शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने पालक गमावलेल्या ८० बालकांना मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST

हिंगोली : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना आधार देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या ...

हिंगोली : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना आधार देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आतापर्यंत ८० बालकांना प्रतिमहिना ११०० रुपये देण्यात येत आहे. जिल्ह्यात एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या १३२ असून ३ बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. आतापर्यंत १६ हजार २९ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १५ हजार ६३७ रुग्ण बरे झाले असले, तरी ३९२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाने अगोदरच रोजगारासह विविध प्रश्न निर्माण झाले होते. त्यात ० ते १८ वर्षे वयोगटातील १३५ बालकांचा आधारच निघून गेल्याने त्यांच्यासमोर भविष्याचा प्रश्न उभा ठाकला होता. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन्ही पालकांचा आई आणि वडील यांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांच्या संगोपनासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठीत करण्यात आले आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती संकलित करणे. बालकांना सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून देणे. अशी बालके बालकामगार, बालभिक्षेकरी, अनैतिक मानवी वाहतूक, मानवी तस्करी, बेकायदेशीर दत्तकविधान यास बळी पडणार नाहीत, याची काळजी घेणे आदी जबाबदाऱ्या या टास्क फोर्सवर सोपविण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. जिल्ह्यात जवळपास १३२ बालकांनी आई किंवा वडील यापैकी एक पालक गमावल्याचे स्पष्ट झाले. तसेच ३ बालकांनी आपले दोन्ही पालक गमावल्याचे समोर आले होते.

५५ बालकांना मदतीची प्रतीक्षा

पालक गमावलेल्या ८० बालकांना महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्याला रुपये ११०० बालसंगोपनासाठी देण्यात येत आहेत. या बालकांना मदत मिळाली असली, तरी अजूनही ५५ बालकांना या मदतीची प्रतीक्षा असल्याचे समोर आले आहे. या बालकांनाही लवकरच मदत दिली जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागातून देण्यात आली.

...तर बालगृह, शिशुगृहात दाखल करण्यात येईल

पात्र बालकांसाठी योजनेंतर्गंत देय असणारी रक्कम त्या बालकांसाठी खर्च न करता इतर प्रयोजनासाठी त्याच्या पालक, नातेवाइकांकडून खर्च केली जात असल्याचे व त्या बालकाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब निदर्शनास आल्यास त्या बालकाला काळजी व संरक्षण मिळावे, यासाठी बालगृह, शिशुगृहात दाखल करण्यात येणार आहे.