शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
7
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
8
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
9
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
10
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
11
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
12
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
13
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
14
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
15
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
16
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
17
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
18
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
19
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
20
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या

रेल्वे प्रवास नकोरे बाबा; दररोज १० ते १२ तिकिटे होतात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:31 IST

हिंगोली रेल्वे स्थानकावरून दररोज नरखेड ते काचीगुडा व काचीगुडा ते नरखेड ही इंटरसिटी रेल्वे धावत असते. इंटरसिटी ...

हिंगोली रेल्वे स्थानकावरून दररोज नरखेड ते काचीगुडा व काचीगुडा ते नरखेड ही इंटरसिटी रेल्वे धावत असते. इंटरसिटी रेल्वेगाडीला कोरोनाआधी दोनशे ते चारशे प्रवासी असायचे; परंतु सध्या कोरोना महामारीमुळे तीस ते चाळीस प्रवासीच दिसत आहेत. इंटरसिटी वगळता हिंगोली स्थानकावरून तिरुपती ते अमरावती ही रेल्वेगाडी रविवार आणि बुधवार, अमरावती ते तिरुपती ही रेल्वेगाडी सोमवार आणि गुरुवार, तर सिकंदराबाद ते जयपूर ही रेल्वेगाडी मंगळवार आणि गुरुवार अशी धावते. गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कोणत्याच रेल्वेला प्रवासी दिसत नाहीत. इंटरसिटी रेल्वेगाडी पूर्वी हाऊसफुल्ल चालायची; परंतु कोरोना महामारीमुळे प्रवाशांनी प्रवास करणे टाळले आहे. अति महत्त्वाचे काम असेल तर प्रवासी प्रवास करत आहेत. काही प्रवासी तिकिटाचे आरक्षण करीत आहेत; परंतु कोरोनामुळे दररोज दहा ते बारा तिकिटे रद्द केली जात आहेत. प्रवासी संख्या घटल्याने रेल्वेच्या उत्पन्नावरही चांगलाच परिणाम होतो आहे.

‘इंटरसिटी’ची गर्दी ओसरली

इंटरसिटी (नरखेड ते काचीगुडा, काचीगुडा ते नरखेड) या रेल्वेगाडीला कोरोनाआधी मोठ्या प्रमाणात गर्दी असायची; परंतु कोरोनामुळे इंटरसिटी खालीच जात आहे.

कोल्हापूर ते नागपूर ही रेल्वे काही दिवसांपूर्वी सुरू होती; परंतु कोरोनामुळे या रेल्वेला प्रवासीही मिळेना झाले आहेत. त्यामुळे ही रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हिंगोली स्थानकावर आठवड्यातून एकदा येणाऱ्या दोन रेल्वे आहेत. त्या रेल्वेंचीही गर्दी कोरोनामुळे ओसरली आहे. पूर्वी मोठी प्रवासी संख्या असायची.

विशेष रेल्वेलाही गर्दी नाही

हिंगोली स्थानकावरून तिरुपती ते अमरावती व सिकंदराबाद ते जयपूर या दोन रेल्वेगाड्या आठवड्यातून एक वेळ येतात. या विशेष रेल्वे सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली होती; परंतु आज परिस्थिती उलटी आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून या दोन्ही रेल्वेला प्रवासीच नाहीत. काहीजण या रेल्वेचे आरक्षण करतात; परंतु कोरोनामुळे अनेकांनी आरक्षण तिकिटे रद्द केली आहेत. सर्वच ठिकाणचे कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अनेकांनी प्रवास करण्याचे टाळले आहे.

जानेवारी महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अति महत्त्वाचे काम असेल तरच लोक आरक्षण करून रेल्वेने जात आहेत. रेल्वेचा प्रवास सुखकर असला तरी कोरोना महामारीमुळे प्रवास करण्याचे अनेकजण टाळत आहेत. प्रवास करतेवेळेस प्रवाशांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.

-रामसिंग, स्टेशनमास्टर, हिंगोली रेल्वे स्थानक.