शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

खात्री पटताच गावातच दिले अधिग्रहणाचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:38 IST

दुष्काळात ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी कळमनुरी तहसीलतर्फे प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अधिग्रहणाचे बोगस प्रस्ताव मान्य होऊ नयेत यासाठी पथकाकडून ‘आॅन द स्पॉट’ पाहणी करून खात्री पटताच अधिग्रहणाचे पत्र तात्काळ हातात दिले जात आहे. तालुक्यात आतापर्यंत ४२ गावांमध्ये ४८ विहिरी व बोअर अधिग्रहित केले आहेत. तर आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : दुष्काळात ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी कळमनुरी तहसीलतर्फे प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अधिग्रहणाचे बोगस प्रस्ताव मान्य होऊ नयेत यासाठी पथकाकडून ‘आॅन द स्पॉट’ पाहणी करून खात्री पटताच अधिग्रहणाचे पत्र तात्काळ हातात दिले जात आहे. तालुक्यात आतापर्यंत ४२ गावांमध्ये ४८ विहिरी व बोअर अधिग्रहित केले आहेत. तर आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे.कळमनुरी तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. कायम दक्ष राहात पाणीटंचाईवर मात करण्याची नवी पद्धती त्यांनी अवलंबिली आहे. आतापर्यंत विहीर अथवा बोअर अधिग्रहित करताना दोन-दोन वर्षांपासूनचे अधिग्रहणाचे पत्रच शेतकऱ्यांना प्राप्त झाले नाही. काही ठिकाणी दिवस वाढवून दाखवून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा कार्यक्रमही झाला. परंतु यावर मात करत कळमनुरीचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी पाणीटंचाईबाबत प्रशासनाला अलर्ट करत नव्याने कार्यपद्धती अवलंबिली आहे. पंचायत समितीकडून प्रस्ताव प्राप्त होताच दोन ते तीन दिवसांच्या आत पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यासह महसूलचे पथक संबंधित गावात भेट देणार, प्रत्यक्ष पाहणी करणार आणि खात्री पटताच आॅन दी स्पॉट तेथेच अधिग्रहणाचे पत्र देण्यात येत आहे. आतापर्यंत कळमनुरी तालुक्यातील ४२ गावांमधील ४८ विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यांचे पत्रही त्याच ठिकाणी त्यांना देण्यात आले आहे. तालुक्यात आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकंदरीत पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. या वेगळ्या कार्यशैलीमुळे शासकीय निधीच्या गळतीला थांबविण्यातही प्रशासनाला यश मिळाले आहे. जनतेला टंचाईवर तातडीने उपाययोजना होत असल्याने समाधान मिळत आहे. एकंदरीत तालुका प्रशासनाची जागेवरच अधिग्रहणाचे पत्र देण्याची पद्धत मात्र तालुक्यात चचेर्चा विषय ठरली आहे.टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असलेली गावे -कुपटी, महालिंगी तांडा, हातमाली, सिंदगी, पोत्रा, शिवणी खुर्द ,खापरखेडा, माळधावंडा.अधिग्रहणग्रस्त गावेकुपटी, रेणापूर ,कसबे धावंडा, कृष्णापूर, कोंढूर, टाकळी डि., कवडा, गोलेगाव, बिबथर, सालेगाव, वाई, गोटेवाडी, निमटोक, दाभडी, रामवाडी, शिवणी, पोत्रा, सिंदगी, कामठा, असोला, नवखा, बेलथर, सांडस त.ना, सालेगाव, म्हैसगव्हान, बोल्डावाडी, निमटोक, तेलंगवाडी, रुद्रवाडी, कसबेधावंडा, जांब, भुरक्याची वाडी, काळ्याची वाडी, पावनमारी, भोसी, बेलमंडळ, गौळ बाजार, हारवाडी, कळमकोंडा, खरवड, डिग्री आदी गावांत जलस्त्रोत अधिग्रहण केले.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व नागरिकांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागू नये यासाठी प्रशासन दक्ष आहे. पंचायत समितीकडून प्रस्ताव प्राप्त होताच दोन दिवसांत घटनास्थळी भेट देऊन महसूल प्रशासन टंचाईवर उपाययोजना करून प्रत्येक्षात उपाययोजना कार्यान्वित करत आहे. त्यामुळे जेथे दुष्काळ जाणवतो. त्यांनी थेट पं. स. अथवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा, तातडीने अंमलबजावणी केली जाईल.- तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRevenue Departmentमहसूल विभाग