिवर बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. शिवाय, खाजगी वाहतूकही बंद असल्याने या काळात आगाराचे तर नुकसान झालेच आहे. त्याचबरोबर प्रवाशांचीही मोठी तारांबळ झाली होती. प्रवासी खाजगी वाहनाकडेधाव घेत होते. मात्र मोजक्याच मार्गावरुन वाहतूक सुरु होती. तर जिल्ह्यात ४ जानेवारी रोजी निघलेल्या मोर्चामुळे खाजगी वाहतूक सेवाही ठप्प होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. तर महत्त्वाचे काम असणारेच प्रवासी प्रवास करीत होते.कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्टÑभर बंद पाळण्यात आला होता. परंतु ५ जानेवारीपासून बससेवा सुरु होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.