शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

खरीप हंगाम पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:34 IST

जिल्हा नियोजन सभागृहात आढावा बैठकीत पालकमंत्री गायकवाड बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे ...

जिल्हा नियोजन सभागृहात आढावा बैठकीत पालकमंत्री गायकवाड बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, खरीप हंगाम सुरू होऊन २ महिने झाले असून, आतापर्यंत जिल्ह्यात ४४ टक्केच शेतकऱ्यांना पीककर्जाचे वितरण झाले आहे. बँका यात टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्या बँका दिरंगाई करत आहेत, अशांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन गाव व बँकनिहाय आराखडा तयार करावा, तसेच त्यांना तात्काळ कर्ज वितरणाचे निर्देश देऊन दररोज याबाबत पाठपुरावा करावा. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ९१ हजार ४६६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५९४ कोटी ८६ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

गायकवाड म्हणाल्या की, कोरोना उपाययोजनेच्या बाबतीत जिल्ह्याने चांगले काम केले आहे. तरी आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पूर्ण तयारी करावी. कृषी विभागाचा आढावा घेताना गायकवाड यांनी जिल्ह्यासाठी किती बी-बियाणे आणि खत उपलब्ध झाले होते. पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या किती शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी विचारणा केली, तर तक्रार प्राप्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्याचा पंचनामा करावा आणि दोषीवर कायदेशीर कारवाई करावी. कोरोना महामारीमुळे रोजगार गेल्याने अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत कामे उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले.