शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नागरिकांनी फिरविली लसीकरणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

हिंगोली : कोरोना प्रतिबंध लस टोचून घेण्यासाठी महिनाभरापूर्वी दिसणारी गर्दी सद्य:स्थितीत दिसून येत नाही. गुरुवारी कल्याण मंडपम् येथे ...

हिंगोली : कोरोना प्रतिबंध लस टोचून घेण्यासाठी महिनाभरापूर्वी दिसणारी गर्दी सद्य:स्थितीत दिसून येत नाही. गुरुवारी कल्याण मंडपम् येथे दुपारी १ वाजेच्या दरम्यान कर्मचारी वगळता दोनच नागरिक लसीकरण करताना दिसून आले. नागरिकांची आम्ही वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दिली.

कोरोना महामारी संसर्गाची दुसरी लाट ओसरत चालली असली तरी येणाऱ्या तिसऱ्या लाटेची भीतीही नागरिकांना वाटत नाही. नागरिक लसीकरण का करून घेत नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. लसीकरण केल्यास ताप येतो, अंग दुखते आदी चर्चा आजही नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे. गत दोन महिन्यांपूर्वी शहरातील कल्याण मंडपम्, सरजूदेवी विद्यालय, माणिक स्मारक विद्यालय आदी केंद्रांवर लसीकरण करून घेण्यासाठी रांगा लागायच्या. परंतु, आजमितीस दोन-चार नागरिकच लसीकरण करताना दिसून येत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत लसीकरणाची वेळ ठेवली आहे. १८ वर्षांवरील वयोगटातील लसीकरण सुरू झाल्यास गर्दी वाढेल, अशी माहिती केंद्रावरून देण्यात आली.

आजपर्यंत कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस १ लाख १६ हजार १५५ नागरिकांना तर दुसरा डोस ३५ हजार ४७१ जणांना दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे १ लाख ७९ हजार १०० तसेच कोव्हॅक्सिनचे ३६ हजार ६७० असे एकूण २ लाख १५ हजार ७७० डोस आलेले आहेत.

तिसरी लाट समोर ठेवून

लसीकरण करून घ्यावे

दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना महामारीचा धोका कायमच आहे. तिसरी लाट डोळ्यांसमोर ठेवून नागरिकांनी लसीकरण वेळात वेळ काढून करून घ्यावे. लसीकरणाबाबत हयगय करू नये.

- प्रेमकुमार ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी

फोटो १४