शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बारूळ येथील मानार प्रकल्प गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:17 IST

येथील ५० वर्षे पूर्ण झालेला निम्न मानार प्रकल्प गाळात रुतला आहे़ या प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून काढून गाळयुक्त शिवार करण्यासाठी संबंधित कार्यालयाने आवाहन केले असून या प्रकल्पाचा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेत समावेश करण्यासाठी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे़

ठळक मुद्दे ५२ वर्षांत १७ हजार घनमीटरच गाळउपसा

लोकमत न्यूज नेटवर्कबारूळ : येथील ५० वर्षे पूर्ण झालेला निम्न मानार प्रकल्प गाळात रुतला आहे़ या प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून काढून गाळयुक्त शिवार करण्यासाठी संबंधित कार्यालयाने आवाहन केले असून या प्रकल्पाचा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेत समावेश करण्यासाठी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे़निम्न मानार प्रकल्पाची निर्मिती १९६२ साली शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाली़ या निम्न मानार धरणाची लांबी १८६० मीटर असून उंची २६़८२ मीटर आहे़ प्रकल्पाला डावा व उजवा असे दोन कालवे आहेत़ डावा कालवा ६८ कि़मी़ तर उजवा कालवा २१ कि़मी़ अंतराचा आहे़सततचा दुष्काळ, विविध रोगांमुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान, कर्जाचा डोंगर त्यामुळे शेतक-यांकडे हा गाळ घेवून जाण्यासाठी पैसे नाहीत़ त्यामुळे मानार प्रकल्प कार्यालयाच्या वतीने लोकसहभागातून गाळ काढून घेवून जाण्यासाठी प्रकल्पानजीकच्या ग्रामपंचायतींना कळविण्यात येईल, अशी माहिती शाखा अधिकारी आऱएल़ अजनाळकर यांनी दिली़ मात्र शेतकरी हा गाळ काढून घेण्यासाठी उत्साही नाहीत़ या प्रकल्पातील गाळ काढणे आवश्यक आहे़ प्रकल्पात सध्या १७ टक्के पाणीसाठा आहे़ चार तालुक्यांसाठी कामधेनू असलेल्या या प्रकल्पाची पाणीक्षमता वाढविण्यासाठी शेतकरी, प्रशासन, सामाजिक संस्था, स्थानिक पुढारी, जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून हा प्रकल्प गाळमुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याची चर्चा आहे़

बारूळ शिवारात २१ हेक्टर शेतजमिनीवरच टाकला गाळया प्रकल्पामुळे २३३१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून या प्रकल्पाचा कंधार, नायगाव, धर्माबाद, बिलोली या तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी उपयोग होतो़ या प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर २०१६ मध्ये प्रकल्पातील गाळ उपसा करण्यासाठी शेतकºयांना प्रबोधन केले़ त्यामुळे १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून तसेच तीन जेसीबी, दोन पोकलॅन, १६ टिप्पर, दोन ट्रॅक्टरच्या मदतीने केवळ १७ हजार घनमीटर एवढा काढला़ त्यामुळे या प्रकल्पातील साठवण क्षमतेत ५़५ मि़मी़ ने वाढ झाली़ मात्र या प्रकल्पातील गाळ १८ शेतकºयांनी घेतल्यामुळे साठवण क्षमतेची वाढ अत्यल्प ठरली आहे़ या परिसरातील २१ हेक्टर शेत जमिनीवर गाळ टाकला आहे़ 

उपयुक्त साठा १३८ दलघमी१४६़९२ दलघमी जलसाठा असलेल्या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ६९२ चौरस मैल, १ हजार ८५६ चौ़कि़मी़ आहे़ एकूण या प्रकल्पासाठी बुडीत क्षेत्र २ हजार ८६० हेक्टर असून यात ६ गावांची जमीन व गावे पुनर्वसित झाली आहेत़ या प्रकल्पाची मृतसाठा क्षमता ८़७१० दलघमी तर उपयुक्त जलसाठा १३८़२१ दलघमी आहे़ शनिवारी बारूळ येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पाहणी दौरा असून मानार प्रकल्पातील गाळासंदर्भात त्यांच्या सूचना महत्त्वाच्या ठरणार आहेत़