शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
2
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
3
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
4
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
5
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
6
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
7
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
8
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
9
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
10
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
11
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
12
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
13
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
14
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
15
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
16
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
17
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
18
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
19
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
20
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!

वाण खरेदीसाठी बाजारात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी हिंगोली : शहरातील शिवाजीनगर, कापड गल्ली, शास्त्रीनगर आदी भागांमध्ये मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच ...

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

हिंगोली : शहरातील शिवाजीनगर, कापड गल्ली, शास्त्रीनगर आदी भागांमध्ये मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे बंद पडू लागली आहेत. महावितरण कंपनीने याची वेळीच दखल घेऊन शहरातील वीजपुरवठा सुरळीत करून ग्राहकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

कळमनुरी बसस्थानकात कचऱ्याचे ढीग

कळमनुरी : शहरातील कळमनुरी बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच कचरा टाकला जात आहे. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

अवैध वाहतूक बंद करण्याची मागणी

कळमनुरी : तालुक्यात अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे छोटे-मोठे अपघातही होत आहेत. अवैध वाहतूक बंद करण्यात यावी, असे वेळोवेळी संबंधित विभागाला सांगण्यात आले; परंतु अद्यापतरी कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. दुसरीकडे अवैध वाहतूक वाढल्याने एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात घट होत आहे. पोलिसांनी तालुक्यातील अवैध वाहतूक बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हरभरा, गहू पीक जोमाता

आखाडा बाळापूर : यावर्षी तालुक्यात मुबलक प्रमाणात पाऊस झाला. विहिरी व तलाव भरले आहेत. रबी हंगामातील गहू व हरभरा सद्य:स्थितीत ग्रामीण भागात जोमात असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पाण्यामुळे हरभरा व गव्हाचे क्षेत्रही वाढले आहे. एकंदर पाण्याची मुबलकता असल्यामुळे रबी पिके चांगली येेतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतुकीला अडथळा

कळमनुरी : शहरातील मुख्य रस्त्यावर काही दिवसांपासून अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. बहुतांश वेळा वाहनचालकांचे वादही होत आहेत. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन वाहतुकीची कोंडी सोडवावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

रस्त्यावर खड्डे : वाहनचालक त्रस्त

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते वारंगा यादरम्यान रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून, वाहनांचे नुकसान होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

गतिरोधकाची मागणी

हिंगोली : शहरातील विश्रामगृहाजवळ वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही वाहनचालक वेगाने वाहने चालवीत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन या वर्दळीच्या रस्त्यावर गतिरोधक बसवून वाहनांचा वेग कमी करावा, अशी मागणी होत आहे.