शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

‘त्या’ ठरावावरून झाली कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:27 IST

शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चा न होताच ठराव घेतल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी जि.प. अध्यक्षांसमोर लिहून दिले. सभापतींच्या दबावाखाली हे केल्याने यावर काय कारवाई करणार, असा सवाल करून जि.प.सदस्या रत्नमाला चव्हाण यांनी प्रशासनाला चांगलेच कोंडीत पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चा न होताच ठराव घेतल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी जि.प. अध्यक्षांसमोर लिहून दिले. सभापतींच्या दबावाखाली हे केल्याने यावर काय कारवाई करणार, असा सवाल करून जि.प.सदस्या रत्नमाला चव्हाण यांनी प्रशासनाला चांगलेच कोंडीत पकडले.अर्थसंकल्पीय सभेत ऐनवेळच्या प्रश्नांमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला होता. यावेळी अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांनीही संबंधितांनी चूक झाल्याचे मान्य केले. माफीही मागितली. आता त्यांना माफ करा, असे सांगितल्याने चव्हाण यांना चांगलेच बळ मिळाले. तर इतर सदस्यांनीही साथ दिल्याने सीईओ एच.पी. तुम्मोड यांनाच यात काय कारवाई करणार, अशी विचारणा केली. त्यांनी शिक्षणाधिकारी इंगोले यांना कारणे दाखवा दिली असून खुलासा येताच त्यानुसार कारवाई करू, असे सांगितले. चव्हाण यांनी हा मुद्दा चांगलाच रेटून धरल्याने प्रशासनाची मात्र कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सभापती संजय देशमुख यांनी मात्र इतिवृत्त समितीसमोर सादर केले तेव्हा त्यावर कोणीच आक्षेप घेतला नसल्याचे सांगितले.यावेळी शिक्षण हक्कमधील मोफत प्रवेशासाठी लाभार्थी व शिक्षण विभाग अशा दोघांकडूनही शाळा पैसे लाटत असल्याचा प्रश्न जाणीवपूर्वक ताटकळत ठेवला जात असल्याचा आरोप जि.प.सदस्य चौतमल यांनी केला. लवकरच अहवाल देऊ, असे शिक्षणाधिकाºयांनी सांगितले. तर चट्टोपाध्याय वेतनश्रीचा प्रश्न डॉ.सतीश पाचपुते यांनी विचारल्यावर तुम्मोड यांनी ८७ पात्र प्राथमिक शिक्षकांपैकी ६३ जणांना दिली. २0 जणांची कागदपत्रे व्यवस्थित नाहीत. तर ४ जणांना देता येत नसल्याचे सांगितले. घरकुल लाभार्थ्यांची ड यादी सादर होत नसल्याच्या प्रश्नावर सीईओंनी सर्व बीडीओंना शनिवारची डेडलाईन दिली. तर लासिना येथील आरोग्य उपकेंद्र बंद राहत असल्याचा मुद्दाही चौतमल यांनी मांडल्यानंतर अशा सर्वच ठिकाणच्या उपकेंद्रांची पाहणी करून ठोस कारवाईचे आश्वासन आरोग्य विभागाने दिले. तर उपाध्यक्ष अनिल पतंगे यांनी गावात जावून या कर्मचाºयांनी सेल्फी पाठविण्याचा प्रयोग राबवू, असे सांगितले. अध्यक्षा नरवाडे यांनीही अनेक ठिकाणी अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहत असून कडक कारवाईच्या सूचना दिल्या. वसमत पं.स.चे सभापती दळवी यांनी सर्व शिक्षातील कर्मचारी येत नसून ठराव घेवूनही त्याच्यावर कारवाई नाही. इतरही अनेक बाबींत असेच घडते, असा आरोप केला. प्र.मा. नसताना घरकुले झाली. आता निधी देत नाहीत. अभियंतेही ऐकत नाहीत. मग अशांवर कोण कारवाई करणार? असा उद्विग्न सवाल केला.