शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

तांडा-वस्ती सुधारची ४ कामेच पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:22 IST

समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तांडा वस्ती सुधार योजनेत गतवर्षी दीड कोटींच्या निधीतून घेण्यात आलेल्या ३४ पैकी केवळ ४ कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही ही कामे सुरूच असून मार्च एण्डपर्यंत ती पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तांडा वस्ती सुधार योजनेत गतवर्षी दीड कोटींच्या निधीतून घेण्यात आलेल्या ३४ पैकी केवळ ४ कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही ही कामे सुरूच असून मार्च एण्डपर्यंत ती पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे.भटक्या जमातींच्या वस्तीच्या विकासासाठी शासनाने ही योजना आणली आहे. यामध्ये जिल्ह्याला गतवर्षी केवळ ५0 लाखांचाच निधी मंजूर होता. शेवटच्या टप्प्यात आणखी एक कोटी मिळाल्याने निदान यात ३४ कामे घेणे शक्य झाले.दरवर्षीच या योजनेतील कामे संथगतीने होतात. शिवाय प्रस्तावही वेळेत येत नाहीत. यंदाही या योजनेसाठी सध्या तरी ५0 लाखांचा निधी उपलब्ध आहे. मात्र अजून प्रस्तावांची तयारी समाजकल्याण विभागाकडून सुरू असल्याचे दिसत नाही. दरवर्षीच मार्च एण्डच्या तोंडावर या योजनेचे नियोजन केले जाते. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हे नियोजन वेळेपूर्वी केले तर फायद्याचे ठरणार आहे. अन्यथा हा निधी तसाच वाया जाण्याची भीतीही नाकारता येत नाही. याबाबत जिल्हाधिकाºयांनी सूचना देण्याची गरज असून त्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतच गावनिवड होते.हिंगोली जिल्ह्यात या योजनेत मंजूर गतवर्षीच्या ३४ पैकी ४ कामे पूर्ण झाली. त्यासाठी १ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ग्रामवसेकांना देण्यात येतील, असे समाजकल्याणकडून सांगण्यात आले. यामध्ये रस्ते, नाल्या, विद्युतीकरण, सेवा भवन इत्यादीची कामे करता येतात. यंदा अशा पद्धतीची कामे सुरू आहेत. तर पुढील कामांसाठी अंदाजपत्रके जसे येतील प्रस्ताव सादर केले जातील, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार