शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने हिरावले २२ महिलांच्या कपाळावरील कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

हिंगोली : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची लाट ओसरत चालली असली तरी, याचा अनेकांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील ४९ बालकांच्या पालकांना ...

हिंगोली : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची लाट ओसरत चालली असली तरी, याचा अनेकांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील ४९ बालकांच्या पालकांना हिरावल्यानंतर आता २२ महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसण्याचे काम कोरोनाने केले आहे. कोरोनाने पती हिरावलेल्या महिलांचा शोध घेण्याचे काम महिला व बालविकास विभागाच्या वतीने केले जात आहे. त्यामुळे आणखी संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना संसर्गाची लाट आता कुठे ओसरत चालली असली तरी, मागील दीड वर्षात कोरोनाने चांगलाच धूमाकूळ घातला आहे. दुसऱ्या लाटेत तर दररोज शेकडो रूग्ण आढळून येत होती. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा १५ हजार ८२६ वर पोहचला. यात जिल्हाभरात ३७१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. घरातील कमावता व्यक्तीच गेल्याने कुटुंबियांवर मोठे संकट ओढावले आहे. त्यामुळे पुढे कसे जगायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला आहे. यात ४९ बालकांनी पालक गमावल्याने त्यांच्या पालन पोषणाचा प्रश्नही निर्माण झाला होता. मात्र शासनाने पुढाकार घेत १८ वर्षांखालील बालकांच्या पालन पोषणासाठी दर महिन्याला मानधन देण्याचा निर्णय घेतला. अशा बालकांच्या पालन पोषणाचा प्रश्न सोडविण्यात शासनाला यश आले असले तरी, आता कोरोनाने २२ महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा निराधार महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रूग्ण -

बरे झालेल्या रूग्णांची संख्या -

सध्या उपचार घेत असलेले रूग्ण -

सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ मिळणार

कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाने काही कर्मचारी कामाला लावले आहेत. अशा महिलांची माहिती संकलित करून त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना, विधवा आदी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. तसेच दारिद्र्य रेषेखालील पात्र लाभार्थी असल्यास अशा लाभार्थ्यांना एका वेळेस २० हजार रूपयांचे अनुदानही देण्याचा प्रयत्न केला जाणार आहेे. त्यामुळे कोरोनाने पती गमावलेल्या महिलांची माहिती असल्यास महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन या विभागाने केले आहे.

कोरोनाने २२ महिलांना केले निराधार

येथील महिला व बालविकास विभागाच्या वतीने पालक गमावलेल्या बालकांची व पती गमावलेल्या महिलांची माहिती संकलीत केली जात आहे. आतापर्यंत या विभागाकडे २२ महिलांची माहिती संकलीत झाली असून ४९ बालकांची माहिती गोळा करण्यात यश आले आहे. यामध्ये २७ मुले व २२ मुलींचा समावेश आहे. तसेच दोन्ही पालक गमावलेला एक बालकही आढळून आला आहे. जमा केलेली माहिती शासनाकडे सादर केली जाणार आहे.

कोरोनाने पती गमावलेल्या महिलांची माहिती संकलीत करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जाणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी, नातेवाईकांनी अशा महिलांची माहिती असल्यास महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा.

- विठ्ठल शिंदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी