शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

रेल्वे प्रवास नकोरे बाबा; दररोज १० ते १२ तिकिटे होतात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:31 IST

हिंगोली रेल्वे स्थानकावरून दररोज नरखेड ते काचीगुडा व काचीगुडा ते नरखेड ही इंटरसिटी रेल्वे धावत असते. इंटरसिटी ...

हिंगोली रेल्वे स्थानकावरून दररोज नरखेड ते काचीगुडा व काचीगुडा ते नरखेड ही इंटरसिटी रेल्वे धावत असते. इंटरसिटी रेल्वेगाडीला कोरोनाआधी दोनशे ते चारशे प्रवासी असायचे; परंतु सध्या कोरोना महामारीमुळे तीस ते चाळीस प्रवासीच दिसत आहेत. इंटरसिटी वगळता हिंगोली स्थानकावरून तिरुपती ते अमरावती ही रेल्वेगाडी रविवार आणि बुधवार, अमरावती ते तिरुपती ही रेल्वेगाडी सोमवार आणि गुरुवार, तर सिकंदराबाद ते जयपूर ही रेल्वेगाडी मंगळवार आणि गुरुवार अशी धावते. गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कोणत्याच रेल्वेला प्रवासी दिसत नाहीत. इंटरसिटी रेल्वेगाडी पूर्वी हाऊसफुल्ल चालायची; परंतु कोरोना महामारीमुळे प्रवाशांनी प्रवास करणे टाळले आहे. अति महत्त्वाचे काम असेल तर प्रवासी प्रवास करत आहेत. काही प्रवासी तिकिटाचे आरक्षण करीत आहेत; परंतु कोरोनामुळे दररोज दहा ते बारा तिकिटे रद्द केली जात आहेत. प्रवासी संख्या घटल्याने रेल्वेच्या उत्पन्नावरही चांगलाच परिणाम होतो आहे.

‘इंटरसिटी’ची गर्दी ओसरली

इंटरसिटी (नरखेड ते काचीगुडा, काचीगुडा ते नरखेड) या रेल्वेगाडीला कोरोनाआधी मोठ्या प्रमाणात गर्दी असायची; परंतु कोरोनामुळे इंटरसिटी खालीच जात आहे.

कोल्हापूर ते नागपूर ही रेल्वे काही दिवसांपूर्वी सुरू होती; परंतु कोरोनामुळे या रेल्वेला प्रवासीही मिळेना झाले आहेत. त्यामुळे ही रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हिंगोली स्थानकावर आठवड्यातून एकदा येणाऱ्या दोन रेल्वे आहेत. त्या रेल्वेंचीही गर्दी कोरोनामुळे ओसरली आहे. पूर्वी मोठी प्रवासी संख्या असायची.

विशेष रेल्वेलाही गर्दी नाही

हिंगोली स्थानकावरून तिरुपती ते अमरावती व सिकंदराबाद ते जयपूर या दोन रेल्वेगाड्या आठवड्यातून एक वेळ येतात. या विशेष रेल्वे सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली होती; परंतु आज परिस्थिती उलटी आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून या दोन्ही रेल्वेला प्रवासीच नाहीत. काहीजण या रेल्वेचे आरक्षण करतात; परंतु कोरोनामुळे अनेकांनी आरक्षण तिकिटे रद्द केली आहेत. सर्वच ठिकाणचे कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अनेकांनी प्रवास करण्याचे टाळले आहे.

जानेवारी महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अति महत्त्वाचे काम असेल तरच लोक आरक्षण करून रेल्वेने जात आहेत. रेल्वेचा प्रवास सुखकर असला तरी कोरोना महामारीमुळे प्रवास करण्याचे अनेकजण टाळत आहेत. प्रवास करतेवेळेस प्रवाशांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.

-रामसिंग, स्टेशनमास्टर, हिंगोली रेल्वे स्थानक.