शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

कोरोनाने पालक गमावलेल्या ८० बालकांना मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST

हिंगोली : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना आधार देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या ...

हिंगोली : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना आधार देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आतापर्यंत ८० बालकांना प्रतिमहिना ११०० रुपये देण्यात येत आहे. जिल्ह्यात एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या १३२ असून ३ बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. आतापर्यंत १६ हजार २९ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १५ हजार ६३७ रुग्ण बरे झाले असले, तरी ३९२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाने अगोदरच रोजगारासह विविध प्रश्न निर्माण झाले होते. त्यात ० ते १८ वर्षे वयोगटातील १३५ बालकांचा आधारच निघून गेल्याने त्यांच्यासमोर भविष्याचा प्रश्न उभा ठाकला होता. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन्ही पालकांचा आई आणि वडील यांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांच्या संगोपनासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठीत करण्यात आले आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती संकलित करणे. बालकांना सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून देणे. अशी बालके बालकामगार, बालभिक्षेकरी, अनैतिक मानवी वाहतूक, मानवी तस्करी, बेकायदेशीर दत्तकविधान यास बळी पडणार नाहीत, याची काळजी घेणे आदी जबाबदाऱ्या या टास्क फोर्सवर सोपविण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. जिल्ह्यात जवळपास १३२ बालकांनी आई किंवा वडील यापैकी एक पालक गमावल्याचे स्पष्ट झाले. तसेच ३ बालकांनी आपले दोन्ही पालक गमावल्याचे समोर आले होते.

५५ बालकांना मदतीची प्रतीक्षा

पालक गमावलेल्या ८० बालकांना महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्याला रुपये ११०० बालसंगोपनासाठी देण्यात येत आहेत. या बालकांना मदत मिळाली असली, तरी अजूनही ५५ बालकांना या मदतीची प्रतीक्षा असल्याचे समोर आले आहे. या बालकांनाही लवकरच मदत दिली जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागातून देण्यात आली.

...तर बालगृह, शिशुगृहात दाखल करण्यात येईल

पात्र बालकांसाठी योजनेंतर्गंत देय असणारी रक्कम त्या बालकांसाठी खर्च न करता इतर प्रयोजनासाठी त्याच्या पालक, नातेवाइकांकडून खर्च केली जात असल्याचे व त्या बालकाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब निदर्शनास आल्यास त्या बालकाला काळजी व संरक्षण मिळावे, यासाठी बालगृह, शिशुगृहात दाखल करण्यात येणार आहे.