शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

भरारी पथके रोखणार कृषिनिविष्ठांची साठेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

हिंगोली : खरीप हंगामासाठी गुणवत्तापूर्ण व पुरेशा प्रमाणात कृषिनिविष्ठा उपलब्ध व्हाव्यात तसेच कृषिनिविष्ठांची साठेबाजी रोखण्यासाठी कृषी विभागाने सहा भरारी ...

हिंगोली : खरीप हंगामासाठी गुणवत्तापूर्ण व पुरेशा प्रमाणात कृषिनिविष्ठा उपलब्ध व्हाव्यात तसेच कृषिनिविष्ठांची साठेबाजी रोखण्यासाठी कृषी विभागाने सहा भरारी पथके स्थापन केली आहेत. तसेच जादा दराने खते, बी-बियाणांची विक्री केल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे यांनी दिली. खरीप हंगाम जवळ आला असून, शेतकरी खरीप हंगामपूर्व शेतीची मशागत करण्यात व्यस्त आहेत. अनेक शेतकरी खरीप पेरणीचे नियोजन करीत आहेत. कृषी विभागही तयारीला लागला आहे. खते, बी-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन आखले आहे. तसेच कृषिनिविष्ठांची साठेबाजी होणार नाही, यासाठी जिल्हा स्तरावर एक व तालुकास्तरावर पाच अशी सहा भरारी पथके स्थापन केली आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर एकूण सहा निवारण समित्यांचीही स्थापना केली आहेे. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच पक्क्या पावतीसह खरेदी करावी, पावतीवर शेतकऱ्यांची स्वाक्षरी व विक्रेत्यांची स्वाक्षरी, मोबाइल नंबरची नोंद घ्यावी, खरेदी केलेल्या बियाणाचे वेस्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती, त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे, पॉकिटावर अंतिम मुदत पाहून घ्यावी, एमआरपीपेक्षा जादा दराने खते, बियाणे, कीटकनाशकाची खरेदी करू नये, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. काही तक्रारी असल्यास कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे, कृषी विकास अधिकारी एन.आर. कानवडे यांनी केले आहे.

गटामार्फत किंवा सामूहिक खरेदीला प्राधान्य द्या

कोरोना संसर्ग आजार लक्षात घेता कृषी दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी गटामार्फत किंवा सामूहिक कृषिनिविष्ठांची खरेदी करावी, असे आवाहन करीत एमआरपीपेक्षा जादा दराने कृषिनिविष्ठांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे लाेखंडे यांनी सांगितले.