शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
4
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
5
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
6
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
7
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
8
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
9
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
10
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
11
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
12
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
13
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
14
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
15
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
16
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
17
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
18
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
19
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
20
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचे अधिकारी तळ ठोकून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:58 IST

जिल्ह्यातील ५ गावांमध्ये ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार असून यात विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे. यात खरेच काही काम होतेय की नाही, याची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाचे दोन अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील ५ गावांमध्ये ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार असून यात विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे. यात खरेच काही काम होतेय की नाही, याची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाचे दोन अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी याबाबत अनेक बैठका घेतल्या. आजही अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण, खुदाबक्ष तडवी, गोविंद रणवीकर, डॉ.राहुल गिते, शांतीलाल चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. केंद्र शासनाचे अधिकारी उपसचिव सोनकुसरे तसेच सहसचिव अख्तरुल हनिफ हे हिंगोलीत तळ ठोकून आहेत. यात कळमनुरीतील तुप्पा, सेनगावातील सिंदेफळ, वसमतचे कौडगाव व हिंगोलीतील देवठाणा आणि कलगाव या गावांचा समावेश आहे. ते या गावांचे दौरे करीत असून ग्रामस्थांमधून या योजनेच्या अंमलबजावणीबाबत जाणून घेत आहेत. ग्रामस्थांना निकषात बसत असल्यास व पात्र असल्यास सात योजनांचा लाभ द्यावयाचा आहे. यात प्रधानमंत्री जनधन योजनेत १00 टक्के बँक खाते उघडणे अभिप्रेत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत प्रतिव्यक्ती १२ रुपये याप्रमाणे विमा उतरावयाचा आहे. यात अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबास २ लाखांची मदत मिळते. तर प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत ३३0 रुपये विमा भरल्यास २ लाखांची जोखीमहमी आहे. प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजनेचे कामही सुरू आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत गॅस जोडणी देण्यात येणार आहे. मिशन इंद्रधनुषअंतर्गत बालके व महिलांना लसीकरण होेणार आहे. तर प्रधानमंत्री उजाला योजनेत ५0 रुपयांत एलईडी बल्बची व्यवस्थाही आहे. १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ही योजना सुरू झाली. आता २८ एप्रिलला ग्रामस्वराज्य दिन, २ मे रोजी किसान दिन, ५ मे रोजी अजिविका दिवस साजरा होणार आहे.तुप्पा, सिंदेफळ, कौडगाव, देवठाणा व कलगाव या पाच गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरणासाठी शिबीर घेतले. यात अनुसूचित जातीतील २१0, अनुसूचित जमातीतील १७ व इतर १२२ अशा एकूण ३४९ कुटुंबियांना सौभाग्यच्या माध्यमातून वीज जोडणी दिली. दारिद्र्य रेषेखालील कुटूंबियांना विनामूल्यतर इतर गरिब परस्थिती असलेल्या कुटुंबियांना 50 रुपये प्रतिमहिना याप्रमाणे केवळ पाचशे रूपयांत वीज जोडणी दिली आहे. यामध्ये तुप्पा ८२, सिंदेफळ ४३, कौडगाव-७५, देवठाणा-८0 व कालगावला ६९ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे.प्रथमच केंद्र शासनाचे अधिकारी एखाद्या जिल्ह्यात तळ ठोकून बसल्याचे चित्र आहे. तर या योजनेत ग्रामस्थांना थेट लाभ मिळत आहे. त्यामुळे ज्यांना यात लाभ मिळत आहे, त्यांचे चेहरे आनंदाने उजळत आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcollectorतहसीलदार