शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

स्वारातीमच्या महाविद्यालयीन परीक्षांमध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

१३ जुलैरोजी स्वारातीम विद्यापीठाकडून कला शाखेच्या इतिहास व समाजशास्त्र या विषयाचे दोन पेपर होते, तर विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र, वाणिज्यचा ...

१३ जुलैरोजी स्वारातीम विद्यापीठाकडून कला शाखेच्या इतिहास व समाजशास्त्र या विषयाचे दोन पेपर होते, तर विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र, वाणिज्यचा पर्यावरण शास्त्र या विषयाचे पेपर होते. पहिला पेपर १० ते ११, तर दुसऱ्या पेपरचा २ ते ५ अशी वेळ होती. यातच दिलेल्या वेळेच्या दोन तासांपर्यंत कधीही लिंक ओपन करून पेपर दिला, तर तासाभरात तो सोडवून पूर्ण करायची संधी होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांना दिलेली लिंकच ओपन होत नसल्याची समस्या येत होती. जर लिंक ओपन झालीच, तर पेपर ओपन झाला नाही. ज्या ठराविक लोकांचा पेपर ओपन झाला, त्यापैकी काहींचा पहिल्या दहा मिनिटांत आपोआपच पेपर सबमिट झाला. ज्यांनी शेवटपर्यंत पेपर सोडविला, त्यांचा पेपर नंतर सबमिट होत नव्हता. आऊट ऑफ टाईम असा संदेश येत होता. त्यामुळे यात नेमक्या किती विद्यार्थ्यांचे पेपर योग्यरित्या सबमिट झाले, हेच कळायला मार्ग नाही.

यात पाठविलेल्या लिंकवर ४० गुणांचा वस्तुनिष्ठ पर्यायी पेपर सोडवायचा होता. आधीच परीक्षांना विलंब झाल्याने विद्यार्थी बुचकळ्यात होते. आता नमनालाच नाट लागल्याने पुन्हा विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. जर हा पेपर पुन्हा घेतला नाही, तर असेही वाया गेलेले वर्ष पुन्हा एका वर्षाची भर तर टाकणार नाही, अशी चिंता त्यांना लागली आहे. यावरून अनेकजण आपापल्या महाविद्यालयाकडे तक्रारी करीत असल्याचेही दिसून येत होते. या मुलांना नंतर वेळ वाढवून दिल्याचेही महाविद्यालयांनी कळविले. मात्र वाढीव वेळेतही लिंक काही उघडत नव्हती. ज्यांना दुसऱ्या संधीतही पेपर सोडविता आला नाही, अशांचा जीव टांगणीला लागला आहे. तर ज्यांचा पेपर पहिल्या पाच ते दहा मिनिटात सबमिट झाला, त्यांना तर पुढे पेपर सोडवायचीच संधी मिळाली नाही. त्यांचेही नाहक नुकसान होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातीलच किमान बाराशेपेक्षा जास्त विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षात आहेत. या सर्वांनाच या परीक्षेचा फटका बसण्याची भीती आहे. विद्यापीठाने आपली यंत्रणा व्यवस्थित करूनच पुन्हा परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

अनेक विद्यार्थ्यांना पेपर सोडविता आला नसल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य यंत्रणा निर्माण करून विद्यापीठाने पुन्हा परीक्षा घेण्याची गरज आहे.

- प्रा. डॉ. विलास आघाव,

उपप्राचार्य, आदर्श महाविद्यालय, हिंगोली