शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

हिंगोली जिल्ह्यात ३३ बेरोजगारांनाच बँकेचे कर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 19:31 IST

जिल्ह्यातील ४३६ पैकी केवळ ३३ बेरोजगारांनाच बँकेने कर्ज मंजूर केले आहे. 

ठळक मुद्दे जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेंतर्गत ६३ प्रस्तावांचे भौतिक तर १.१२ कोटींचे आर्थिक उद्दिष्ट होते. जवळपास ४५५ प्रस्ताव कार्यालयात प्राप्त झाले होते. त्यापैकी ४३६ प्रस्ताव विविध बँनांना पाठविले त्यापैकी केवळ ३६ प्रस्तावांनाच मंजुरी मिळाली आहे,तर २५३ प्रस्ताव बाद ठरविण्यात आले आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात नवउद्योजकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु बँकांच प्रतिसाद देत नसल्याने अनेक जण प्रस्ताव दाखल करण्याकडे पाठ फिरवितात. याचा खराखुरा अनुभव यंदा जिल्हा उद्योग केंद्राकडून प्रस्ताव दाखल केलेल्यांना आला आहे. जिल्ह्यातील ४३६ पैकी केवळ ३३ बेरोजगारांनाच बँकेने कर्ज मंजूर केले आहे. 

हिंगोली जिल्ह्याची ओळखच मुळात ना उद्योग जिल्हा म्हणून अजूनही कायम आहे. जिल्ह्यामध्ये अनेकांना उद्योग उभारण्याची मनोमन इच्छा असतानाही पैशाअभावी अनेकांच्या स्वप्नावर पाणी फिरल्यागत होत आहे. त्यातच बँका तर जवळही फिरकू देत नसल्याने अनेकांनी बँकेचा उंबराच चढणे सोडून दिले. तरीही काहींनी प्रयत्न करायला काय हरकत आहे असे म्हणत जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रस्ताव दाखल केले. येथे जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेंतर्गत ६३ प्रस्तावांचे भौतिक तर १.१२ कोटींचे आर्थिक उद्दिष्ट होते. जवळपास ४५५ प्रस्ताव कार्यालयात प्राप्त झाले होते. त्यापैकी ४३६ प्रस्ताव विविध बँनांना पाठविले असता त्यापैकी केवळ ३६ प्रस्तावांनाच मंजुरी मिळाली आहे. तर २५३ प्रस्ताव बाद ठरविण्यात आले आहेत. तर १८३ प्रस्ताव बँक स्तरावर प्रलंबित असल्याची आकडेवारी जिल्हा उद्योग केंद्राकडून मिळाली आहे. प्राप्त प्रस्तावांच्या तुलनेत मंजूर प्रस्तावांची संख्या नगण्य असल्यामुळे अनेक नवउद्योजकांचा हिरमोड झाला आहे. अनेकजण अजूनही बँकांचे उंबरवटे झिजवण्यातच हैराण असून प्रशासनही हतबल दिसत आहे. दाद मागावी तरी कोणाकडे ? असा प्रश्न तरुणांना पडला आहे. 

अनेकांच्या स्वप्नावर फिरले पाणी मागील अनेक वर्षांपासून कर्ज देण्यासाठी बँकाच उदासीन असल्याने अनेक नवउद्योकांना व्यवसाय उभारणीपासून दूर राहण्याची वेळ येत आहे. वास्तविक पाहता जिल्हाधिकार्‍यांनी बैठका घेऊन - घेऊन बँक अधिकार्‍यांना प्रस्ताव मंजूर करण्याचे सुचविले होेते. मात्र त्याचा मोजक्याच बँक अधिकार्‍यावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अनेक बँकेत तर ० च्यापुढे आकडाच अजूनपर्यंत गेलेला नाही हे विशेष! त्यामुळे अनेक नवउद्योजकांचा हिरमोड होत असून, याकडे पुन्हा एकदा वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

सूचनेकडे दुर्लक्षजिल्हा उद्योग केंद्राकडे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी सर्वच बँकेला उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिलेल्या सूचनेकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.