शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

खात्री पटताच गावातच दिले अधिग्रहणाचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:38 IST

दुष्काळात ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी कळमनुरी तहसीलतर्फे प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अधिग्रहणाचे बोगस प्रस्ताव मान्य होऊ नयेत यासाठी पथकाकडून ‘आॅन द स्पॉट’ पाहणी करून खात्री पटताच अधिग्रहणाचे पत्र तात्काळ हातात दिले जात आहे. तालुक्यात आतापर्यंत ४२ गावांमध्ये ४८ विहिरी व बोअर अधिग्रहित केले आहेत. तर आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : दुष्काळात ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी कळमनुरी तहसीलतर्फे प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अधिग्रहणाचे बोगस प्रस्ताव मान्य होऊ नयेत यासाठी पथकाकडून ‘आॅन द स्पॉट’ पाहणी करून खात्री पटताच अधिग्रहणाचे पत्र तात्काळ हातात दिले जात आहे. तालुक्यात आतापर्यंत ४२ गावांमध्ये ४८ विहिरी व बोअर अधिग्रहित केले आहेत. तर आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे.कळमनुरी तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. कायम दक्ष राहात पाणीटंचाईवर मात करण्याची नवी पद्धती त्यांनी अवलंबिली आहे. आतापर्यंत विहीर अथवा बोअर अधिग्रहित करताना दोन-दोन वर्षांपासूनचे अधिग्रहणाचे पत्रच शेतकऱ्यांना प्राप्त झाले नाही. काही ठिकाणी दिवस वाढवून दाखवून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा कार्यक्रमही झाला. परंतु यावर मात करत कळमनुरीचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी पाणीटंचाईबाबत प्रशासनाला अलर्ट करत नव्याने कार्यपद्धती अवलंबिली आहे. पंचायत समितीकडून प्रस्ताव प्राप्त होताच दोन ते तीन दिवसांच्या आत पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यासह महसूलचे पथक संबंधित गावात भेट देणार, प्रत्यक्ष पाहणी करणार आणि खात्री पटताच आॅन दी स्पॉट तेथेच अधिग्रहणाचे पत्र देण्यात येत आहे. आतापर्यंत कळमनुरी तालुक्यातील ४२ गावांमधील ४८ विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यांचे पत्रही त्याच ठिकाणी त्यांना देण्यात आले आहे. तालुक्यात आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकंदरीत पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. या वेगळ्या कार्यशैलीमुळे शासकीय निधीच्या गळतीला थांबविण्यातही प्रशासनाला यश मिळाले आहे. जनतेला टंचाईवर तातडीने उपाययोजना होत असल्याने समाधान मिळत आहे. एकंदरीत तालुका प्रशासनाची जागेवरच अधिग्रहणाचे पत्र देण्याची पद्धत मात्र तालुक्यात चचेर्चा विषय ठरली आहे.टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असलेली गावे -कुपटी, महालिंगी तांडा, हातमाली, सिंदगी, पोत्रा, शिवणी खुर्द ,खापरखेडा, माळधावंडा.अधिग्रहणग्रस्त गावेकुपटी, रेणापूर ,कसबे धावंडा, कृष्णापूर, कोंढूर, टाकळी डि., कवडा, गोलेगाव, बिबथर, सालेगाव, वाई, गोटेवाडी, निमटोक, दाभडी, रामवाडी, शिवणी, पोत्रा, सिंदगी, कामठा, असोला, नवखा, बेलथर, सांडस त.ना, सालेगाव, म्हैसगव्हान, बोल्डावाडी, निमटोक, तेलंगवाडी, रुद्रवाडी, कसबेधावंडा, जांब, भुरक्याची वाडी, काळ्याची वाडी, पावनमारी, भोसी, बेलमंडळ, गौळ बाजार, हारवाडी, कळमकोंडा, खरवड, डिग्री आदी गावांत जलस्त्रोत अधिग्रहण केले.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व नागरिकांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागू नये यासाठी प्रशासन दक्ष आहे. पंचायत समितीकडून प्रस्ताव प्राप्त होताच दोन दिवसांत घटनास्थळी भेट देऊन महसूल प्रशासन टंचाईवर उपाययोजना करून प्रत्येक्षात उपाययोजना कार्यान्वित करत आहे. त्यामुळे जेथे दुष्काळ जाणवतो. त्यांनी थेट पं. स. अथवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा, तातडीने अंमलबजावणी केली जाईल.- तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRevenue Departmentमहसूल विभाग