शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

‘महावितरण आपल्या दारीचे’ सर्व्हेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:19 IST

महावितरणच्या वतीने वर्ष २०१५-२०१६ मध्ये ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेंतर्गत शेतक-यांना कृषीपंपाच्या वीजजोडणी देण्यासाठी निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने शेतक-यांना वीजजोडणीसाठी कोटेशन देण्यात आले. परंतु, यातील काही शेतक-यांना अद्यापपर्यंत वीजजोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे सदर योजनेंतर्गत किती शेतकºयांना वीजजोडणी देण्यात आली. याचा आढावा घेण्यासाठी महावितरणच्या वतीने सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : महावितरणच्या वतीने वर्ष २०१५-२०१६ मध्ये ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेंतर्गत शेतकºयांना कृषीपंपाच्या वीजजोडणी देण्यासाठी निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने शेतकºयांना वीजजोडणीसाठी कोटेशन देण्यात आले. परंतु, यातील काही शेतकºयांना अद्यापपर्यंत वीजजोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे सदर योजनेंतर्गत किती शेतकºयांना वीजजोडणी देण्यात आली. याचा आढावा घेण्यासाठी महावितरणच्या वतीने सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.‘महावितरण आपल्या दारी’ या योजनेंतर्गत महावितरण प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी मेळावे घेण्यात आले. दरम्यान, सदर योजनेंतर्गत तालुक्यातील जवळपास एक हजार शेतकºयांना जागेवरच वीजजोडणीसाठी कोटेशन देण्यात आले. यातील काही शेतकºयांनी केबल टाकून वीजजोडणी घेतली. तर काही शेतकºयांना आजही वीजजोडणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.दरम्यान, काही शेतकºयांना जोडणीसाठी विद्युत खांबसह विद्युत तारांची आवश्यकता असल्यामुळे बहुतांश शेतकºयांना वीजजोडणी मिळाली नसल्याची माहिती आहे.दरम्यान, कोटेशन दिलेल्या जवळपास १००३ शेतकºयांच्या शेतात जावून महावितरणच्या वतीने सर्व्हे केला जाणार आहे. येत्या १५ दिवसांत कर्मचाºयांना हा सर्व्हे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मागील आठ दिवसांपासून महावितरणच्या वतीने सर्व्हेक्षण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.आतापर्यंत २५ ते ३० टक्के सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यातील वसमत, हिंगोली, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यात वीज कर्मचाºयांमार्फत सर्व्हेक्षणाचे काम करण्यात येत आहे.ज्या शेतकºयांना अद्याप वीजजोडण्या दिल्या नाहीत व त्यासाठी किती साहित्याची आवश्यकता आहे. याचा अहवाल शासनाला देण्यात येणार असून अहवाल प्राप्त होताच वीजजोडणी न मिळालेल्या शेतकºयांना कृषीपंपाची वीजजोडणी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.