शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

प्रवाशांच्या सोयीकरिता जिंतूरमार्गे बसेस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST

हिंगोली : डेल्टा प्लस आजाराच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाने परभणी-हिंगोली बस सेवा २९ जूनपासून बंद केली आहे. त्यामुळे ...

हिंगोली : डेल्टा प्लस आजाराच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाने परभणी-हिंगोली बस सेवा २९ जूनपासून बंद केली आहे. त्यामुळे हिंगोली आगाराने औरंगाबादला जाणाऱ्या बसेस रिसोडमार्गे सुरू केल्या होत्या. परंतु, रिसोडमार्गे किलोमीटर जास्त होत असल्याने जिंतूर मार्गे बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

परभणी जिल्हा प्रशासनाने २९ जूनपासून ३ जुलैपर्यंत परभणी आगाराची बस हिंगोलीला जाणार नाही आणि हिंगोली आगाराची बस परभणीला येणार नाही, असा आदेश काढला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातून औरंगाबादला जाणाऱ्या बसेस २९ जूनपासून रिसोड मार्गे जात होत्या. रिसोडमार्गे औरंगाबादला जाण्यासाठी किलोमीटरमध्ये वाढ होत असल्यामुळे हिंगोली एस. टी. आगाराने औरंगाबादला जाणाऱ्या सर्व बसेस यापुढे जिंतूर मार्गे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादला जाणारी प्रत्येक बस जिंतूर आगारात न जाता जिंतूरच्या बाहेरूनच औरंगाबादला घेऊन जावी, असेही चालक आणि वाहकांना सूचित केले आहे. एस. टी. आगाराच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून परभणी जिल्ह्यातील झीरो फाटापर्यंत बसेस सोडण्यात येत आहेत, असेही हिंगोली आगाराने सांगितले.

हिंगोली ते कोल्हापूर बस बंद

हिंगोली ते कोल्हापूर बस परभणीमार्गे जात होती. परंतु, पुढील आदेश येईपर्यंत ती बंद करण्यात आली आहे. कोल्हापूरसाठी दुसरा मार्ग नाही, त्यामुळे ही बस बंदच करण्यात आली आहे. हिंगोली ते सोलापूर जाणारी बस परभणी मार्गे न पाठविता नांदेड मार्गे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. हिंगोली ते पुणे, हिंगोली ते औरंगाबाद, हिंगोली ते नाशिक, पुसद ते मुंबई या सर्व बसेस पुढील आदेश येईपर्यंत जिंतूर आगारात न जाता बाहेरून औरंगाबादला जातील.

- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली

एस. टी. लोगो घेणे.