शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

जात प्रमाणपत्रासाठी ‘सामाजिक न्याय’मध्ये गर्दी; मास्कचा पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST

जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. २३ डिसेंबरपासून जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होऊ घातली आहे. २३ डिसेंबरपासून ...

जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. २३ डिसेंबरपासून जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होऊ घातली आहे. २३ डिसेंबरपासून ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. २२ ते २४ डिसेंबर या काळात जात प्रमाणपत्राचे ८०० अर्ज प्राप्त झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सामाजिक न्या विभागाच्या वतीने सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळा रांगेत अर्ज भरा व प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहनही करण्यात येत आहे, असे संशोधन अधिकारी गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दोन पोलिसांची नियुक्ती केली आहे. परंतु, नियुक्त केलेल्या दोन पोलिसांना कोणीही जुमानत नव्हते. रांगेतही उमेदवारांनी मास्कचा वापर केलेला पहायला मिळत नव्हता. सामाजिक आंतराचा फज्जा उडालेलाही या ठिकाणी पहायला मिळाला. कोरोना काळात तरी प्रशासनाने काळजी घेणे आवश्यकता आहे.

विद्यार्थी येत आहेत प्रमाणपत्रासाठी

हिंगोली: जिल्ह्यात काही ठिकाणी शाळ, महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत आहेत. जात प्रमाणपत्राचे अर्ज दिल्यानंतर ते लगेच निघूनही जात आहेत. नंतर मात्र ग्रा. पं. उमेदवारच राहत आहेत.

भावी उमेदवारांना मास्कचा विसर

हिंगोली: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जातप्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जिल्ह्यातून ग्रा. पं. चे भावी उमेदवार कार्यालयात येवून प्रमाणपपत्र सादर करत आहेत. परंतु, मास्कचा वापर कोणीही केलेला नव्हता. सामाजिक आंतरही कोणीही ठेवलेले पहायला मिळाले नाही.

हिंगोली : जिल्ह्यात २३ डिसेंबरपासून ग्रामपंचायत उमेदवारीसाठी जात प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रांची आवश्यकता असल्याने सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत अर्ज स्वीकारले जात आहेत. २२ ते २३ डिसेंबर या तीन दिवसांच्या काळात जवळपास ८०० अर्ज जात पडताळणीसाठीचे तपासले आहेत. यापुढे शासकीय सुटीलाही कायर्यालय सुरुच राहणार आहे.

- गीता गुठ्ठे, संशोधन अधिकारी, जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, हिंगोली