शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

निसर्ग शाळेतील चिमुकल्यांचा चिवचिवाट पोहोचला गोवा राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:22 IST

हिंगोली : उच्च ध्येय प्राप्त करत असतानाच मुले निरोगी आयुष्य कसे जगतील, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवत ‘एक मूल, ...

हिंगोली : उच्च ध्येय प्राप्त करत असतानाच मुले निरोगी आयुष्य कसे जगतील, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवत ‘एक मूल, तीस झाडे’ या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात निसर्गशाळा सुरू करण्यात आली असून, बघता बघता ती आता गोवा राज्यात पोहोचली आहे. परराज्यातील मुले निसर्गशाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत.

मानवाच्या जीवनातील ढासळलेली नैसर्गिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे, असा संदेश ही निसर्गशाळा देेऊ पाहत आहे. गत दीड वर्षापासून एका अदृश्य विषाणूने मानवाला भयभीत करून सोडले आहे. परिस्थितीत सहनशीलता आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यापलीकडे आपल्याजवळ दुसरा मार्गच उरला नाही. मुलांना निसर्गाची ओढ लागावी म्हणून कवी अण्णा जगताप यांनी ‘निसर्गशाळा’ सुरू करून मुलांना निरोगी राहण्यासाठी एक वेगळी दिशा दिली आहे.

१ मे २०२१ रोजी निसर्गाच्या शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. आता बघता बघता ही निसर्गशाळा परराज्यात म्हणजे गोवा येथे पोहोचली आहे. एका महिन्यात निसर्गशाळेत ५२० जणांनी प्रवेश घेतला आहे. या निसर्गाच्या शाळेत १४ वर्षांखालील मुलांना प्रवेश दिला जातो. अगदी रांगत्या लेकरापासून मुले निसर्गाच्या शाळेत दाखल होऊन पालकांच्या मदतीने निसर्गाची शाळा शिकत आहेत.

निसर्गाची शाळा आठवड्यातील एक दिवस, एक घंटा चालत असते. बाकीचे दिवस मुलांना कृती करण्यासाठी वेळ दिला जातो. फक्त पुस्तकी ज्ञानाचे प्रचंड ओझे पाठीवर वाहन्यापेक्षा मुलांचे मातीशी नाते जोडले जावे, हा निसर्गशाळेचा निखळ हेतू आहे, असे अण्णा जगताप यांनी सांगितले.

झाडे लावण्यापासून झाडांचे संगोपन कसे? करता येईल याची माहिती निसर्गशाळेत दिली जात आहे. महाराष्ट्रातील २५०च्या वर विद्यार्थ्यांनी घरच्या घरी फळझाडांची रोपवाटिका तयार करायला सुरुवात केली आहे. बी रुजवायचं कसे, बी उगवतं कसे, त्याला पाणी किती टाकायचे, ते वाढतं कसे, त्याचे जतन कसे? करायचे? रोप लावायचे कसे? याचे शिक्षण निसर्गशाळेत दिले जात आहे. महाराष्ट्रातील पालघर, मुंबई. नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, जालना, लातूर, अमरावती, वाशिम, नांदेड, यवतमाळ, बीड, नागपूर, हिंगोली, परभणी आदी २५ जिल्ह्यांतील ५२० मराठी भाषिक मुले निसर्गाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत.

मुले आनंदी राहावीत हाच उद्देश

कोरोनाने जगणे कठीण करून सोडले आहे. शाळा तर दीड वर्षापासून बंदच आहेत. त्यामुळे मुलांना घरी बसण्याशिवाय पर्यायच उरला नाही. मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी आणि मुले आनंदी राहावीत, हा निसर्गशाळेचा उद्देश आहे,

- अण्णा जगताप, ‘एक मूल, तीस झाडे’ अभियान प्रमुख