शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

परत अवर्षणाच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:29 IST

यावर्षीच्या मोसमात परिसरासह तालुक्यातील बहुतांश भागात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी, डिसेंबर महिन्याच्या शेवटपासूनच येथील पाणीपातळीत कमालीची घट झाली असून येणाºया काळात वसमत तालुक्यातील बहुतांश भागांत पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्देकौठा : अत्यल्प पावसाचा परिणाम ; ग्रामस्थांमध्ये चिंता

लोकमत न्यूज नेटवर्ककौठा : यावर्षीच्या मोसमात परिसरासह तालुक्यातील बहुतांश भागात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी, डिसेंबर महिन्याच्या शेवटपासूनच येथील पाणीपातळीत कमालीची घट झाली असून येणाºया काळात वसमत तालुक्यातील बहुतांश भागांत पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.कौठासह येथील परिसराची यापूर्वी ‘सिंचनाचा पट्टा’ म्हणून ओळख होती. या भागात कालव्यांद्वारे ‘सिद्धेश्वर’ व ‘येलदरी’ धरणाचेपाणी मुबलक प्रमाणात मिळत होते. परंतु, मागील तीन वर्षांपासून या भागातील पर्जन्यवृष्टीचे प्रमाण कमी होत गेले. परिणामी, येथील भागात कोरडवाहू सदृशस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, बागायती असलेला पट्टा एकदम कोरडा झाला. त्याचा विपरीत परिणाम परिसरातील शेती उत्पादनावर झाल्यामुळे उत्पादन घटण्यास सुरूवात झाली आहे.त्याचप्रमाणे दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत चालली असल्यामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईसदृश्य स्थिती जाणवत आहे. यावर उपाययोजना म्हणून अनेकजण ‘बोअर’ घेत आहेत. परंतु, ४०० ते ५०० फुटापर्यंत बोअर घेऊनही मुबलक प्रमाणात पाणी लागत नसल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. अजून तर उन्हाळा लागणेही बाकी आहे.कळमनुरी तालुक्यात पाणीटंचाई निवारणार्थ साडेचार कोटींचा पाणीटंचाईचा आराखडा४कळमनुरी - तालुक्यात यंदाच्या मोसमात केवळ ५२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे अत्यल्प पावसाचे साईड इफेक्ट आता कळमनुरीत तालुक्यातील बहुतांश गावांत बघावयास मिळत आहेत. त्या अनुषंगाने यावर्षी पाणीटंचाईच्या निवारणार्थ पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने ४ कोटी ३३ लाख ४४ हजार रूपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.४यावर्षीच्या मोसमात तालुक्यातील काही गावांत आतापासूनच पाणीटंचाईसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक गावांतील पाणीटंचाईची सद्यस्थिती काय आहे ? हे जाणून घेवून प्रशासनाच्या वतीने त्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत. दरम्यान, बहुतेक गावांत आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरूवात झाली आहे.