शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

स्वारातीमच्या महाविद्यालयीन परीक्षांमध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

१३ जुलैरोजी स्वारातीम विद्यापीठाकडून कला शाखेच्या इतिहास व समाजशास्त्र या विषयाचे दोन पेपर होते, तर विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र, वाणिज्यचा ...

१३ जुलैरोजी स्वारातीम विद्यापीठाकडून कला शाखेच्या इतिहास व समाजशास्त्र या विषयाचे दोन पेपर होते, तर विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र, वाणिज्यचा पर्यावरण शास्त्र या विषयाचे पेपर होते. पहिला पेपर १० ते ११, तर दुसऱ्या पेपरचा २ ते ५ अशी वेळ होती. यातच दिलेल्या वेळेच्या दोन तासांपर्यंत कधीही लिंक ओपन करून पेपर दिला, तर तासाभरात तो सोडवून पूर्ण करायची संधी होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांना दिलेली लिंकच ओपन होत नसल्याची समस्या येत होती. जर लिंक ओपन झालीच, तर पेपर ओपन झाला नाही. ज्या ठराविक लोकांचा पेपर ओपन झाला, त्यापैकी काहींचा पहिल्या दहा मिनिटांत आपोआपच पेपर सबमिट झाला. ज्यांनी शेवटपर्यंत पेपर सोडविला, त्यांचा पेपर नंतर सबमिट होत नव्हता. आऊट ऑफ टाईम असा संदेश येत होता. त्यामुळे यात नेमक्या किती विद्यार्थ्यांचे पेपर योग्यरित्या सबमिट झाले, हेच कळायला मार्ग नाही.

यात पाठविलेल्या लिंकवर ४० गुणांचा वस्तुनिष्ठ पर्यायी पेपर सोडवायचा होता. आधीच परीक्षांना विलंब झाल्याने विद्यार्थी बुचकळ्यात होते. आता नमनालाच नाट लागल्याने पुन्हा विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. जर हा पेपर पुन्हा घेतला नाही, तर असेही वाया गेलेले वर्ष पुन्हा एका वर्षाची भर तर टाकणार नाही, अशी चिंता त्यांना लागली आहे. यावरून अनेकजण आपापल्या महाविद्यालयाकडे तक्रारी करीत असल्याचेही दिसून येत होते. या मुलांना नंतर वेळ वाढवून दिल्याचेही महाविद्यालयांनी कळविले. मात्र वाढीव वेळेतही लिंक काही उघडत नव्हती. ज्यांना दुसऱ्या संधीतही पेपर सोडविता आला नाही, अशांचा जीव टांगणीला लागला आहे. तर ज्यांचा पेपर पहिल्या पाच ते दहा मिनिटात सबमिट झाला, त्यांना तर पुढे पेपर सोडवायचीच संधी मिळाली नाही. त्यांचेही नाहक नुकसान होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातीलच किमान बाराशेपेक्षा जास्त विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षात आहेत. या सर्वांनाच या परीक्षेचा फटका बसण्याची भीती आहे. विद्यापीठाने आपली यंत्रणा व्यवस्थित करूनच पुन्हा परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

अनेक विद्यार्थ्यांना पेपर सोडविता आला नसल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य यंत्रणा निर्माण करून विद्यापीठाने पुन्हा परीक्षा घेण्याची गरज आहे.

- प्रा. डॉ. विलास आघाव,

उपप्राचार्य, आदर्श महाविद्यालय, हिंगोली