शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

कोरोना पावला; आठवीपर्यंतचे एक लाख ७३ हजार विद्यार्थी विनापरीक्षा पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST

यंदा आधीच शाळा भरल्या नाहीत. काही वर्ग भरले तर तेही काही काळच सुरू राहिले. त्यातही पालकांची मानसिकता होईपर्यंत कोरोनाचे ...

यंदा आधीच शाळा भरल्या नाहीत. काही वर्ग भरले तर तेही काही काळच सुरू राहिले. त्यातही पालकांची मानसिकता होईपर्यंत कोरोनाचे पुनरागमन झाले. काही ठिकाणी शाळांतच कोरोनाचा व्हायरस घुसल्याचे निमित्त झाले आणि शाळांची टाळेबंदी पुन्हा सुरू झाली. ऑनलाइन अभ्यासक्रम घेतला जात आहे. मात्र, तो विद्यार्थ्यांच्या किती पचनी पडला, याचे काहीच मूल्यमापन नाही. आता मूल्यमापनाची संधीही हिरावली गेली आहे. तर, सध्या कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. रुग्णसंख्या एवढी वाढली की, आरोग्य यंत्रणा अपुरी पडण्याची भीती आहे. त्यामुळे या काळात परीक्षा होत नसल्याचा पालकांना व मुलांनाही आनंद होत आहे. मात्र, मुलांची गुणवत्ता ही बाब त्यांच्यासाठी चिंतेची बनली आहे.

एकतर शाळा पूर्णवेळ चालली नाही. ऑनलाइन शिक्षणात मुले कुठे आहेत, याची चिंता वाटते. त्यात ही परीक्षा रद्द झाली. शासनाने हा चांगला निर्णय घेतला. मात्र, संस्थांनी कमी खर्चात सगळे भागवल्याने त्यांनी शुल्कही कमी करावे, ही अपेक्षा आहे. यावरही निर्णय घेतला तर पालकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल.

अभय भरतीया, पालक

यंदा कोरोनामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्यच उरले नाही. शाळा नाही, परीक्षा नाही, असा आनंदीआनंद आहे. कोरोनामुळे शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य वाटतो. मात्र, ऑनलाइन परीक्षांचा उपाय योजला पाहिजे होता. यात मुलांची गुणवत्ता तरी समोर आली असती.

हरीष कीर्तिवार, पालक

कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. त्यामुळे पालक म्हणून एकीकडे परीक्षा व्हावी वाटत असले, तरीही हा योग्य व स्वागतार्ह निर्णय आहे. जसे वर्ग ऑनलाइन भरले, तशाच पद्धतीने परीक्षाही घेतल्या पाहिजे. यामुळे मुलांना परीक्षेची सवय राहील. मागील वर्षीही परीक्षा रद्द झाल्या होत्या.

सचिन बेलोकर, पालक

शासनाने परीक्षा रद्द करणे अयोग्य आहे. एकीकडे गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करायला सांगितले जातात. दुसरीकडे अनेक मुले ऑनलाइन किंवा ऑफलाइन वर्गच करू शकले नाहीत. त्यांना आता थेट पुढील वर्गात प्रवेश दिल्यास त्यांची शैक्षणिक हत्या केल्यासारखे शिक्षण खाते करीत आहे. अनेक गोरगरिबांची मुले ऑनलाइन शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यांना पुन्हा त्याच वर्गात शिक्षण देऊन मूळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे.

दिलीप बांगर, शिक्षण संस्थाचालक

शासनाने कोरोनामुळे परीक्षा रद्द केल्या, हा निर्णय योग्य आहे. सध्याची परिस्थितीही तेवढी गंभीर आहे. मात्र, यामुळे गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. शाळा ऑनलाइन झाल्या. काही ठिकाणी त्याही नव्हत्या. त्यामुळे गुणवत्तेबाबत मात्र चिंतेची परिस्थिती आहे.

शिवाजी पवार, शिक्षणतज्ज्ञ

पहिली -२२८५२

दुसरी -२३१८७

तिसरी-२२११२

चौथी -२१८७४

पाचवी-२१३४२

सहावी-२१०३४

सातवी-२०७४०

आठवी-२०५३५