शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

शहराची स्वच्छतेकडे वाटचाल, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:40 IST

शहर स्वच्छतेकडे पाऊल टाकत असले तरी, पूर्णपणे शहरातील घाण अद्याप साफ झाली नाही. शहरात सध्या पालिकेकडून स्वच्छतेसाठी धडपड केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहर स्वच्छतेकडे पाऊल टाकत असले तरी, पूर्णपणे शहरातील घाण अद्याप साफ झाली नाही. शहरात सध्या पालिकेकडून स्वच्छतेसाठी धडपड केली जात आहे. कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावणे, दरदिवशी प्रत्येक प्रभागातील घरोघरी घंटागाडी पोहचत आहे. मात्र अद्याप काही भागातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे.हिंगोली नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे शहरस्वच्छतेवर मुख्याधिकारी भर देत आहेत. प्रत्येक्ष पाहणी करणे, सफाई कर्मचाºयांच्या अडचणी जाणून घेणे, स्वच्छतेसाठी असलेल्या घंटागाडी तसेच इतर वाहने यावर त्यांचे नियंत्रण असते. परंतु हिंगोली शहर खरच स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे का? असा प्रश्नही कधी-कधी नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. शहरातील जुने शासकीय रूग्णालय, भाजीमंडई, जुने ग्रामीण पोलीस ठाणे, जवाहर रोड या ठिकाणी असलेल्या कचराकुंड्यातील कचºयाची वेळेवर कधीच विल्हेवाट लावली जात नाही. सध्या कचराकुंडीमुक्त शहर करण्याचा निश्चय पालिकेने घेतला असल्याने आता कुंड्या दिसत नाहीत. घरपर्यंत घंटागाडी पोहचत असल्याने त्यातच कचरा टाकला जात आहे. परंतु शहरातील अनेक ठिकाणचा कचरा हा जाग्यावरच कुजत आहे. हिंगोली शहरात ज्या ठिकाणी कुंड्या आहेत त्यातील कचºयाची वेळेत विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी, परिसरातील अस्वच्छतेने कळस गाठला आहे.कचरा अस्ताव्यवस्त असल्याने त्यावर गुरांचा संचार असतो. असे चित्र अजूनही काही भागात आहे. मात्र हे चित्र बदलू लागले आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ मध्ये हिंंगोली पालिकेने सहभाग घेतला आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी धडपड केली जात आहे. उपक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचाºयांचा सन्मान केला जात आहे. स्वच्छ सर्वेक्षणामुळे थोडेफार शिस्तीकडे झुकलेले शहर पुन्हा पहिल्या मार्गाने जाण्याची भीती आहे.हिंगोली येथील स्वच्छता अभियानाला गती आल्यानंतर शहरात काही दिवस सर्वच रस्ते अगदी चकाचक दिसत होते. आता मुख्य काही रस्ते साडले तर कचरा साठलेला रस्ताच सापडत नाही. विशेष म्हणजे शहराचा कचरा उचलण्यावरील खर्चात चार ते पाचपट वाढ झाली अन् कचरा मात्र जागीच आहे. घंटागाड्यांतून जाणारा कचरा तेवढा थेट बाहेर जातो. मात्र पालिकेच्या कल्पाण मंडपम्मध्ये हिंगोली नगरपालिका असे नाव टाकून तब्बल ९ घंटागाड्या धूळखात उभ्या आहेत. लाखोंचा खर्च करूनही या गाड्या जागीच का उभ्या आहेत, याची माहितीही कुणी द्यायला तयार नाही. तर कचराच उचलला जात नसल्याने काही जणांनी कचराकुंड्या रिकाम्या करून याच वाहनांजवळ आणून टाकल्या. त्यांचीही संख्या दहा ते बारा एवढी आहे. त्यामुळे कंत्राटदारांवर नियंत्रण नाही अन् यंत्रणेचाही योग्य वापर नाही, असे चित्र निर्माण झाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMuncipal Corporationनगर पालिका