शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

महामारीतही लाचखोरी जोरात; ग्रामविकास सर्वांत पुढे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

हिंगोली : कोरोनाचे संकट मागील १५ महिन्यांपासून घोंगावत आहे. या संकटामुळे सर्व व्यवहार ठप्प असताना अशाही काळात लाचखोर कर्मचारी, ...

हिंगोली : कोरोनाचे संकट मागील १५ महिन्यांपासून घोंगावत आहे. या संकटामुळे सर्व व्यवहार ठप्प असताना अशाही काळात लाचखोर कर्मचारी, अधिकाऱ्यांना मात्र कोणताही फरक पडलेला दिसत नाही. मागील दीड वर्षाच्या काळात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने जिल्ह्यात १३ सापळा कारवाई केल्या आहेत. यात सर्वांत पुढे ग्रामविकास विभाग असून, त्यानंतर महसूल विभागाचा क्रमांक लागत आहे.

कोरोना आजाराने सर्वांनाच त्रस्त करून सोडले आहे. दिवसेंदिवस रुग्ण आढळून येत असून, आतापर्यंत १५ हजार ५५९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १४ हजार ७७९ रुग्ण बरे झाले, तर ३५० जणांना मृत्यूने गाठले आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारीही कोरोनायोद्धा म्हणून काम करीत असताना त्याचवेळी काही लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मात्र कोरोना काळातही लाचखोरी केली. मागील दीड वर्षापासून सर्वच क्षेत्रांतील नागरिक कोरोनाने त्रस्त आहेत. तरीही लाचखोरांनी लाच मागण्याचे थांबविले नाही. २०२० यावर्षी येथील लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने ११ सापळा कारवाई केली. यात १३ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, तर २०२१ यावर्षी आतापर्यंत दोन सापळा कारवाई करण्यात आली. यावर्षी ग्रामविकास विभागातील पाच, महसूल विभाग तीन, तर कृषी, गृह, आरोग्य विभागातील एका प्रकरणात सापळा कारवाई करण्यात आली, तर २०२१ या वर्षीही आतापर्यंत दोन प्रकरणात सापळा कारवाई करण्यात आली.

कोणत्या वर्षात किती कारवाया

२०१९- १३

२०२० -११

२०२१ मे पर्यंत - २

सर्वांत जास्त कारवाया हिंगोली तालुक्यात

२०२० ते २१ यावर्षी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने १३ कारवाया केल्या. यात सर्वाधिक कारवाया हिंगोली तालुक्यात झाल्या आहेत. हिंगोली तालुक्यातील सहा कारवाया झाल्या आहेत. त्यानंतर कळमनुरी तालुक्याचा क्रमांक लागतो. कळमनुरी तालुक्यात तीन, वसमत दोन, तर सेनगाव व औंढा तालुक्यांत प्रत्येकी एक कारवाई झाली आहेे.

कोरोना काळात ग्रामविकासची वरकमाई जोरात

ग्रामविकास विभाग - ५

महसूल - ३

कृषी - २

गृह विभाग - १

आरोग्य विभाग -१

वित्त विभाग - १

कोणताही शासकीय कर्मचारी, अधिकारी अथवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्ती त्याचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२४५६ - २२३०५५ किंवा ९९२३०४२५६५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.