शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:37 IST

२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीचा शिरकाव सर्वत्र झाला आहे. गत दीड वर्षात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी जवळपास २५ बेवारस मयतांवर ...

२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीचा शिरकाव सर्वत्र झाला आहे. गत दीड वर्षात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी जवळपास २५ बेवारस मयतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. अंत्यसंस्काराच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे कर्मचारी नातेवाइकांची वाट पाहत बसतात. नातेवाईक नाही आल्यास बेवारस मयताचा अंत्यविधी उरकून घेतात. नगरपालिकेने अंत्यविधीसाठी ठरावीक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये माधव सुकते, नवनाथ ठोंबरे, काशीनाथ लगड, चेतन बुजगावणे, अशोक गालफाडे, रवी गायकवाड, दिनकर शिंदे यांचा समावेश आहे.

अंत्यविधीसमयी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट परिधान करण्यास सांगितले जाते. अंत्यविधी उरकला की सदरील कीट ही जाळून टाकण्यात येते. परत नव्याने दुसरी पीपीई कीट दिली जाते. गत दीड वर्षापासून मुख्याधिकारी डाॅ. अजय कुरवाडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त केलेले कर्मचारी बेवारस मयतांवर अंत्यविधी करीत आहेत.

शासनाने अंत्यविधी दरम्यान नातेवाइकांची गर्दी होऊ नये म्हणून कडक सूचना दिलेल्या आहेत. अंत्यविधीच्या ठिकाणी केवळ पाच व्यक्तींनीच उपस्थित राहावे. मयताचा नातेवाईक नाही आल्यास त्याची वाट पाहिल्या जाते. परंतु, शेवटी नगरपालिकेने नेमलेले कर्मचारी सूचनांचे पालन करत मयतावर अंत्यविधी करून टाकतात.

कोरोना मृत्यूनंतर रक्ताचे नातेवाईकही जवळ येत नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे. काय पाप केले असेल या मयत व्यक्तीने? असा प्रश्न उपस्थित होतो. अंत्यसंस्कार करताना आमच्याही डोळ्यात पाणी येते, अशी प्रतिक्रिया नियुक्त केलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांनी दिली.