स्पर्धेची सुरुवात माझी वसुंधरा शपथ घेऊन मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून केली. यावेळी तहसीलदार जीवककुमार कांबळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील, मुख्याधिकारी शैलेश फडसे, नगराध्यक्ष संदीप बहिरे, उपनगराध्यक्ष, कुसुम महाजन, आप्पासाहेब देशमुख इतर नगरसेवक, माणिक पोदार स्कूलचे संचालक विनायक जाधव आणि इतर नागरिक उपस्थित होते.
सायकल स्पर्धा १० किमी अंतराची होती. स्पर्धेचा मार्ग हा नगरपंचायत कार्यालय ते शिवाजी चौक ते तहसील मार्गे कोळसा व परत त्याच मार्गे आजेगाव कॉर्नर ते नगरपंचायत कार्यालयापर्यंत होता. सदर स्पर्धेमध्ये राजेश जाधव-वाशिम यांनी प्रथम क्रमांक पटकावला यांना ३,१०१ रुपये पारितोषिक, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितीय पारितोषिक मिथुन जाधव-वाशिम यांना मिळाले. यांना २,१०१ रु. पारितोषिक, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच तृतीय क्रमांक संतोष भाले सेनगाव यांना १,१०१ रु. पारितोषिक, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. माझी वसुंधरा अभियानातील पंचतत्त्व वायू, अग्नी, जल, पृथ्वी व आकाश या घटकांबाबत व पर्यावरण संवर्धन तसेच सायकलच्या महत्त्वाबाबत संबोधन मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी केले व स्पर्धेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.