शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

वाहून जाणारे मराठवाड्याचे हक्काचे पाणी साठविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

हिंगोली : मराठवाड्याला १०२ टीएमसी पाणी सिंचनासाठी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, जवळपास ३० टीएमसी पाणी इतर राज्यांत वाहून जाते. ...

हिंगोली : मराठवाड्याला १०२ टीएमसी पाणी सिंचनासाठी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, जवळपास ३० टीएमसी पाणी इतर राज्यांत वाहून जाते. ते साठविण्यासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न शासनाकडून राहणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण आदींची उपस्थिती होती. यावेळी पाटील म्हणाले, लातूरला पाणीसाठ्याची चांगली संधी आहे. पाणी खाली वाहून जाण्यापेक्षा ते साठवून समतोल राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठवाड्यातील धरणे जुनी आहेत. कालव्यांची पाणीवहन क्षमता घटली आहे. सिद्धेश्वरचा जसा एडीबी बँकेकडे ४५० कोटींचा प्रस्ताव पाठविला. तसा जायकवाडीचाही जागतिक बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यात जलसिंचनाचे नवे स्रोत निर्माण करण्यासह असलेल्या स्रोतांचा पूर्ण क्षमतेने वापर करून सिंचन दुपटीने करण्यासाठी इस्त्रायलच्या धर्तीवर पाणी वापराचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी इस्त्रायलमधील तज्ज्ञांशी ऑनलाईन बैठकाही झाल्या.

हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या बैठकीतील विविध मुद्दे मांडून कयाधूवर कळमनुरी तालुक्यातही बंधाऱ्यांसाठी फेरसर्वेक्षण करण्याचा आदेश दिला. तसेच अनुशेष दूर करण्यासाठी इतर काय पर्याय करता येतील, हे तपासण्यासही सांगण्यात आल्याचे ते म्हणाले. तर नांदेडला पैनगंगेवरील इसापूर प्रकल्पात १०२ दलघमीची तूट आहे. ती भरून काढण्यासाठी खरबीवरून पाणी वळवण्याचा प्रस्ताव होता. मात्र, स्थानिकांची भावना लक्षात घेता त्यांच्या हक्काचे पाणी जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

आगामी निवडणुकांत पक्ष स्वबळावर लढणार, की आघाडीत असे विचारले असता स्थानिक पदाधिकाऱ्यांनी समन्वय साधून यावर निर्णय घ्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले.