शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

महामारीतही लाचखोरी जोरात; ग्रामविकास सर्वांत पुढे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

हिंगोली : कोरोनाचे संकट मागील १५ महिन्यांपासून घोंगावत आहे. या संकटामुळे सर्व व्यवहार ठप्प असताना अशाही काळात लाचखोर कर्मचारी, ...

हिंगोली : कोरोनाचे संकट मागील १५ महिन्यांपासून घोंगावत आहे. या संकटामुळे सर्व व्यवहार ठप्प असताना अशाही काळात लाचखोर कर्मचारी, अधिकाऱ्यांना मात्र कोणताही फरक पडलेला दिसत नाही. मागील दीड वर्षाच्या काळात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने जिल्ह्यात १३ सापळा कारवाई केल्या आहेत. यात सर्वांत पुढे ग्रामविकास विभाग असून, त्यानंतर महसूल विभागाचा क्रमांक लागत आहे.

कोरोना आजाराने सर्वांनाच त्रस्त करून सोडले आहे. दिवसेंदिवस रुग्ण आढळून येत असून, आतापर्यंत १५ हजार ५५९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १४ हजार ७७९ रुग्ण बरे झाले, तर ३५० जणांना मृत्यूने गाठले आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारीही कोरोनायोद्धा म्हणून काम करीत असताना त्याचवेळी काही लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मात्र कोरोना काळातही लाचखोरी केली. मागील दीड वर्षापासून सर्वच क्षेत्रांतील नागरिक कोरोनाने त्रस्त आहेत. तरीही लाचखोरांनी लाच मागण्याचे थांबविले नाही. २०२० यावर्षी येथील लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने ११ सापळा कारवाई केली. यात १३ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, तर २०२१ यावर्षी आतापर्यंत दोन सापळा कारवाई करण्यात आली. यावर्षी ग्रामविकास विभागातील पाच, महसूल विभाग तीन, तर कृषी, गृह, आरोग्य विभागातील एका प्रकरणात सापळा कारवाई करण्यात आली, तर २०२१ या वर्षीही आतापर्यंत दोन प्रकरणात सापळा कारवाई करण्यात आली.

कोणत्या वर्षात किती कारवाया

२०१९- १३

२०२० -११

२०२१ मे पर्यंत - २

सर्वांत जास्त कारवाया हिंगोली तालुक्यात

२०२० ते २१ यावर्षी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने १३ कारवाया केल्या. यात सर्वाधिक कारवाया हिंगोली तालुक्यात झाल्या आहेत. हिंगोली तालुक्यातील सहा कारवाया झाल्या आहेत. त्यानंतर कळमनुरी तालुक्याचा क्रमांक लागतो. कळमनुरी तालुक्यात तीन, वसमत दोन, तर सेनगाव व औंढा तालुक्यांत प्रत्येकी एक कारवाई झाली आहेे.

कोरोना काळात ग्रामविकासची वरकमाई जोरात

ग्रामविकास विभाग - ५

महसूल - ३

कृषी - २

गृह विभाग - १

आरोग्य विभाग -१

वित्त विभाग - १

कोणताही शासकीय कर्मचारी, अधिकारी अथवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्ती त्याचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२४५६ - २२३०५५ किंवा ९९२३०४२५६५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.