शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचण्या न केलेल्या १३ दुकानांना बसविला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST

हिंगोली : आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी न करणाऱ्या शहरातील १३ दुकानांना १ हजार तर विनामास्क फिरणाऱ्या ७ नागरिकांना ५०० ...

हिंगोली : आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी न करणाऱ्या शहरातील १३ दुकानांना १ हजार तर विनामास्क फिरणाऱ्या ७ नागरिकांना ५०० रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला. ही कारवाई नगर परिषद व पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आली.

कोरोना महामारीने सर्वत्र कहर माजवला आहे. रोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. हे पाहून शासनाने पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. १५ एप्रिल रोजी नगर परिषद व पोलीस विभागाच्या पथकाने शहरातील इंदिरा चौक, मेडिकल लाईन, भाजी मंडई आदी भागातील १३ दुकानांना आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी न केल्याप्रकरणी १ हजार रुपयाप्रमाणे दंड ठोठावला आहे. या १३ दुकानदारांकडून दंडापोटी १३ हजार रुपये वसूल केले आहेत, तर मास्क न घालणाऱ्या ७ लोकांंना पाचशे रुपये प्रमाणे दंड लावला.

संचारबंदी लागू केलेली असताना पहिल्याच दिवशी अनेक नागरिक विनामास्क व मेडीसीनच्या नावाखाली राजरोसपणे फिरताना आढळून येत होते. हे पाहून पोलिसांनी मोक्याच्या ठिकाणी बॅरिकेटिंग टाकण्यासाठी सुरुवात केली आहे. चौक व गल्लीबोळामध्ये बॅरिकेटिंग टाकून रस्ते बंद केले आहेत.

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असताना सद्यस्थितीत भाजी मंडईमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. काही दिवसांपासून भाजी मंडई गर्दीचे ठिकाण बनले आहे. पालेभाज्या सर्वच नागरिकांना मिळाव्यात म्हणून शहरात आठ ठिकाणी भाजी विक्री केंद्र उभारण्यात आली होती. परंतु, काही दिवसांतच ही सर्वच्या सर्व केंद्र गुंडाळली गेली आहेत. मोठे व छोटे व्यापारी आजही भाजी मंडईतच गर्दी करताना दिसून येत आहेत. शहरात निर्माण केलेल्या भाजी मंडईत काहीच सुविधा नाहीत, अशी तक्रार भाजी मंडईत बसणाऱ्या व्यापाऱ्यांनी केली आहे.

संचारबंदीसदृश स्थिती नाही

कोरोना आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे शासनाने पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. परंतु, कोणते ना कोणते कारण पुढे करत काही जण बिनधास्तपणे फिरताना दिसून येत आहेत. काही नागरिक तर रुग्णालय व मेडिसीनचे कारण पुढे करत पथकाच्या डोळ्यात धूळ टाकण्याचा प्रयत्न करुन पुढे जाण्याचा मार्ग सुकर करीत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने कडक सूचना दिलेल्या असतानाही काही नागरिक मात्र त्याकडे कानाडोळा करीत आहेत.

विनामास्क फिरणाऱ्यांना ५०० रुपये दंड

कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असल्यामुळे शासनाने विनामास्क फिरणाऱ्यांंना २०० रुपये दंड लावण्याची जबाबदारी नगर परिषदेवर दिली होती. तरीही लोकांचे फिरणे काही संपत नाही. हे पाहून शासनाने आता त्यात ३०० रुपयांची वाढ करुन ५०० रुपये असा दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिल रोजी विनामास्क फिरणाऱ्या ७ नागरिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३ हजार ५०० रुपये दंडापोटी वसूल केले आहेत. ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, पोलीस निरीक्षक नितीन केनेकर, पोलीस निरीक्षक पाटील, पंडित मस्के यांनी केली.