शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

सोयाबीन बियाणे प्रक्रिया करून ठेवण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

हिंगोली जिल्ह्यात जवळपास २.३५ लाख हेक्टरवर सोयाबीन घेतले जाते. यासाठी २ लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागते. त्यामुळे ऐनवेळी बाजारपेठेत ...

हिंगोली जिल्ह्यात जवळपास २.३५ लाख हेक्टरवर सोयाबीन घेतले जाते. यासाठी २ लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागते. त्यामुळे ऐनवेळी बाजारपेठेत शेतकरी बियाणांची शोधशोध करून हैराण होतात. त्यापेक्षा स्वत:कडील सोयाबीन बियाणे म्हणून वापरल्यास बियाणे खरेदीपासून सुटका होईल. कृषी विभागाने दिलेल्या विविध सूचना पाळून बियाणे साठवणूक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी केले.

काय घ्यावी काळजी?

शेतकऱ्यांनी ग्राम बीजोत्पादन पीक प्रात्यक्षिके व शेतकरी समूह इत्यादी कार्यक्रमांतर्गतचे उत्पादित बियाणे तसेच स्वत: उत्पादित सोयाबीन बियाणे म्हणून वापरावे. प्रमाणित बियाणांपासून उत्पादित चांगल्या प्रतिच्या बियाणांची चाळणी करून निवड करावी, सोयाबीन बियाणांचे बाह्य आवरण अत्यंत नाजूक व पातळ असल्याने त्याची काळजीपूर्वक हाताळणी करणे गरजेचे आहे. तर साठवणुकीपूर्वी दोन ते तीन दिवस उन्हात ताडपत्री अथवा सिमेंटच्या खळ्यावर अगदी पातळ पसरून वाळवावे. आर्द्रतेचे प्रमाण ९ ते १२ पर्यंत आणावे. यातील काडीकचरा, माती काढून स्वच्छ करावे व चांगल्या पोत्यात साठवून ठेवावे.

उगवणक्षमता तपासावी

सोयाबीण बियाणे साठवणूक करण्यापूर्वी घरगुती पद्धतीने त्याची उगवणक्षमता तपासावी व किमान ७० टक्के उगवण असेल तर बियाणे साठवणूक करावी. हे बियाणे आर्द्रता लवकर साठवून घेते त्यामुळे ओलविरहित व हवेशीर ठिकाणी साठवणूक करावी. प्लॅस्टिकऐवजी गोणपाटाच्या पोत्यात ठेवावे. पाचपेक्षा जास्त पोत्यांची थप्पी लावू नये, थप्पी जमिनीपासून १० ते १५ सेंटिमीटर उंचीवर लाकडी फळ्यावर करावी, पोत्यांची रचना आडव्या व उभ्या पद्धतीने करून हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसार साठवणुकीच्या खोलीत कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर करावा. सोयाबीन वाहतूक करताना पोती उंचावरून आदळली जाणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी.