शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

पान विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ; कोरोनामुळे नागेली पानांच्या विक्रीत घट, ग्राहकांची संख्याही रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 19:38 IST

मार्च महिन्यात कोरोना आजाराचा शिरकाव सर्वत्र झाला. त्यामुळे मार्च ते सप्टेंबर ७ महिने पान विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवावी लागली.

ठळक मुद्देपिढ्यान्‌पिढ्या हा व्यवसाय चालत आल्यामुळे दुसरा व्यवसाय करणेही आता शक्य नाही. पानांची चाळीस हजारांच्या जवळपास विक्री व्हायची ती आता वीस हजारांवर

हिंगोली: कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले असले तरी जिल्ह्यात नागेली पानांच्या विक्रीत घट झाल्यामुळे पान विक्रेत्यांवर  उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

मार्च महिन्यात कोरोना आजाराचा शिरकाव सर्वत्र झाला. त्यामुळे मार्च ते सप्टेंबर ७ महिने पान विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवावी लागली. परिणामी पान विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आजमितीस जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी  ग्रामीण भागातून येणारे पानांचे व्यापारी येईना झाले आहेत. कोरोना आजाराच्या आधी दिवसाकाठी चारशेर रुपये मिळायचे. परंतु, कोरोना आजारामुळे दिवसाकाठी दीडशे रुपयेही पदरात पडत नाहीत. त्यामुळे पान व्यवसाय डबघाईस आला आहे.

पिढ्यान्‌पिढ्या हा व्यवसाय चालत आल्यामुळे दुसरा व्यवसाय करणेही आता शक्य नाही. कोरोनाआधी महिन्याकाठी नागेली पानांची चाळीस हजारांच्या जवळपास विक्री व्हायची ती आता वीस हजारांवरच येऊन ठेपली आहे. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न पडला आहे. सद्य: स्थितीत महागाईने कळस गाठला आहे. बाहेरगावी जाणेही परवडत नाही. त्यात कोरोना आजारही अडसर ठरत आहे. चाळीस वर्षापूर्वी  पानांना चांगली मागणी होती. त्या मानाने आता मागणी राहिलेली नाही. पानशौकिनही कमी झाले आहेत. आजमितीस सणावाराला पानांची थोडी बहुत विक्री होते. तसेच पान ठेलेवालेही थोड्या बहुमत  प्रमाणात पान विकत घेऊन जातात. जिल्ह्यात कलकत्ता   येथून कलकत्ता पानांची  तर हुन्नर, विशाखा पट्टणम्‌, बिजवाडा, कर्नाटक, चाभरा येथून क्युरी पानांची आवक होते.  शहरात जवळपास दहा दुकाने ही पान विक्रेत्यांची आहेत.  कोरोनाचे प्रमाण जिल्ह्यात कमी झाले नाही.  शासनाचे सर्व नियम पाळून पान विक्री करावी लागत आहे. पान विक्री करतेवेळेस आम्ही स्वत: मास्क घालतो व ग्राहकांनाही मास्क घालून दोन फुटावरुन पान खरेदी करा असे सांगतो, असे पान विक्रेता  सत्तार पहेलवान यांनी सांगितले.

शासनाकडून मदतीची अपेक्षापान विक्री व्यवसाय हा पिढ्याने  पिढ्या चालत आलेला व्यवसाय आहे. दुपारपर्यंत पान विक्री करुन नंतर उरलेल्या वेळात दुसरा व्यवसाय करुन घर संसार चालवतो.  शासनाने पान विक्रेत्यांची परिस्थिती लक्षात घेऊन  शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही शेख शौकत शेख तुराब, सत्तार पहेलवान यांनी केली.

कोरोना आजारामुळे पान खरेदी करणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. कोरोनाआधी ग्रामीण भागातूनही छोटे विक्रेते यायचे. परंतु, सध्या कोरोना संसर्गामुळे येईना झाले आहेत. सध्या कलकत्ता पान ४०० रुपयास १००, क्युरी पान ४० रुपयास १०० या प्रमाणे विक्री करतो; परंतु, सध्या म्हणावी तशी विक्री होत नाही. त्यामुळे घरखर्चही भागत नाही.-दीपक चौरशिया, पान विक्रेता 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोली