शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
2
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
3
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
4
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
5
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
6
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
7
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
8
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
9
MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट
10
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
11
'टेस्ला मॉडेल Y' भारतात २० लाखांनी स्वस्त होणार? कंपनीचा मोठा दावा, किंमत नाही, मालकी खर्च कमी होणार...
12
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
13
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
14
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
15
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
16
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
17
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
18
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
19
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
20
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात ३३ बेरोजगारांनाच बँकेचे कर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 19:31 IST

जिल्ह्यातील ४३६ पैकी केवळ ३३ बेरोजगारांनाच बँकेने कर्ज मंजूर केले आहे. 

ठळक मुद्दे जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेंतर्गत ६३ प्रस्तावांचे भौतिक तर १.१२ कोटींचे आर्थिक उद्दिष्ट होते. जवळपास ४५५ प्रस्ताव कार्यालयात प्राप्त झाले होते. त्यापैकी ४३६ प्रस्ताव विविध बँनांना पाठविले त्यापैकी केवळ ३६ प्रस्तावांनाच मंजुरी मिळाली आहे,तर २५३ प्रस्ताव बाद ठरविण्यात आले आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात नवउद्योजकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु बँकांच प्रतिसाद देत नसल्याने अनेक जण प्रस्ताव दाखल करण्याकडे पाठ फिरवितात. याचा खराखुरा अनुभव यंदा जिल्हा उद्योग केंद्राकडून प्रस्ताव दाखल केलेल्यांना आला आहे. जिल्ह्यातील ४३६ पैकी केवळ ३३ बेरोजगारांनाच बँकेने कर्ज मंजूर केले आहे. 

हिंगोली जिल्ह्याची ओळखच मुळात ना उद्योग जिल्हा म्हणून अजूनही कायम आहे. जिल्ह्यामध्ये अनेकांना उद्योग उभारण्याची मनोमन इच्छा असतानाही पैशाअभावी अनेकांच्या स्वप्नावर पाणी फिरल्यागत होत आहे. त्यातच बँका तर जवळही फिरकू देत नसल्याने अनेकांनी बँकेचा उंबराच चढणे सोडून दिले. तरीही काहींनी प्रयत्न करायला काय हरकत आहे असे म्हणत जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रस्ताव दाखल केले. येथे जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेंतर्गत ६३ प्रस्तावांचे भौतिक तर १.१२ कोटींचे आर्थिक उद्दिष्ट होते. जवळपास ४५५ प्रस्ताव कार्यालयात प्राप्त झाले होते. त्यापैकी ४३६ प्रस्ताव विविध बँनांना पाठविले असता त्यापैकी केवळ ३६ प्रस्तावांनाच मंजुरी मिळाली आहे. तर २५३ प्रस्ताव बाद ठरविण्यात आले आहेत. तर १८३ प्रस्ताव बँक स्तरावर प्रलंबित असल्याची आकडेवारी जिल्हा उद्योग केंद्राकडून मिळाली आहे. प्राप्त प्रस्तावांच्या तुलनेत मंजूर प्रस्तावांची संख्या नगण्य असल्यामुळे अनेक नवउद्योजकांचा हिरमोड झाला आहे. अनेकजण अजूनही बँकांचे उंबरवटे झिजवण्यातच हैराण असून प्रशासनही हतबल दिसत आहे. दाद मागावी तरी कोणाकडे ? असा प्रश्न तरुणांना पडला आहे. 

अनेकांच्या स्वप्नावर फिरले पाणी मागील अनेक वर्षांपासून कर्ज देण्यासाठी बँकाच उदासीन असल्याने अनेक नवउद्योकांना व्यवसाय उभारणीपासून दूर राहण्याची वेळ येत आहे. वास्तविक पाहता जिल्हाधिकार्‍यांनी बैठका घेऊन - घेऊन बँक अधिकार्‍यांना प्रस्ताव मंजूर करण्याचे सुचविले होेते. मात्र त्याचा मोजक्याच बँक अधिकार्‍यावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अनेक बँकेत तर ० च्यापुढे आकडाच अजूनपर्यंत गेलेला नाही हे विशेष! त्यामुळे अनेक नवउद्योजकांचा हिरमोड होत असून, याकडे पुन्हा एकदा वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

सूचनेकडे दुर्लक्षजिल्हा उद्योग केंद्राकडे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी सर्वच बँकेला उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिलेल्या सूचनेकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.