शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

पान विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ; कोरोनामुळे नागेली पानांच्या विक्रीत घट, ग्राहकांची संख्याही रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 19:38 IST

मार्च महिन्यात कोरोना आजाराचा शिरकाव सर्वत्र झाला. त्यामुळे मार्च ते सप्टेंबर ७ महिने पान विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवावी लागली.

ठळक मुद्देपिढ्यान्‌पिढ्या हा व्यवसाय चालत आल्यामुळे दुसरा व्यवसाय करणेही आता शक्य नाही. पानांची चाळीस हजारांच्या जवळपास विक्री व्हायची ती आता वीस हजारांवर

हिंगोली: कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले असले तरी जिल्ह्यात नागेली पानांच्या विक्रीत घट झाल्यामुळे पान विक्रेत्यांवर  उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

मार्च महिन्यात कोरोना आजाराचा शिरकाव सर्वत्र झाला. त्यामुळे मार्च ते सप्टेंबर ७ महिने पान विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवावी लागली. परिणामी पान विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आजमितीस जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी  ग्रामीण भागातून येणारे पानांचे व्यापारी येईना झाले आहेत. कोरोना आजाराच्या आधी दिवसाकाठी चारशेर रुपये मिळायचे. परंतु, कोरोना आजारामुळे दिवसाकाठी दीडशे रुपयेही पदरात पडत नाहीत. त्यामुळे पान व्यवसाय डबघाईस आला आहे.

पिढ्यान्‌पिढ्या हा व्यवसाय चालत आल्यामुळे दुसरा व्यवसाय करणेही आता शक्य नाही. कोरोनाआधी महिन्याकाठी नागेली पानांची चाळीस हजारांच्या जवळपास विक्री व्हायची ती आता वीस हजारांवरच येऊन ठेपली आहे. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न पडला आहे. सद्य: स्थितीत महागाईने कळस गाठला आहे. बाहेरगावी जाणेही परवडत नाही. त्यात कोरोना आजारही अडसर ठरत आहे. चाळीस वर्षापूर्वी  पानांना चांगली मागणी होती. त्या मानाने आता मागणी राहिलेली नाही. पानशौकिनही कमी झाले आहेत. आजमितीस सणावाराला पानांची थोडी बहुत विक्री होते. तसेच पान ठेलेवालेही थोड्या बहुमत  प्रमाणात पान विकत घेऊन जातात. जिल्ह्यात कलकत्ता   येथून कलकत्ता पानांची  तर हुन्नर, विशाखा पट्टणम्‌, बिजवाडा, कर्नाटक, चाभरा येथून क्युरी पानांची आवक होते.  शहरात जवळपास दहा दुकाने ही पान विक्रेत्यांची आहेत.  कोरोनाचे प्रमाण जिल्ह्यात कमी झाले नाही.  शासनाचे सर्व नियम पाळून पान विक्री करावी लागत आहे. पान विक्री करतेवेळेस आम्ही स्वत: मास्क घालतो व ग्राहकांनाही मास्क घालून दोन फुटावरुन पान खरेदी करा असे सांगतो, असे पान विक्रेता  सत्तार पहेलवान यांनी सांगितले.

शासनाकडून मदतीची अपेक्षापान विक्री व्यवसाय हा पिढ्याने  पिढ्या चालत आलेला व्यवसाय आहे. दुपारपर्यंत पान विक्री करुन नंतर उरलेल्या वेळात दुसरा व्यवसाय करुन घर संसार चालवतो.  शासनाने पान विक्रेत्यांची परिस्थिती लक्षात घेऊन  शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही शेख शौकत शेख तुराब, सत्तार पहेलवान यांनी केली.

कोरोना आजारामुळे पान खरेदी करणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. कोरोनाआधी ग्रामीण भागातूनही छोटे विक्रेते यायचे. परंतु, सध्या कोरोना संसर्गामुळे येईना झाले आहेत. सध्या कलकत्ता पान ४०० रुपयास १००, क्युरी पान ४० रुपयास १०० या प्रमाणे विक्री करतो; परंतु, सध्या म्हणावी तशी विक्री होत नाही. त्यामुळे घरखर्चही भागत नाही.-दीपक चौरशिया, पान विक्रेता 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोली