शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

परतीच्या थंडीचा कहर, गावे गारठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST

कौठा : वसमत तालुक्यातील कौठा परिसरात यंदा पावसाळा संपत आल्यानंतर परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पिकांची अत्यंत ...

कौठा : वसमत तालुक्यातील कौठा परिसरात यंदा पावसाळा संपत आल्यानंतर परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पिकांची अत्यंत हानी झाली. आता हिवाळा संपत आला असताना फेब्रुवारीच्या मध्यात थंडीचा जोर वाढवला असून अतिशय गारठ्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत होऊन शेती पिकांवरही परिणाम होत आहे.

वाढत्या थंडीने आरोग्यावरही परिणाम होत असून यात वृद्ध व लहान मुले आजारी पडत आहेत. वाढती थंडी गहू पिकासाठी चांगली मानली जात अडली तरी भुईमूगसाठी मात्र घातक ठरत आहे. संपूर्ण हिवाळा हा कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरणात गेला, परंतु शेवटी जाता जाता मात्र कडक थंडी व प्रचंड गारवा व वारे यामुळे सकाळी व संध्याकाळी रस्ते व गाव निर्मनुष्य होत आहेत. मागील आठवड्यातच उन्हाळ्याची चाहूल लागून उष्णता वाढू लागली होती, तर बाजारात नेमकेच शीतपेये व आईस्क्रिमची दुकाने थाटू लागली. परंतु आता मात्र थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटत असून ठेवून दिलेले स्वेटर व उबदार कपडे पुन्हा बाहेर निघाले आहेत. आता पुन्हा हिवाळ्यासारखी थंडी जाणवू लागली आहे. फाेटाे नं. ०२