शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदारांनी वापरले बहिष्कारासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:22 IST

मिनी ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. गत विधानसभा निवडणुकीत वसमत तालुक्यातील भोरीपगाव येथील नारिकांनी नवीन वस्त्यांमध्ये कोणत्याही सुविधा नाहीत. ...

मिनी ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. गत विधानसभा निवडणुकीत वसमत तालुक्यातील भोरीपगाव येथील नारिकांनी नवीन वस्त्यांमध्ये कोणत्याही सुविधा नाहीत. पाण्याची व्यवस्था नाही म्हणून बहिष्कार टाकला होता. कळमनुरी तालुक्यातील करवाडी ते नांदापूर हा रस्ता पावसाळ्यात डोकेदुखी ठरतो. पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो. रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. यासाठी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता.

आजही नागरिकांच्या समस्या सोडविल्या नाहीत. या वेळेस ग्रामपंचायत निवडणुकीत बळसोंडच्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला असून, जिल्हा प्रशासनाला निवेदनही दिले आहे.

विधानसभा निवडणुकीत दोन गावांनी टाकला होता बहिष्कार

वसमत तालुक्यातील भोरीपगाव व कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. भोरीपगाव येथील अनेक वस्त्यांमध्ये कोणतीच सुविधा मिळत नाही. अनेक समस्यांना दरवर्षी सामोरे जावे लागते. या संदर्भात त्रास जाऊन रहिवाशांनी तहसीलदारांना निवेदन दिले होते.

१५ वर्षांपासून सुविधाच नाही; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

गत पंधरा वर्षांपासून हिंगोली लगत असलेल्या बळसोंड येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सुविधा नसल्यामुळे रहिवाशांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. सुविधा करून द्याव्यात, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला निवदेनही दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.

बळसोंड येथे मागील काही दिवसांपासून पाण्याचे नळ नाहीत, विजेची समस्या अनेक दिवसांपासून भेडसावत आहे. त्याचबरोबर रस्ते नाहीत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो. यासाठी अनेक वेळा अर्ज-विनंतीही केल्या आहेत. परंतु, कोणीही लक्ष दिलेले नाही.

- प्रल्हाद दराडे, भारतनगर, बळसोंड

आनंदनगरामध्ये हातपंपाची व्यवस्था नाही. यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी येथील महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागरमोर्चाही काढला होता. अजूनही या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झालेली नाही. सुविधाही येथे नाहीत.

-राजू पवार, आनंदनगर, बळसोंड