शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

कमी विद्यार्थीसंख्येच्या शाळांवरच शिक्षकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:31 IST

हिंगोली : जिल्हा परिषद माध्यमिकच्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यावेळीही पुढे ढकलली आहे. अनेक शाळांवर कमी विद्यार्थीसंख्या असताना एकाच विषयासाठी ...

हिंगोली : जिल्हा परिषद माध्यमिकच्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यावेळीही पुढे ढकलली आहे. अनेक शाळांवर कमी विद्यार्थीसंख्या असताना एकाच विषयासाठी दोन-दोन शिक्षक आहेत. तर काही शाळांत एकही शिक्षक नाही. बदल्यांद्वारे ही तफावत दूर का केली जात नाही? असा सवाल माध्यमिक शिक्षकांतून केला जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास २६ शाळांमध्ये माध्यमिक विभाग आहे. मात्र, यातील अनेक शाळांमध्ये आता विद्यार्थीसंख्या घटली आहे. विशेषत: शहरी भागात हा प्रकार प्रकर्षाने घडला आहे. तर ग्रामीण भागात विद्यार्थी असूनही शिक्षक नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हिंगोली येथील जिल्हा परिषद कन्या बहुविध प्रशाला, औंढा जिल्हा परिषद शाळा, कुरुंदा, हयातनगर अशा ठरावीक शाळांवरच शिक्षकांची गर्दी झाली आहे. यापैकी काही शाळांत तर विद्यार्थीसंख्या १०० पेक्षा खाली आली आहे. मात्र, एकाच विषयाला दोन-दोन शिक्षक आहेत. तर कळमनुरी तालुक्यातील वाकोडी, येहळेगाव तुकाराम या शाळा एकाच शिक्षकावर चालत आहेत. शेवाळा येथे गणिताचा शिक्षक अद्याप मिळाला नाही. नर्सी नामदेव येथे विज्ञानासाठी शिक्षक नाही. मग या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार कशी? हा प्रश्न आहे.

याबाबत शिक्षण सभापती महादेव एकलारे यांना विचारले असता ते म्हणाले, विद्यार्थीसंख्येनुसार शिक्षक असण्यासोबतच जेथे विषय शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, अशा ठिकाणी शिक्षक देण्याचा प्रयत्न केला जाईल. विद्यार्थी असूनही शिक्षक नसतील तर अशावेळी प्रशासनाचा बदल्यांचा अधिकार वापरून जागा भरण्याबाबत प्रशासनाशीही चर्चा केली आहे. यावर मार्ग काढला जाईल.