शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

भरारी पथके रोखणार कृषिनिविष्ठांची साठेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

हिंगोली : खरीप हंगामासाठी गुणवत्तापूर्ण व पुरेशा प्रमाणात कृषिनिविष्ठा उपलब्ध व्हाव्यात तसेच कृषिनिविष्ठांची साठेबाजी रोखण्यासाठी कृषी विभागाने सहा भरारी ...

हिंगोली : खरीप हंगामासाठी गुणवत्तापूर्ण व पुरेशा प्रमाणात कृषिनिविष्ठा उपलब्ध व्हाव्यात तसेच कृषिनिविष्ठांची साठेबाजी रोखण्यासाठी कृषी विभागाने सहा भरारी पथके स्थापन केली आहेत. तसेच जादा दराने खते, बी-बियाणांची विक्री केल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे यांनी दिली. खरीप हंगाम जवळ आला असून, शेतकरी खरीप हंगामपूर्व शेतीची मशागत करण्यात व्यस्त आहेत. अनेक शेतकरी खरीप पेरणीचे नियोजन करीत आहेत. कृषी विभागही तयारीला लागला आहे. खते, बी-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन आखले आहे. तसेच कृषिनिविष्ठांची साठेबाजी होणार नाही, यासाठी जिल्हा स्तरावर एक व तालुकास्तरावर पाच अशी सहा भरारी पथके स्थापन केली आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर एकूण सहा निवारण समित्यांचीही स्थापना केली आहेे. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच पक्क्या पावतीसह खरेदी करावी, पावतीवर शेतकऱ्यांची स्वाक्षरी व विक्रेत्यांची स्वाक्षरी, मोबाइल नंबरची नोंद घ्यावी, खरेदी केलेल्या बियाणाचे वेस्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती, त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे, पॉकिटावर अंतिम मुदत पाहून घ्यावी, एमआरपीपेक्षा जादा दराने खते, बियाणे, कीटकनाशकाची खरेदी करू नये, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. काही तक्रारी असल्यास कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे, कृषी विकास अधिकारी एन.आर. कानवडे यांनी केले आहे.

गटामार्फत किंवा सामूहिक खरेदीला प्राधान्य द्या

कोरोना संसर्ग आजार लक्षात घेता कृषी दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी गटामार्फत किंवा सामूहिक कृषिनिविष्ठांची खरेदी करावी, असे आवाहन करीत एमआरपीपेक्षा जादा दराने कृषिनिविष्ठांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे लाेखंडे यांनी सांगितले.