शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

वाण खरेदीसाठी बाजारात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी हिंगोली : शहरातील शिवाजीनगर, कापड गल्ली, शास्त्रीनगर आदी भागांमध्ये मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच ...

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

हिंगोली : शहरातील शिवाजीनगर, कापड गल्ली, शास्त्रीनगर आदी भागांमध्ये मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे बंद पडू लागली आहेत. महावितरण कंपनीने याची वेळीच दखल घेऊन शहरातील वीजपुरवठा सुरळीत करून ग्राहकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

कळमनुरी बसस्थानकात कचऱ्याचे ढीग

कळमनुरी : शहरातील कळमनुरी बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच कचरा टाकला जात आहे. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

अवैध वाहतूक बंद करण्याची मागणी

कळमनुरी : तालुक्यात अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे छोटे-मोठे अपघातही होत आहेत. अवैध वाहतूक बंद करण्यात यावी, असे वेळोवेळी संबंधित विभागाला सांगण्यात आले; परंतु अद्यापतरी कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. दुसरीकडे अवैध वाहतूक वाढल्याने एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात घट होत आहे. पोलिसांनी तालुक्यातील अवैध वाहतूक बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हरभरा, गहू पीक जोमाता

आखाडा बाळापूर : यावर्षी तालुक्यात मुबलक प्रमाणात पाऊस झाला. विहिरी व तलाव भरले आहेत. रबी हंगामातील गहू व हरभरा सद्य:स्थितीत ग्रामीण भागात जोमात असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पाण्यामुळे हरभरा व गव्हाचे क्षेत्रही वाढले आहे. एकंदर पाण्याची मुबलकता असल्यामुळे रबी पिके चांगली येेतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतुकीला अडथळा

कळमनुरी : शहरातील मुख्य रस्त्यावर काही दिवसांपासून अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. बहुतांश वेळा वाहनचालकांचे वादही होत आहेत. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन वाहतुकीची कोंडी सोडवावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

रस्त्यावर खड्डे : वाहनचालक त्रस्त

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते वारंगा यादरम्यान रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून, वाहनांचे नुकसान होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

गतिरोधकाची मागणी

हिंगोली : शहरातील विश्रामगृहाजवळ वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही वाहनचालक वेगाने वाहने चालवीत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन या वर्दळीच्या रस्त्यावर गतिरोधक बसवून वाहनांचा वेग कमी करावा, अशी मागणी होत आहे.