शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बारूळ येथील मानार प्रकल्प गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:17 IST

येथील ५० वर्षे पूर्ण झालेला निम्न मानार प्रकल्प गाळात रुतला आहे़ या प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून काढून गाळयुक्त शिवार करण्यासाठी संबंधित कार्यालयाने आवाहन केले असून या प्रकल्पाचा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेत समावेश करण्यासाठी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे़

ठळक मुद्दे ५२ वर्षांत १७ हजार घनमीटरच गाळउपसा

लोकमत न्यूज नेटवर्कबारूळ : येथील ५० वर्षे पूर्ण झालेला निम्न मानार प्रकल्प गाळात रुतला आहे़ या प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून काढून गाळयुक्त शिवार करण्यासाठी संबंधित कार्यालयाने आवाहन केले असून या प्रकल्पाचा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेत समावेश करण्यासाठी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे़निम्न मानार प्रकल्पाची निर्मिती १९६२ साली शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाली़ या निम्न मानार धरणाची लांबी १८६० मीटर असून उंची २६़८२ मीटर आहे़ प्रकल्पाला डावा व उजवा असे दोन कालवे आहेत़ डावा कालवा ६८ कि़मी़ तर उजवा कालवा २१ कि़मी़ अंतराचा आहे़सततचा दुष्काळ, विविध रोगांमुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान, कर्जाचा डोंगर त्यामुळे शेतक-यांकडे हा गाळ घेवून जाण्यासाठी पैसे नाहीत़ त्यामुळे मानार प्रकल्प कार्यालयाच्या वतीने लोकसहभागातून गाळ काढून घेवून जाण्यासाठी प्रकल्पानजीकच्या ग्रामपंचायतींना कळविण्यात येईल, अशी माहिती शाखा अधिकारी आऱएल़ अजनाळकर यांनी दिली़ मात्र शेतकरी हा गाळ काढून घेण्यासाठी उत्साही नाहीत़ या प्रकल्पातील गाळ काढणे आवश्यक आहे़ प्रकल्पात सध्या १७ टक्के पाणीसाठा आहे़ चार तालुक्यांसाठी कामधेनू असलेल्या या प्रकल्पाची पाणीक्षमता वाढविण्यासाठी शेतकरी, प्रशासन, सामाजिक संस्था, स्थानिक पुढारी, जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून हा प्रकल्प गाळमुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याची चर्चा आहे़

बारूळ शिवारात २१ हेक्टर शेतजमिनीवरच टाकला गाळया प्रकल्पामुळे २३३१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून या प्रकल्पाचा कंधार, नायगाव, धर्माबाद, बिलोली या तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी उपयोग होतो़ या प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर २०१६ मध्ये प्रकल्पातील गाळ उपसा करण्यासाठी शेतकºयांना प्रबोधन केले़ त्यामुळे १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून तसेच तीन जेसीबी, दोन पोकलॅन, १६ टिप्पर, दोन ट्रॅक्टरच्या मदतीने केवळ १७ हजार घनमीटर एवढा काढला़ त्यामुळे या प्रकल्पातील साठवण क्षमतेत ५़५ मि़मी़ ने वाढ झाली़ मात्र या प्रकल्पातील गाळ १८ शेतकºयांनी घेतल्यामुळे साठवण क्षमतेची वाढ अत्यल्प ठरली आहे़ या परिसरातील २१ हेक्टर शेत जमिनीवर गाळ टाकला आहे़ 

उपयुक्त साठा १३८ दलघमी१४६़९२ दलघमी जलसाठा असलेल्या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ६९२ चौरस मैल, १ हजार ८५६ चौ़कि़मी़ आहे़ एकूण या प्रकल्पासाठी बुडीत क्षेत्र २ हजार ८६० हेक्टर असून यात ६ गावांची जमीन व गावे पुनर्वसित झाली आहेत़ या प्रकल्पाची मृतसाठा क्षमता ८़७१० दलघमी तर उपयुक्त जलसाठा १३८़२१ दलघमी आहे़ शनिवारी बारूळ येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पाहणी दौरा असून मानार प्रकल्पातील गाळासंदर्भात त्यांच्या सूचना महत्त्वाच्या ठरणार आहेत़