शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सर्व आस्थापनांना दरमहा कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST

हिंगोली : राज्यातील ज्या सात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यात हिंगोलीचा समावेश झाला आहे. कमी प्रमाणात होणाऱ्या चाचण्यांमुळे ...

हिंगोली : राज्यातील ज्या सात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यात हिंगोलीचा समावेश झाला आहे. कमी प्रमाणात होणाऱ्या चाचण्यांमुळे हा प्रकार घडल्याने सर्व शासकीय, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाने दरमहा अँटिजन व आरटीपीसीआर चाचणी करणे बंधकारक करण्याची सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार आदींची उपस्थिती होती.

सूर्यवंशी म्हणाले, राज्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णत्वाने ओसरलेली नाही. तसेच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात कोरोनाचा नवा विषाणू दिसून आला आहे. त्याची घातकता, परिणामकारकता आज आपल्याला माहिती नाही; पण संभाव्य धोका लक्षात घेऊन आता आपल्या हातात जो वेळ आहे त्या कालावधीत योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. राज्यातील संवेदनशील सात जिल्ह्यांत हिंगोली आहे. दररोज केवळ २०० ते २५० तपासण्या होत असल्याने कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट कमी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे; परंतु ही बाब आपल्या जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा प्रादुर्भाव वाढल्यास पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. हे संकट टाळायचे असेल तर प्रत्येकाने आपली तपासणी करून लसीकरण करून घ्यावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि आयसोलेशन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, सर्व व्यापारी व आस्थापना मालक/दुकानदार व त्यांच्या आस्थापनेवर काम करणारे सर्व कर्मचारी यांनी येणाऱ्या ३ दिवसांत आरोग्‍य विभागामार्फत लावण्यात आलेल्या कॅम्पवर जाऊन अँटिजन व आरटीपीसीआर तपासणी करून घ्याव्यात तसेच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंध कायदा १८९७, भारतीय दंडसंहिता कलम १८८ नुसार कार्यवाही केली जाईल, असा इशाराही दिला. जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे; परंतु जिल्ह्याला लस उपलब्ध असूनही हवा तसा प्रतिसाद मिळत नाही; तसेच १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू झाले असून लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.