शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मयत शेतकऱ्याच्या नावावर उचलले पीक कर्ज; १३ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:22 IST

वसमत : येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून मयत शेतकऱ्याच्या नावावर पीक कर्ज उचलल्या प्रकरणी १३ जणांविरोधात वसमत पोलीस ...

वसमत : येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून मयत शेतकऱ्याच्या नावावर पीक कर्ज उचलल्या प्रकरणी १३ जणांविरोधात वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका कार्यकर्त्याने माहिती अधिकाराद्वारे वर्षभर पाठपुरावा केल्याने ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात युनियन बँक व्यवस्थापक, तलाठी, मंडळ अधिकारी, दुय्यम निबंधक यांच्यासह १३ जण आरोपी आहेत.

वसमत तालुक्यातील चोंडीतर्फे सेंदुरसना येथील कणीराम नामदेव राठोड हे ४ जून २००५ रोजी मयत झाले आहेत. मात्र त्यांच्या नावावर १९ नोव्हेंबर २०१८ रोजी युनियन बँकेतून कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार घडला. विशेष म्हणजे हा प्रकार मयताच्या मुलांनाही माहिती नाही. सातबारावर कर्जाचा बोजाही टाकण्यात आला. याप्रकरणी वसमत येथील म. नदाफ बशीर खान यांनी संबंधिताची माहिती घेतली असता मयताच्या नावाने परस्पर बँकेत खाते उघडण्यात आले. मयताचे आधारकार्ड, पॅनकार्ड ही बनावट काढण्यात आले. या माहितीच्या आधारे युनियन बँकेच्या व्यवस्थापकाने १ लाख ५ हजारांचे कर्ज दिले असल्याचे समोर आले. याप्रकरणी तक्रार दिलीय; मात्र पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ सुरू केली होती. पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे याप्रकरणी सतत पाठपुरावा केला. लोकशाही दिनातही तक्रार दिली. तरीही या गंभीर प्रकरणात नेहमीच चालढकलच होत होती. मात्र तक्रारदाराने पाठपुरावा सुरूच ठेवल्याने अखेर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

याप्रकरणी वसमत युनियन बँकेचे व्यवस्थापक, बँकेचे कर्ज वितरण व्यवस्थापक, रोखपाल, बँक खाते तपासणीस, खाते उघडण्याचे दोन साक्षीदार, मुद्रांक विक्रेता, चोंढीतर्फे सेंदुरसनाचे तलाठी वाघिले, मंडळ अधिकारी अंभोरे, दुय्यम निबंधक नोंदणी अधिकारी डफडे, बनावट आधारकार्ड तयार करून देणारे व्यक्ती, बनावट पॅनकार्ड तयार करणारे व्यक्ती अशा १३ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयताच्या नावावर पीक कर्ज देण्याच्या प्रकरणांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला असला तरी अखेर गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे तपास करत आहेत.

याप्रकरणी तक्रारदार म. नदाफ बशीर खान यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सतत वर्षभर पाठपुरावा केला. सरळ बनावट कर्ज प्रकरण असतानाही कोणी दखल घेत नव्हते. याबाबत लोकमतने पाठपुरावा केल्याने प्रशासन जागी झाले. आता आरोपींना फरार दाखवून अटकपूर्व जमानतीची संधी न देता अटक करुनच चौकशी झाली पाहिजे, तरच बनावट कर्ज प्रकरणाचे रॅकेट समोर येऊ शकते. अन्यथा फरार दाखवून आरोपींना पुन्हा मोकळे सोडण्याचे प्रकार होण्याची भीती आहे.