शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

केंद्राचे अधिकारी तळ ठोकून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:58 IST

जिल्ह्यातील ५ गावांमध्ये ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार असून यात विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे. यात खरेच काही काम होतेय की नाही, याची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाचे दोन अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील ५ गावांमध्ये ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार असून यात विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे. यात खरेच काही काम होतेय की नाही, याची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाचे दोन अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी याबाबत अनेक बैठका घेतल्या. आजही अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण, खुदाबक्ष तडवी, गोविंद रणवीकर, डॉ.राहुल गिते, शांतीलाल चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. केंद्र शासनाचे अधिकारी उपसचिव सोनकुसरे तसेच सहसचिव अख्तरुल हनिफ हे हिंगोलीत तळ ठोकून आहेत. यात कळमनुरीतील तुप्पा, सेनगावातील सिंदेफळ, वसमतचे कौडगाव व हिंगोलीतील देवठाणा आणि कलगाव या गावांचा समावेश आहे. ते या गावांचे दौरे करीत असून ग्रामस्थांमधून या योजनेच्या अंमलबजावणीबाबत जाणून घेत आहेत. ग्रामस्थांना निकषात बसत असल्यास व पात्र असल्यास सात योजनांचा लाभ द्यावयाचा आहे. यात प्रधानमंत्री जनधन योजनेत १00 टक्के बँक खाते उघडणे अभिप्रेत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत प्रतिव्यक्ती १२ रुपये याप्रमाणे विमा उतरावयाचा आहे. यात अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबास २ लाखांची मदत मिळते. तर प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत ३३0 रुपये विमा भरल्यास २ लाखांची जोखीमहमी आहे. प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजनेचे कामही सुरू आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत गॅस जोडणी देण्यात येणार आहे. मिशन इंद्रधनुषअंतर्गत बालके व महिलांना लसीकरण होेणार आहे. तर प्रधानमंत्री उजाला योजनेत ५0 रुपयांत एलईडी बल्बची व्यवस्थाही आहे. १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ही योजना सुरू झाली. आता २८ एप्रिलला ग्रामस्वराज्य दिन, २ मे रोजी किसान दिन, ५ मे रोजी अजिविका दिवस साजरा होणार आहे.तुप्पा, सिंदेफळ, कौडगाव, देवठाणा व कलगाव या पाच गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरणासाठी शिबीर घेतले. यात अनुसूचित जातीतील २१0, अनुसूचित जमातीतील १७ व इतर १२२ अशा एकूण ३४९ कुटुंबियांना सौभाग्यच्या माध्यमातून वीज जोडणी दिली. दारिद्र्य रेषेखालील कुटूंबियांना विनामूल्यतर इतर गरिब परस्थिती असलेल्या कुटुंबियांना 50 रुपये प्रतिमहिना याप्रमाणे केवळ पाचशे रूपयांत वीज जोडणी दिली आहे. यामध्ये तुप्पा ८२, सिंदेफळ ४३, कौडगाव-७५, देवठाणा-८0 व कालगावला ६९ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे.प्रथमच केंद्र शासनाचे अधिकारी एखाद्या जिल्ह्यात तळ ठोकून बसल्याचे चित्र आहे. तर या योजनेत ग्रामस्थांना थेट लाभ मिळत आहे. त्यामुळे ज्यांना यात लाभ मिळत आहे, त्यांचे चेहरे आनंदाने उजळत आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcollectorतहसीलदार