शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

स्वारातीमच्या महाविद्यालयीन परीक्षांमध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

१३ जुलैरोजी स्वारातीम विद्यापीठाकडून कला शाखेच्या इतिहास व समाजशास्त्र या विषयाचे दोन पेपर होते, तर विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र, वाणिज्यचा ...

१३ जुलैरोजी स्वारातीम विद्यापीठाकडून कला शाखेच्या इतिहास व समाजशास्त्र या विषयाचे दोन पेपर होते, तर विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र, वाणिज्यचा पर्यावरण शास्त्र या विषयाचे पेपर होते. पहिला पेपर १० ते ११, तर दुसऱ्या पेपरचा २ ते ५ अशी वेळ होती. यातच दिलेल्या वेळेच्या दोन तासांपर्यंत कधीही लिंक ओपन करून पेपर दिला, तर तासाभरात तो सोडवून पूर्ण करायची संधी होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांना दिलेली लिंकच ओपन होत नसल्याची समस्या येत होती. जर लिंक ओपन झालीच, तर पेपर ओपन झाला नाही. ज्या ठराविक लोकांचा पेपर ओपन झाला, त्यापैकी काहींचा पहिल्या दहा मिनिटांत आपोआपच पेपर सबमिट झाला. ज्यांनी शेवटपर्यंत पेपर सोडविला, त्यांचा पेपर नंतर सबमिट होत नव्हता. आऊट ऑफ टाईम असा संदेश येत होता. त्यामुळे यात नेमक्या किती विद्यार्थ्यांचे पेपर योग्यरित्या सबमिट झाले, हेच कळायला मार्ग नाही.

यात पाठविलेल्या लिंकवर ४० गुणांचा वस्तुनिष्ठ पर्यायी पेपर सोडवायचा होता. आधीच परीक्षांना विलंब झाल्याने विद्यार्थी बुचकळ्यात होते. आता नमनालाच नाट लागल्याने पुन्हा विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. जर हा पेपर पुन्हा घेतला नाही, तर असेही वाया गेलेले वर्ष पुन्हा एका वर्षाची भर तर टाकणार नाही, अशी चिंता त्यांना लागली आहे. यावरून अनेकजण आपापल्या महाविद्यालयाकडे तक्रारी करीत असल्याचेही दिसून येत होते. या मुलांना नंतर वेळ वाढवून दिल्याचेही महाविद्यालयांनी कळविले. मात्र वाढीव वेळेतही लिंक काही उघडत नव्हती. ज्यांना दुसऱ्या संधीतही पेपर सोडविता आला नाही, अशांचा जीव टांगणीला लागला आहे. तर ज्यांचा पेपर पहिल्या पाच ते दहा मिनिटात सबमिट झाला, त्यांना तर पुढे पेपर सोडवायचीच संधी मिळाली नाही. त्यांचेही नाहक नुकसान होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातीलच किमान बाराशेपेक्षा जास्त विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षात आहेत. या सर्वांनाच या परीक्षेचा फटका बसण्याची भीती आहे. विद्यापीठाने आपली यंत्रणा व्यवस्थित करूनच पुन्हा परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

अनेक विद्यार्थ्यांना पेपर सोडविता आला नसल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य यंत्रणा निर्माण करून विद्यापीठाने पुन्हा परीक्षा घेण्याची गरज आहे.

- प्रा. डॉ. विलास आघाव,

उपप्राचार्य, आदर्श महाविद्यालय, हिंगोली