शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

शहराची स्वच्छतेकडे वाटचाल, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:40 IST

शहर स्वच्छतेकडे पाऊल टाकत असले तरी, पूर्णपणे शहरातील घाण अद्याप साफ झाली नाही. शहरात सध्या पालिकेकडून स्वच्छतेसाठी धडपड केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहर स्वच्छतेकडे पाऊल टाकत असले तरी, पूर्णपणे शहरातील घाण अद्याप साफ झाली नाही. शहरात सध्या पालिकेकडून स्वच्छतेसाठी धडपड केली जात आहे. कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावणे, दरदिवशी प्रत्येक प्रभागातील घरोघरी घंटागाडी पोहचत आहे. मात्र अद्याप काही भागातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे.हिंगोली नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे शहरस्वच्छतेवर मुख्याधिकारी भर देत आहेत. प्रत्येक्ष पाहणी करणे, सफाई कर्मचाºयांच्या अडचणी जाणून घेणे, स्वच्छतेसाठी असलेल्या घंटागाडी तसेच इतर वाहने यावर त्यांचे नियंत्रण असते. परंतु हिंगोली शहर खरच स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे का? असा प्रश्नही कधी-कधी नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. शहरातील जुने शासकीय रूग्णालय, भाजीमंडई, जुने ग्रामीण पोलीस ठाणे, जवाहर रोड या ठिकाणी असलेल्या कचराकुंड्यातील कचºयाची वेळेवर कधीच विल्हेवाट लावली जात नाही. सध्या कचराकुंडीमुक्त शहर करण्याचा निश्चय पालिकेने घेतला असल्याने आता कुंड्या दिसत नाहीत. घरपर्यंत घंटागाडी पोहचत असल्याने त्यातच कचरा टाकला जात आहे. परंतु शहरातील अनेक ठिकाणचा कचरा हा जाग्यावरच कुजत आहे. हिंगोली शहरात ज्या ठिकाणी कुंड्या आहेत त्यातील कचºयाची वेळेत विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी, परिसरातील अस्वच्छतेने कळस गाठला आहे.कचरा अस्ताव्यवस्त असल्याने त्यावर गुरांचा संचार असतो. असे चित्र अजूनही काही भागात आहे. मात्र हे चित्र बदलू लागले आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ मध्ये हिंंगोली पालिकेने सहभाग घेतला आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी धडपड केली जात आहे. उपक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचाºयांचा सन्मान केला जात आहे. स्वच्छ सर्वेक्षणामुळे थोडेफार शिस्तीकडे झुकलेले शहर पुन्हा पहिल्या मार्गाने जाण्याची भीती आहे.हिंगोली येथील स्वच्छता अभियानाला गती आल्यानंतर शहरात काही दिवस सर्वच रस्ते अगदी चकाचक दिसत होते. आता मुख्य काही रस्ते साडले तर कचरा साठलेला रस्ताच सापडत नाही. विशेष म्हणजे शहराचा कचरा उचलण्यावरील खर्चात चार ते पाचपट वाढ झाली अन् कचरा मात्र जागीच आहे. घंटागाड्यांतून जाणारा कचरा तेवढा थेट बाहेर जातो. मात्र पालिकेच्या कल्पाण मंडपम्मध्ये हिंगोली नगरपालिका असे नाव टाकून तब्बल ९ घंटागाड्या धूळखात उभ्या आहेत. लाखोंचा खर्च करूनही या गाड्या जागीच का उभ्या आहेत, याची माहितीही कुणी द्यायला तयार नाही. तर कचराच उचलला जात नसल्याने काही जणांनी कचराकुंड्या रिकाम्या करून याच वाहनांजवळ आणून टाकल्या. त्यांचीही संख्या दहा ते बारा एवढी आहे. त्यामुळे कंत्राटदारांवर नियंत्रण नाही अन् यंत्रणेचाही योग्य वापर नाही, असे चित्र निर्माण झाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMuncipal Corporationनगर पालिका