शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

अतिगंभीर रुग्णांच्या नातेवाइकांची ओरड कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST

हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात तीनशेपेक्षा जास्त गंभीर रुग्ण आहेत. त्यात ५० पेक्षा जास्त रुग्णांची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. काहींना ...

हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात तीनशेपेक्षा जास्त गंभीर रुग्ण आहेत. त्यात ५० पेक्षा जास्त रुग्णांची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. काहींना तर जागचेही हलता येत नाही. अशा परिस्थितीत या रुग्णांना काही लागले तर त्यांची विचारपूस करण्यासाठी नातेवाईक तरी सोबत असायचे. मात्र काहीजणांनी सकाळी एक, दुपारी दुसरा, तर सायंकाळी तिसराच नातेवाईक सोबत ठेवण्याचा प्रकार चालविला. तसेच हे सर्व बाहेर येऊन समाजात मिसळतही असल्याने प्रशासनाने हेच कारण पुढे करून सर्वच रुग्णांच्या नातेवाइकांना तेथून हाकलले. काहींना लिंबाळा येथे क्वारंटाईन केले. काहीजण दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर झाले. काहींचे इतर नातेवाईक चकरा मारीत आहेत. मात्र त्यांना आता थांबू दिले जात नसल्याने ओरड वाढली आहे. अनेकजण यावरून आमचा रुग्ण आधीच अतिगंभीर परिस्थितीत आहे. तो दगावला कसा? असा सवाल करून भांडावून सोडत आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनीच कडक भूमिका घेतल्याने आता यापुढे कुणाचेही काही चालत नाही. रात्रीच्या वेळी रुग्णांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते, असाही आरोप रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.

... तर फौजदारी दाखल करू

नातेवाइकांनी रुग्णासमवेत थांबणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही. यापुढे तर अशा लोकांवर थेट फौजदारी कारवाई करू. अतिगंभीर रुग्णांना जागचे हलता येत नसेल तर त्यांना अडल्ट डायपर दिले जाईल. त्यासाठी वाॅर्डबाॅय नेमले आहेत. आमच्या कर्मचाऱ्यांच्याही हालचालींवर आमचे लक्ष आहे. रुग्णांची देखभाल करणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. जर नातेवाइकांना हे करावे लागत असेल तर आमची यंत्रणा कशासाठी आहे? या यंत्रणेने व्यवस्थित लक्ष न दिल्यास कारवाई करू. त्यामुळे नातेवाइकांनी रुग्णांची चिंता करू नये, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले.

मग नेत्यांसाठी कोरोना वाॅर्ड पर्यटनस्थळ आहे का?

रुग्णांच्या नातेवाइकांना आतमध्ये प्रवेश करू दिला जात नाही. मात्र पुढारी, नेतेमंडळी आपल्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेऊन आतमध्ये जातात. शिवाय अनेकजण गल्लीबोळांतील कार्यकर्तेही आजकाल रुग्णालयात जाऊन मदत केल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकतात. या सर्वांना प्रवेश मिळतो. मग ते काय पर्यटनस्थळ म्हणून दौरा करीत आहेत का? त्यांच्यामुळे कोरोना पसरत नाही का? आम्हीच काय घोडे मारले? असा सवाल एकाने नाव न छापण्याच्या अटीवर केला.

एक ठरावीक नातेवाईक ठेवण्यास परवानगी द्यावी

जे रुग्ण बायपॅप किंवा व्हेंटिलेटरवर आहेत ते आपल्या जागेवरून हलू शकत नाहीत. चालले तर त्यांना चक्कर येते. ते जर चालले तर धोका होऊ शकतो. शिवाय कितीही म्हटले तरीही नातेवाइकांशिवाय इतर कुणी डायपर बदलू शकत नाही. जेवण देणारा, नाष्टा देणारा, चहावाला बेडजवळ जाऊन जेवण देत नाही. ते घ्यावेच लागते. तेच जर नातेवाईक जवळ असल्यास ते जेवण घेऊन खाऊ घालतात. या आजारात भूक अत्यंत मंदावते. त्याला जबरीने खाऊ घालावे लागते. हे नर्सेस करू शकत नाहीत. बाहेरून औषधेही मागवावी लागतात. या आजारात नातेवाईक सोबत राहणे चुकीचे आहे. मात्र एखादा नेमून दिलेला नातेवाईक योग्य नियम पाळून, रुग्ण सोडताना कोरोनाची चाचणी करण्याच्या अटीवर ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी डॉ. गजानन धाडवे यांनी केली.