शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

कोरोनानंतर बदलले घराघरातील किचन; हेल्दी पदार्थ वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

हिंगोली : कोरोना संसर्गाने मानवी जीवनच ढवळून काढले आहे. प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेत असून, हेल्दी पदार्थ खाण्याकडे कल ...

हिंगोली : कोरोना संसर्गाने मानवी जीवनच ढवळून काढले आहे. प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेत असून, हेल्दी पदार्थ खाण्याकडे कल वाढला आहे, त्यामुळे स्वयंपाक घरातील दररोजच्या मेनूतही बदल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यात कोरोनाने सर्वत्र थैमान घातले होते. जवळपास १५ हजार ८८१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभाग, प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्याने यातील तब्बल १५ हजार ४१८ रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत असल्याने प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे. फास्ट फुड ऐवजी हेल्दी पदार्थ खाण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. कोरोनानंतर तर प्रत्येक घरातील किचनमधील मेनू बदलले आहेत. प्रामुख्याने जेवणात रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जात आहे. आठवड्यातून कधीतरी पालेभाज्या खाणाऱ्या घरीही आता नियमित पालेभाज्या आहारात घेतल्या जात आहेत. दुग्धजन्य पदार्थांचेही नियमित सेवन केले जात असल्याचे महिलांमधून सांगण्यात आले.

कच्चा भाज्या, कडधान्ये...

-रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकडे सर्वच जण लक्ष देत आहेत. सकाळी मोड आलेले कडधान्य तसेच जेवणासोबत काकडी, टोमॅटो, गाजर, बीटरूट, कोबी, मेथीची भाजी आदी भाज्या घेतल्या जात आहेत. त्यामुळे बहुतांश महिला स्वयंपाकघरात भाज्या व मोड आलेले कडधान्य ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी राेजच्या जेवणात हे हवेच

सकाळी गुळवेलाचा काढा, मोड आलेले कडधान्य घेतलेले चांगले असते, तसेच सकाळच्या जेवणात वरण-भात, पोळी भाजी, लिंबू किंवा दही असावे.

दुपारी कोणतेही एखादे फळ खावे. त्यानंतर साडेचारच्या सुमारास गुळासोबत, शेंगदाणे, वाटाणे किंवा थोडेसे फुटाणे घ्यावेत.

सायंकाळच्या जेवणात वरण-भात, पोळी, भाजी असावी, तसेच रात्री हळदीचा काढा घेतल्यास उत्तम. मांसाहार करणाऱ्यांनी आठवड्यातून एक किंवा दोन दिवस चिकन, मटन, मच्छी यांपैकी कोणताही मांसाहार घेतल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरते.

- सुप्रिया इंगोले, आहार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, हिंगोली.

फास्ट फुडवर अघोषित बंदी

कोरोनामुळे आता पोष्टीक पदार्थ दररोजच्या खाण्यात घेतले जात आहेत. त्यामुळे फास्ट फूड खाण्याकडे दुर्लक्ष होत आहे. तळलेले पदार्थ, केक, आईस्क्रीम, चिप्स आदी ऐवजी हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीटरूट आदींचा आहारात समावेश केला जात आहे.

गृहिणी म्हणतात...

कोरोनामुळे दररोजच्या आहारात बदल झाला असून, आता फास्ट फूड ऐवजी घरीच बनविलेल्या जेवणाला पसंती दिली जात आहे. जेवणाच्या वेळाही पाळल्या जात आहेत. हिरव्या पालेभाज्यांचाही समावेश आहारात होत आहे.

- पूजा सुमित चौधरी

कोरोनामुळे आता आरोग्याची खूपच काळजी घेतली जात आहे. आहारातही हेल्दी पदार्थ वाढले आहेत. त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होत आहे. मागील काही दिवसांपासून फास्ट फूड खाणे बंद केले आहे.

- श्रृती मयूर कयाल

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात पौष्टिक अन्न पदार्थांचा समावेश वाढला आहे. हिरव्या पालेभाज्यासह मोड आलेले कडधान्यही नियमित सेवन केले जात आहे.

-सरिता अनिल नेणवाणी.