शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सतर्क राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:28 IST

हिंगोली : आगामी मान्सून ऋतूत आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वय व तत्परतेने काम करण्याच्या ...

हिंगोली : आगामी मान्सून ऋतूत आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वय व तत्परतेने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात १४ मे रोजी मान्सूनपूर्व तयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, राज्य राखीव पोलीस दलाचे महानिदेशक संदीपसिंह गिल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

यावेळी जयवंशी म्हणाले, दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होत आहे. याहीवर्षी अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करावा, या ठिकाणी ॲन्सरिंग मशीन ठेवून येणाऱ्या सर्व कॉलची नोंद ठेवावी. प्रत्येक गावातील तीन जबाबदार नागरिकांच्या संपर्क क्रमांकांची यादी तयार ठेवावी. पर्जन्यमापक यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, तसेच आवश्यक असल्यास पर्जन्यमापक यंत्रे त्वरित खरेदी करावीत. पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासून घ्यावेत, पोलीस ठाणेनिहाय अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास सादर करावी. तसेच तालुकानिहाय शोध व बचावपथके अद्ययावत करावीत, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.

बैठकीस उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रवीण फुलारी, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, जे. के. कांबळे, कृष्णा कांगुले, मयूर खेंगले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे, आदींची उपस्थिती होती.

मान्सूनपूर्व करावयाची कामे पूर्ण करा

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही पाटबंधारे, नगरपालिका, जिल्हा परिषद, महावितरण कार्यालयासह रेल्वे प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, भारत संचार निगम लिमिटेड, राज्य राखीव पोलीस दल क्र. १२, गृहरक्षक दल, आदी विभागांतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व करावयाच्या कामांबाबत सूचना केल्या. पाटबंधारे विभागाने जलसंस्थाचे सर्वेक्षण करून आवश्यक ती देखभाल-दुरुस्ती करावी, नदीच्या पाणीपातळीचा गावांना धोका पाेहोचू नये याबाबत उपाययोजना करावी; महावितरणने रोहित्रांची, लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करून घ्यावी.

आरोग्य विभागानेही नियंत्रण कक्ष स्थापन करून साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी मुबलक औषधी साठा उपलब्ध करून ठेवावा. तसेच नगरपालिका प्रशासनानेही नियंत्रण कक्ष कार्यान्व‍ित करून शहरातील वस्तीमध्ये पाणी शिरणार नाही याचे नियोजन करावे, आदी सूचना त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.