शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कोरोना, डेंग्यूची लक्षणे वेगळी; तातडीने करून घ्या इलाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

हिंगोली : कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी, रुग्ण आढळून येत असल्यामुळे अजूनही नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला आरोग्य ...

हिंगोली : कोरोना महामारी ओसरत चालली असली तरी, रुग्ण आढळून येत असल्यामुळे अजूनही नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. दुसरीकडे कोरोना आजार कोरोना विषाणूमुळे होतो, तर डेंग्यू डास चावल्यामुळे होतो, हेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

पावसाळा सुरू होऊन दीड-दोन महिने झाले आहेत. तेव्हा नागरिकांनी आपले अंगण व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाचे काम आहे. अस्वच्छतेमुळे परिसरात डासांची संख्या वाढते. या डासामुळेच डेंग्यू आजार उत्पन्न होतो. एकदा डास चावला की ताप येणे सुरू होते. तसेच इतर व्याधींना सामोरे जावे लागते.

पावसाळ्यात आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा, असे आवाहन आरोग्य विभाग वारंवार करते. परंतु काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना डेंग्यूसारख्या आजाराला सामोरे जावे लागते, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन गावोगावी औषध फवारणी करून घेण्यात येत आहे.

२०१९ मध्ये १४० रक्त नमुने घतले, त्यात ५ दूषित, २०२० मध्ये ४८ रक्त नमुने घेतले, त्यात २ दूषित, तर २०२१ (जुलैपर्यंत) १६ जणांचे रक्त नमुने तपासले, परंतु रुग्ण मात्र आढळला नाही, असे आरोग्य विभागाने सांगितले.

डेंग्यूचे रूग्ण...

२०१९ - ०५

२०२० - ०२

२०२१ (जुलैपर्यंत) ००

चाचणी कुठली...

कोरोना आजार हा विषाणूमुळे होतो. कोरोनासाठी आरटीपीसीआर आणि अँटिजन तपासणी करणे आवश्यक आहे. याचबरोबर मास्क घालणे, सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आणि सामाजिक अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे नागरिका़ंनी पालन करणे आवश्यक आहे.

डेंग्यूसाठी चाचण्यांची गरज नसली तरी, रक्त नमुने देणे आवश्यक आहे. आजार वेगळे असले तरी जागोजागी स्वच्छता ठेवणे दोन्हीसाठी महत्त्वाचे आहे. काळजी घेतल्यास कोणताच आजार जवळ येत नाही.

प्राथमिक लक्षणे सारखीच....

सर्दी, खोकला आणि ताप ही प्राथमिक लक्षणे जवळपास सारखीच आहेत. फरक एवढाच, करोना विषाणूमुळे होतो, तर डेंग्यू डासामुळे होतो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी उकळून पिणे दोन्ही आजारांसाठी चांगलेच आहे.

रोज पाणी उकळून प्या, डासापासून सावध राहा....

पावसाळ्यात शहर असो वा ग्रामीण भाग, नळाला पाणी दूषित येते. त्यामुळे नागरिकांनी पाणी रोजच्या रोज उकळून प्यावे. वातावरणातील दूषितपणा लक्षात घेऊन घरातील सर्व सदस्यांना उकळलेले पाणी पिण्यास द्यावे. पावसाळ्यात बाहेरचे उघड्यावरील कोणतेही अन्नपदार्थ नागरिकांनी खाऊ नयेत. या उघड्या पदार्थांवर माशा बसतात. तसेच इतर जीवजंतू बसून उघड्यावरील अन्नपदार्थ खराब करतात.

कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता अँटिजन व आटीपीसीआर चाचणी नागरिकांनी न विसरता करून घ्यावी. दुसरीकडे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी उकळूनच प्यावे. आजार वेगळे असले तरी, लक्षणे जवळपास सारखीच आहेत. तेव्हा स्वत:ची व इतरांची काळजी घ्यावी. लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा हिवताप अधिकारी