शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : पुन्हा पंधरा दिवसांसाठी वाढविली टाळेबंदी; ई-कॉमर्स व कृषीशी संबंधित दुकानांसाठी शिथिलता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 19:36 IST

नोंदणीकृत उद्योग सुरू ठेवण्यासाठी, कर्मचारी, कामगारांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी तहसीलदारांकडून ओळखपत्र घेणे आवश्यक असणार आहे.

हिंगोली : जिल्ह्यात १ मेपर्यंत आधीच टाळेबंदी लागू होती. आता त्याचा कालावधी १५ मेपर्यंत वाढविण्यात आला असून कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तसे आदेश काढले आहेत. यामध्ये ई-कॉमर्स व कृषीशी संबंधित काही दुकानांना तेवढी शिथिलता दिली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. १४ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले होते. त्यामुळे २५ एप्रिलच्या दुपारी १ वाजल्यापासून ते १ मे २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. त्यातील जवळपास बाबी कायम ठेवून आता १५ मेपर्यंत संचारबंदी व टाळेबंदी कायम ठेवण्यात आली आहे. या कालावधीत सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते ९ या वेळात दूध विक्री केंद्र सुरू ठेवता येणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील बाजार समित्या, कृषी संबंधित सर्व दुकाने जसे खते, बियाणे, कृषी साहित्य अवजारे, गॅरेज, टायर विक्री व दुरुस्ती दुकाने, मोंढा आदी दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

असा आहे आदेश- किराणा दुकाने, भाजीपाला, फळ विक्री दुकाने, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारचे अन्न विक्रेते, कृषी दुकाने, शेतमाल, पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगाम पूर्ण साहित्य विक्रेते यांची दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत.

- कोविड १९ संबंधित अत्यावश्यक सेवेची कार्यालये वगळून इतर शासकीय कार्यालयात एकूण कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के किंवा ५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तेवढे कर्मचारी उपस्थित राहतील. १५ टक्केपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थिती ठेवणे आवश्यक असल्यास परवानगी घ्यावी लागणार आहे. अत्यावश्यक सेेवेसंबंधित प्रत्याक्षात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमीत कमी ठेवावी. परंतु, १०० टक्के पर्यंत आवश्यकतेनुसार ठेवता येणार आहे.

- लग्न सोहळे केवळ नोंदणी पद्धतीने पार पाडता येतील. अन्य कोणत्याही ठिकाणी लग्न सोहळे आयोजित करण्यास प्रतिबंध असणार आहेत.

- अत्यावश्यक सेवा किंवा वैध कारणासाठी खासगी प्रवासी वाहतूक ५० टक्केच्या मर्यादेपर्यंत प्रवास करता येईल. मात्र, जिल्हा अंतर्गंत किंवा शहरात प्रवास करता येणार नाही.

- वैद्यकीय कारणासाठी किंवा अंत्यविधी, गंभीर आजारी व्यक्तीसाठी परवानगी घेऊन प्रवास करता येणार आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन केल्यास दहा हजारांचा दंड लावण्यात येणार आहे.

- जिल्ह्यातील एसटी आगारातील सर्व बसेस बंद राहतील. मात्र, इतर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस केवळ शासकीय बसस्थानकात थांबतील.

- केवळ शासकीय कामकाजासाठी व व्यापाऱ्यांच्या व्यवहारासाठी बँका सुरू ठेवता येणार आहेत. मात्र,नागरिकांच्या व्यवहारास बंदी असेल.

- नोंदणीकृत उद्योग सुरू ठेवण्यासाठी, कर्मचारी, कामगारांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी तहसीलदारांकडून ओळखपत्र घेणे आवश्यक असणार आहे.

- सह दुय्यम निबंधक वर्ग १ व २ ही कार्यालये केवळ कार्यालयीन कामकाज करण्यासाठी चालू राहतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोली