शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी नसल्यामुळे बसेस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST

हिंगोली आगारात मानव विकासच्या २१ बसेस सद्य:स्थितीत आहेत. शाळा सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असली, तरी पालकांनी विद्यार्थ्यांचे ...

हिंगोली आगारात मानव विकासच्या २१ बसेस सद्य:स्थितीत आहेत. शाळा सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असली, तरी पालकांनी विद्यार्थ्यांचे पास काढले नसल्यामुळे आम्हाला बसेस सुरू करता येत नाहीत. दोनशे मुलींनी पास काढला असल्यामुळे हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील मानव विकासची बस सुरू केली आहे. हिंगोली ते सिरसम ही बस नियमित सुरू आहे.

कोरोनाचे प्रमाण जिल्ह्यात अजूनही कायम आहे. कोरोना आजाराच्या भीतीमुळे पालकवर्ग शाळा सुरू झाल्या असल्या तरी मुलांना पाठवत नाहीत. विद्यार्थ्यांनी पास काढला तर महामंडळाला बस सुरू करता येते. तेव्हा पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना पास काढण्यास सांगावे, असे महामंडळाचे म्हणणे आहे.

कोरोनाआधी सर्वच बसेस धावत होत्या. २३ मार्चपासून कोरोनाचा संसर्ग वाढला होता. विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मानव विकास व इतर बसेस बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाआधी मात्र जिल्ह्यातील सर्वच बसेस धावत होत्या. आज जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी पालकवर्ग विद्यार्थ्याचे पास काढत नाहीत. सद्य: स्थितीत हिंगोली तालुक्यातील सिरसम या मार्गावर मानव विकासची बस सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर २०० मुलींनी पास काढला आहे. त्यामुळे महामंडळाने मानव विकासची बस सुरू केली आहे.

प्रतिक्रिया

हिंगोली आगारात मानव विकासच्या २१ बसेस आहेत. यापैकी हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील बस सुरू आहे. पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचा पास काढावा. म्हणजे बसेस सुरू करता येतील.

-संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख.

कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने एस. टी. महामंडळाने बसेस सुरू केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद वाटत आहे. दुसरीकडे सावरगावची बस मात्र वेळेवर धावत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.

-कार्तिक दिवटे, विद्यार्थी.

जिल्ह्यात काही ठिकाणीच महामंडळाच्या बसेस सुरू केल्या आहेत. हिंगोली तालुक्यातील राहोली येथील बस सुरू आहे; पण ही बस वेळेवर धावत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला उशीर होत आहे.

समाधान लोणकर, विद्यार्थी.