शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

४०० आदिवासींनी जमीन वारशासाठी केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:31 IST

अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी खातेदारांच्या जमिनी पोट विभागून व वारसा फेरफार राबविण्यासाठी बोथी येथे घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळाला. पंधरा गावांतील हजारो आदिवासी शेतकरी या कार्यशाळेत उपस्थित झाले. तर चारशे अर्जदारांनी वारसा फेरफारासाठी अर्ज दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी खातेदारांच्या जमिनी पोट विभागून व वारसा फेरफार राबविण्यासाठी बोथी येथे घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळाला. पंधरा गावांतील हजारो आदिवासी शेतकरी या कार्यशाळेत उपस्थित झाले. तर चारशे अर्जदारांनी वारसा फेरफारासाठी अर्ज दाखल केले आहेत.कळमनुरी तालुक्यातील बोथी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराजस्व अभियान कळमनुरी तहसील कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आले. या अभियानात नायब तहसीलदार पाठक, मंडळ अधिकारी सावंत व महसूलच्या पथकाने सर्व तयारी केली. या अभियानास कळमनुरी आ. डॉ. संतोष टारफे, जिल्हा परिषद सदस्य डा. सतीश पाचपुते, सरपंच खंदारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. तलाठी पाईकराव, माखणे, साधू, इंगळे यांच्यासह महसूलचे मोठे पथक येथे हजर होते. अनुसूचित क्षेत्रातील खातेदारांच्या खातेफोड, विभागणी, वारसा फेरफार जागेवर करण्यासाठी हे कार्यशाळा राबवण्यात आली. आदिवासी बांधवांच्या वतीने काही दिवसांपूर्वी आदिवासींच्या जमिनी नावावर करून मिळणेबाबत, त्यांचे फेर करण्याबाबत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोचार्ची दखल घेऊन तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या अभियानाचे आयोजन केले होते.या अभियानात काळ्याचीवाडी, बहुर, भुरक्याची वाडी, कांडलीसह परिसरातील पंधरा गावातील आदिवासी बांधवांनी हजेरी लावली होती. या कार्यशाळेत मंडळाधिकारी सावंत यांनी मार्गदर्शन केले. तर तलाठी इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. वेगवेगळ्या टेबलवर दिवसभर चारशे आदिवासी बांधवांनी अर्ज दाखल केले आहेत.

टॅग्स :landslidesभूस्खलनcollectorजिल्हाधिकारी