शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

निसर्ग शाळेतील चिमुकल्यांचा चिवचिवाट पोहोचला गोवा राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:22 IST

हिंगोली : उच्च ध्येय प्राप्त करत असतानाच मुले निरोगी आयुष्य कसे जगतील, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवत ‘एक मूल, ...

हिंगोली : उच्च ध्येय प्राप्त करत असतानाच मुले निरोगी आयुष्य कसे जगतील, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवत ‘एक मूल, तीस झाडे’ या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात निसर्गशाळा सुरू करण्यात आली असून, बघता बघता ती आता गोवा राज्यात पोहोचली आहे. परराज्यातील मुले निसर्गशाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत.

मानवाच्या जीवनातील ढासळलेली नैसर्गिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे, असा संदेश ही निसर्गशाळा देेऊ पाहत आहे. गत दीड वर्षापासून एका अदृश्य विषाणूने मानवाला भयभीत करून सोडले आहे. परिस्थितीत सहनशीलता आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यापलीकडे आपल्याजवळ दुसरा मार्गच उरला नाही. मुलांना निसर्गाची ओढ लागावी म्हणून कवी अण्णा जगताप यांनी ‘निसर्गशाळा’ सुरू करून मुलांना निरोगी राहण्यासाठी एक वेगळी दिशा दिली आहे.

१ मे २०२१ रोजी निसर्गाच्या शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. आता बघता बघता ही निसर्गशाळा परराज्यात म्हणजे गोवा येथे पोहोचली आहे. एका महिन्यात निसर्गशाळेत ५२० जणांनी प्रवेश घेतला आहे. या निसर्गाच्या शाळेत १४ वर्षांखालील मुलांना प्रवेश दिला जातो. अगदी रांगत्या लेकरापासून मुले निसर्गाच्या शाळेत दाखल होऊन पालकांच्या मदतीने निसर्गाची शाळा शिकत आहेत.

निसर्गाची शाळा आठवड्यातील एक दिवस, एक घंटा चालत असते. बाकीचे दिवस मुलांना कृती करण्यासाठी वेळ दिला जातो. फक्त पुस्तकी ज्ञानाचे प्रचंड ओझे पाठीवर वाहन्यापेक्षा मुलांचे मातीशी नाते जोडले जावे, हा निसर्गशाळेचा निखळ हेतू आहे, असे अण्णा जगताप यांनी सांगितले.

झाडे लावण्यापासून झाडांचे संगोपन कसे? करता येईल याची माहिती निसर्गशाळेत दिली जात आहे. महाराष्ट्रातील २५०च्या वर विद्यार्थ्यांनी घरच्या घरी फळझाडांची रोपवाटिका तयार करायला सुरुवात केली आहे. बी रुजवायचं कसे, बी उगवतं कसे, त्याला पाणी किती टाकायचे, ते वाढतं कसे, त्याचे जतन कसे? करायचे? रोप लावायचे कसे? याचे शिक्षण निसर्गशाळेत दिले जात आहे. महाराष्ट्रातील पालघर, मुंबई. नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, जालना, लातूर, अमरावती, वाशिम, नांदेड, यवतमाळ, बीड, नागपूर, हिंगोली, परभणी आदी २५ जिल्ह्यांतील ५२० मराठी भाषिक मुले निसर्गाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत.

मुले आनंदी राहावीत हाच उद्देश

कोरोनाने जगणे कठीण करून सोडले आहे. शाळा तर दीड वर्षापासून बंदच आहेत. त्यामुळे मुलांना घरी बसण्याशिवाय पर्यायच उरला नाही. मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी आणि मुले आनंदी राहावीत, हा निसर्गशाळेचा उद्देश आहे,

- अण्णा जगताप, ‘एक मूल, तीस झाडे’ अभियान प्रमुख