शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाण खरेदीसाठी बाजारात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी हिंगोली : शहरातील शिवाजीनगर, कापड गल्ली, शास्त्रीनगर आदी भागांमध्ये मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच ...

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

हिंगोली : शहरातील शिवाजीनगर, कापड गल्ली, शास्त्रीनगर आदी भागांमध्ये मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे बंद पडू लागली आहेत. महावितरण कंपनीने याची वेळीच दखल घेऊन शहरातील वीजपुरवठा सुरळीत करून ग्राहकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

कळमनुरी बसस्थानकात कचऱ्याचे ढीग

कळमनुरी : शहरातील कळमनुरी बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच कचरा टाकला जात आहे. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

अवैध वाहतूक बंद करण्याची मागणी

कळमनुरी : तालुक्यात अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे छोटे-मोठे अपघातही होत आहेत. अवैध वाहतूक बंद करण्यात यावी, असे वेळोवेळी संबंधित विभागाला सांगण्यात आले; परंतु अद्यापतरी कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. दुसरीकडे अवैध वाहतूक वाढल्याने एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात घट होत आहे. पोलिसांनी तालुक्यातील अवैध वाहतूक बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हरभरा, गहू पीक जोमाता

आखाडा बाळापूर : यावर्षी तालुक्यात मुबलक प्रमाणात पाऊस झाला. विहिरी व तलाव भरले आहेत. रबी हंगामातील गहू व हरभरा सद्य:स्थितीत ग्रामीण भागात जोमात असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पाण्यामुळे हरभरा व गव्हाचे क्षेत्रही वाढले आहे. एकंदर पाण्याची मुबलकता असल्यामुळे रबी पिके चांगली येेतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतुकीला अडथळा

कळमनुरी : शहरातील मुख्य रस्त्यावर काही दिवसांपासून अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. बहुतांश वेळा वाहनचालकांचे वादही होत आहेत. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन वाहतुकीची कोंडी सोडवावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

रस्त्यावर खड्डे : वाहनचालक त्रस्त

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते वारंगा यादरम्यान रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून, वाहनांचे नुकसान होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

गतिरोधकाची मागणी

हिंगोली : शहरातील विश्रामगृहाजवळ वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही वाहनचालक वेगाने वाहने चालवीत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन या वर्दळीच्या रस्त्यावर गतिरोधक बसवून वाहनांचा वेग कमी करावा, अशी मागणी होत आहे.