शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
4
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
5
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
6
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
7
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
8
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
9
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
10
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
11
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
12
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
13
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
14
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
15
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
16
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
17
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
18
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
19
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
20
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सतर्क राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:28 IST

हिंगोली : आगामी मान्सून ऋतूत आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वय व तत्परतेने काम करण्याच्या ...

हिंगोली : आगामी मान्सून ऋतूत आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वय व तत्परतेने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात १४ मे रोजी मान्सूनपूर्व तयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, राज्य राखीव पोलीस दलाचे महानिदेशक संदीपसिंह गिल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

यावेळी जयवंशी म्हणाले, दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होत आहे. याहीवर्षी अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करावा, या ठिकाणी ॲन्सरिंग मशीन ठेवून येणाऱ्या सर्व कॉलची नोंद ठेवावी. प्रत्येक गावातील तीन जबाबदार नागरिकांच्या संपर्क क्रमांकांची यादी तयार ठेवावी. पर्जन्यमापक यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, तसेच आवश्यक असल्यास पर्जन्यमापक यंत्रे त्वरित खरेदी करावीत. पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासून घ्यावेत, पोलीस ठाणेनिहाय अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास सादर करावी. तसेच तालुकानिहाय शोध व बचावपथके अद्ययावत करावीत, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.

बैठकीस उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रवीण फुलारी, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, जे. के. कांबळे, कृष्णा कांगुले, मयूर खेंगले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे, आदींची उपस्थिती होती.

मान्सूनपूर्व करावयाची कामे पूर्ण करा

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही पाटबंधारे, नगरपालिका, जिल्हा परिषद, महावितरण कार्यालयासह रेल्वे प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, भारत संचार निगम लिमिटेड, राज्य राखीव पोलीस दल क्र. १२, गृहरक्षक दल, आदी विभागांतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व करावयाच्या कामांबाबत सूचना केल्या. पाटबंधारे विभागाने जलसंस्थाचे सर्वेक्षण करून आवश्यक ती देखभाल-दुरुस्ती करावी, नदीच्या पाणीपातळीचा गावांना धोका पाेहोचू नये याबाबत उपाययोजना करावी; महावितरणने रोहित्रांची, लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करून घ्यावी.

आरोग्य विभागानेही नियंत्रण कक्ष स्थापन करून साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी मुबलक औषधी साठा उपलब्ध करून ठेवावा. तसेच नगरपालिका प्रशासनानेही नियंत्रण कक्ष कार्यान्व‍ित करून शहरातील वस्तीमध्ये पाणी शिरणार नाही याचे नियोजन करावे, आदी सूचना त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.