शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडलेलेच: पाणीही दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

हिंगोली शहरात पूर्वी दोन ते तीन दिवसांआड हमखास पाणी यायचे. आता काही भागात सहा दिवसांपासूनही पाणीपुरवठा झाला नाही. त्यातच ...

हिंगोली शहरात पूर्वी दोन ते तीन दिवसांआड हमखास पाणी यायचे. आता काही भागात सहा दिवसांपासूनही पाणीपुरवठा झाला नाही. त्यातच ज्या भागात पाणीपुरवठा होत आहे, त्यांना गढूळ पाणी पिण्याची वेळ येत आहे. एक तर पाणी येत नसल्याने विविध भागांतील नागरिकांना ऐन वेळी इतरत्र पाणी आणण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. आता पाणी आले, तर ते शुद्धीकरणानंतर येत आहे की धरणातून थेट नळाला येत आहे, हे कळायला मार्ग नाही. शहरातील विविध भागांत नळाचे पाणीच मोठ्या विश्वासाने पिण्यासाठी वापरले जाते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता, हे पाणी आरोग्यासाठी घातक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरे म्हणजे शहरात मागील काही दिवसांपासून बिघडलेले वेळापत्रक पुन्हा पूर्ववत नाही. दोन ते तीन नव्हे, तर सहा दिवसांनीही काही भागात पाणीपुरवठा झाला नाही. अशा भागातील नागरिकही कधी पाणी मिळणार, अशी ओरड करीत आहेत, तर न.प.ला मात्र वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने अपेक्षित उपसा करता येत नाही. त्यामुळे अर्धवट भरलेल्या टाकीतून पाणी सोडल्यास पुन्हा अडचणी येतात, तर कधी-कधी बारा ते चौदा तास वीज राहात नसल्याने पाणीच येत नाही.

पाणी सुरक्षितच

शहरात होणारा पाणीपुरवठा हा शुद्धीकरणानंतरच होत आहे. हे पाणी पिण्यासाठी तेवढेच सुरक्षित आहे. मागील काही दिवसांपासून जोरदार पर्जन्य झाल्याने धरणात गढूळ पाणी मोठ्या प्रमाणात आले. शुद्धीकरणानंतरही पाण्याचा थोडा पिवळसर रंग राहतो. मात्र, ते पिण्यास योग्य आहे. तर वीजपुरवठा सुरळीत राहात नसल्याने वेळापत्रक पूर्ववत करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसत असल्याचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी सांगितले.