शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडलेलेच: पाणीही दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

हिंगोली शहरात पूर्वी दोन ते तीन दिवसांआड हमखास पाणी यायचे. आता काही भागात सहा दिवसांपासूनही पाणीपुरवठा झाला नाही. त्यातच ...

हिंगोली शहरात पूर्वी दोन ते तीन दिवसांआड हमखास पाणी यायचे. आता काही भागात सहा दिवसांपासूनही पाणीपुरवठा झाला नाही. त्यातच ज्या भागात पाणीपुरवठा होत आहे, त्यांना गढूळ पाणी पिण्याची वेळ येत आहे. एक तर पाणी येत नसल्याने विविध भागांतील नागरिकांना ऐन वेळी इतरत्र पाणी आणण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. आता पाणी आले, तर ते शुद्धीकरणानंतर येत आहे की धरणातून थेट नळाला येत आहे, हे कळायला मार्ग नाही. शहरातील विविध भागांत नळाचे पाणीच मोठ्या विश्वासाने पिण्यासाठी वापरले जाते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता, हे पाणी आरोग्यासाठी घातक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरे म्हणजे शहरात मागील काही दिवसांपासून बिघडलेले वेळापत्रक पुन्हा पूर्ववत नाही. दोन ते तीन नव्हे, तर सहा दिवसांनीही काही भागात पाणीपुरवठा झाला नाही. अशा भागातील नागरिकही कधी पाणी मिळणार, अशी ओरड करीत आहेत, तर न.प.ला मात्र वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने अपेक्षित उपसा करता येत नाही. त्यामुळे अर्धवट भरलेल्या टाकीतून पाणी सोडल्यास पुन्हा अडचणी येतात, तर कधी-कधी बारा ते चौदा तास वीज राहात नसल्याने पाणीच येत नाही.

पाणी सुरक्षितच

शहरात होणारा पाणीपुरवठा हा शुद्धीकरणानंतरच होत आहे. हे पाणी पिण्यासाठी तेवढेच सुरक्षित आहे. मागील काही दिवसांपासून जोरदार पर्जन्य झाल्याने धरणात गढूळ पाणी मोठ्या प्रमाणात आले. शुद्धीकरणानंतरही पाण्याचा थोडा पिवळसर रंग राहतो. मात्र, ते पिण्यास योग्य आहे. तर वीजपुरवठा सुरळीत राहात नसल्याने वेळापत्रक पूर्ववत करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसत असल्याचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी सांगितले.