शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:37 IST

२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीचा शिरकाव सर्वत्र झाला आहे. गत दीड वर्षात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी जवळपास २५ बेवारस मयतांवर ...

२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीचा शिरकाव सर्वत्र झाला आहे. गत दीड वर्षात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी जवळपास २५ बेवारस मयतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. अंत्यसंस्काराच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे कर्मचारी नातेवाइकांची वाट पाहत बसतात. नातेवाईक नाही आल्यास बेवारस मयताचा अंत्यविधी उरकून घेतात. नगरपालिकेने अंत्यविधीसाठी ठरावीक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये माधव सुकते, नवनाथ ठोंबरे, काशीनाथ लगड, चेतन बुजगावणे, अशोक गालफाडे, रवी गायकवाड, दिनकर शिंदे यांचा समावेश आहे.

अंत्यविधीसमयी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट परिधान करण्यास सांगितले जाते. अंत्यविधी उरकला की सदरील कीट ही जाळून टाकण्यात येते. परत नव्याने दुसरी पीपीई कीट दिली जाते. गत दीड वर्षापासून मुख्याधिकारी डाॅ. अजय कुरवाडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त केलेले कर्मचारी बेवारस मयतांवर अंत्यविधी करीत आहेत.

शासनाने अंत्यविधी दरम्यान नातेवाइकांची गर्दी होऊ नये म्हणून कडक सूचना दिलेल्या आहेत. अंत्यविधीच्या ठिकाणी केवळ पाच व्यक्तींनीच उपस्थित राहावे. मयताचा नातेवाईक नाही आल्यास त्याची वाट पाहिल्या जाते. परंतु, शेवटी नगरपालिकेने नेमलेले कर्मचारी सूचनांचे पालन करत मयतावर अंत्यविधी करून टाकतात.

कोरोना मृत्यूनंतर रक्ताचे नातेवाईकही जवळ येत नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे. काय पाप केले असेल या मयत व्यक्तीने? असा प्रश्न उपस्थित होतो. अंत्यसंस्कार करताना आमच्याही डोळ्यात पाणी येते, अशी प्रतिक्रिया नियुक्त केलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांनी दिली.