शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

परत अवर्षणाच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:29 IST

यावर्षीच्या मोसमात परिसरासह तालुक्यातील बहुतांश भागात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी, डिसेंबर महिन्याच्या शेवटपासूनच येथील पाणीपातळीत कमालीची घट झाली असून येणाºया काळात वसमत तालुक्यातील बहुतांश भागांत पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्देकौठा : अत्यल्प पावसाचा परिणाम ; ग्रामस्थांमध्ये चिंता

लोकमत न्यूज नेटवर्ककौठा : यावर्षीच्या मोसमात परिसरासह तालुक्यातील बहुतांश भागात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी, डिसेंबर महिन्याच्या शेवटपासूनच येथील पाणीपातळीत कमालीची घट झाली असून येणाºया काळात वसमत तालुक्यातील बहुतांश भागांत पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.कौठासह येथील परिसराची यापूर्वी ‘सिंचनाचा पट्टा’ म्हणून ओळख होती. या भागात कालव्यांद्वारे ‘सिद्धेश्वर’ व ‘येलदरी’ धरणाचेपाणी मुबलक प्रमाणात मिळत होते. परंतु, मागील तीन वर्षांपासून या भागातील पर्जन्यवृष्टीचे प्रमाण कमी होत गेले. परिणामी, येथील भागात कोरडवाहू सदृशस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, बागायती असलेला पट्टा एकदम कोरडा झाला. त्याचा विपरीत परिणाम परिसरातील शेती उत्पादनावर झाल्यामुळे उत्पादन घटण्यास सुरूवात झाली आहे.त्याचप्रमाणे दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत चालली असल्यामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईसदृश्य स्थिती जाणवत आहे. यावर उपाययोजना म्हणून अनेकजण ‘बोअर’ घेत आहेत. परंतु, ४०० ते ५०० फुटापर्यंत बोअर घेऊनही मुबलक प्रमाणात पाणी लागत नसल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. अजून तर उन्हाळा लागणेही बाकी आहे.कळमनुरी तालुक्यात पाणीटंचाई निवारणार्थ साडेचार कोटींचा पाणीटंचाईचा आराखडा४कळमनुरी - तालुक्यात यंदाच्या मोसमात केवळ ५२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे अत्यल्प पावसाचे साईड इफेक्ट आता कळमनुरीत तालुक्यातील बहुतांश गावांत बघावयास मिळत आहेत. त्या अनुषंगाने यावर्षी पाणीटंचाईच्या निवारणार्थ पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने ४ कोटी ३३ लाख ४४ हजार रूपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.४यावर्षीच्या मोसमात तालुक्यातील काही गावांत आतापासूनच पाणीटंचाईसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक गावांतील पाणीटंचाईची सद्यस्थिती काय आहे ? हे जाणून घेवून प्रशासनाच्या वतीने त्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत. दरम्यान, बहुतेक गावांत आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरूवात झाली आहे.