शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आता महिनाभर दाढी-कटिंग घरातच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST

हिंगोली जिल्ह्यात सलूनची जवळपास हजारांवर दुकाने आहेत. यात प्रत्येकी तीन धरले तरीही जवळपास तीन हजार कारागीर आहेत. खेडोपाडीही बलुतेदारीत ...

हिंगोली जिल्ह्यात सलूनची जवळपास हजारांवर दुकाने आहेत. यात प्रत्येकी तीन धरले तरीही जवळपास तीन हजार कारागीर आहेत. खेडोपाडीही बलुतेदारीत अथवा सरळ घरोघर जाऊन व्यवसाय करणारेही वेगळे आहेत. सलून बंद म्हटले की, सर्वच ठिकाणच्या व्यवसायावर परिणाम होतो. ज्यांची दुकाने भाड्याची आहेत, आई, वडील, मुले, असे मोठे कुटुंब आहे, अशांवर उपासमार ओढवत आहे. शिक्षणाचा खर्च, वैद्यकीय खर्च हे तर करणेच अवघड झाले. यापूर्वीही सात ते आठ महिने व्यवसाय ठप्प होता. आता पुन्हा तेच नशिबी आल्याने अनेकांना गावाकडे शेतात जाऊन राबण्याची वेळ येत आहे. अनेक दिवसांपासून हे काम करीत नसल्याने आता यातही फारशी मजुरी कोणी देत नाही, तर गुत्ते पद्धतीने कामे घेण्याशिवाय पर्याय राहत नसल्याचेही काहींनी सांगितले, तर काही जण आता मोंढ्यात जाऊन हमालीच करावी की काय? असा सवाल करीत आहेत.

हिंगोलीत एकूण केशकर्तनालये १५०

त्यावर अवलंबून कामगार ४५०

एकतर आमच्याकडे सॅनिटायझर, साबणाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, दुसरे म्हणजे आतापर्यंत सलूनमध्ये गेल्यावर बाधित झाल्याचे कुणी म्हटले नाही. आमच्या ९० टक्के समाजाची उपजीविका कर्तनालयावरच आहे. तरीही शासन कुठलीच मदत देत नाही. वारंवार आमच्याच मुळावर का उठताहेत, हे कळायला मार्ग नाही.

-अशोक गुळगुळे, जिल्हाध्यक्ष, नाभिक महामंडळ

यापूर्वीही आमची दुकाने आठ ते दहा महिने बंद होती. आता कसाबसा कारभार रुळावर येत होता, तर पुन्हा नव्याने संकट आले. दुकान भाडे, शिक्षण, वैद्यकीय खर्च कसा करावा. घरसंसार कसा चालवायचा? एकतर परवानगी द्या; अन्यथा आम्हाला मदत जाहीर करा.

-गजानन मोरे, युवा जिल्हाध्यक्ष, नाभिक महामंडळ

यापूर्वीच्या टाळेबंदीत दुकान भाडे न भरल्याने दुकान हातचे गेले. आता नवीन दुकान सुरू करण्याचा विचार करीत असतानाच पुन्हा बंदी आली. सध्या हळद काढणीच्या कामाला मजुरीवर जात आहे. असेच चालले तर मुलांचे शिक्षण, कुटुंबीयांच्या वैद्यकीय खर्चालाही हाती काही राहणार नाही.

-माउली कंठाळे, कारागीर

शासनाला गर्दीचे इतर सर्व उपक्रम चालतात. मात्र, आमच्या दुकानात एकावेळी एकाच ग्राहकाला प्रवेश असतो. शिवाय निर्जंतुकीकरणाच्या साहित्याशिवाय दाढी, कटिंग होत नाही. आम्ही मास्क घातलेला असतो. मग आमच्या व्यवसायाला बंदी घालून आम्हाला देशोधडीला का लावताय?

-बालाजी साखरे, कारागीर